शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

..तर बैलगाडीतूनच करावा लागणार प्रचार; निवडणूक विभागाने निश्चित केले वाहनांचे दर

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: October 26, 2024 18:57 IST

महेश सरनाईक सिंधुदुर्ग : उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार करणे आवश्यक आहे. प्रचारासाठी प्रामुख्याने विविध प्रकारच्या वाहनांचा उपयोग केला जातो. ...

महेश सरनाईकसिंधुदुर्ग : उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार करणे आवश्यक आहे. प्रचारासाठी प्रामुख्याने विविध प्रकारच्या वाहनांचा उपयोग केला जातो. कोणत्या वाहनाचे दर दिवसाला किती रूपये भाडे राहील हे निवडणूक विभागाने निश्चित केले आहे. त्यानुसार टाटा सुमो, बोलेरो, काळी-पिवळी, जीप यांचे इंधनासह प्रति दिवसाचे भाडे ३ हजार ८०० रूपये तर बैलगाडी, घोडागाडी प्रतितास २ रूपये दर ठरविण्यात आले आहे. त्यामुळे निवडणूक विभाग याकडे लक्ष ठेवणार असून त्यानुसार उमेदवारांचा खर्च निश्चित केला जाणार आहे.

उमेदवाराला ४० लाख रूपयांची मर्यादानिवडणुकीदरम्यान मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवाराला प्रचार करावा लागतो. यासाठी वाहने भाड्याने घेऊन त्यावर ध्वनिक्षेपक लावला जातो. तसेच बॅनर, पोस्टर व वाहनाला बॅनर, पोस्टर बांधून उमेदवार प्रचार करतात. निवडणुकीदरम्यान, खर्चाची मर्यादा पाळणे उमेदवाराला आवश्यक आहे. यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत ४० लाख रूपयांची मर्यादा देण्यात आली आहे.

दर दिवशीचा खर्च सादर करण्याची अटदर दिवशीचा खर्च उमेदवाराला निवडणूक विभागाकडे सादर करावा लागतो. खर्चाची मर्यादा ओलांडल्यास निवडून येवूनही उमेदवारांचे पद धोक्यात येण्याची शक्यता अधिक आहे. निवडणूक खर्चाचा हिशेब जुळवताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी निवडणूक विभागाने जवळपास सर्वच प्रकारच्या वाहनांचे दर ठरवले आहेत. सोबतच इंधनासह व इंधनाशिवाय असेसुद्धा वर्गीकरण केले आहे. त्यानुसार निवडणूक खर्च विभागाला सादर करणे आवश्यक आहे.

४० सीटर प्रवासी वाहनाचे भाडे दहा हजार रूपये

  • ४० सीटर प्रवासी वाहनाचे भाडे दिवसाला ७ हजार ७०० रूपये तर इंधनासह १० हजार ४०० रूपये ठरविण्यात आले आहे.
  • १८ सीटर वाहनासाठी दिवसाचे इंधनाशिवाय भाडे ४ हजार ६२५ रूपये तर इंधनासोबत ५ हजार ७६० रूपये ठरविले आहे. ५० लीटर वाहनाचे इंधनासोबतचे भाडे २२ हजार ९५० रूपये ठरविण्यात आले आहे.

सायकल रिक्षा प्रतितास २ रूपये कुठे मिळते साहेब ?

  • काही उमेदवार शहरात सायकल रिक्षाच्या माध्यमातून प्रचार करतात. त्यासाठी इंधन लागत नसल्याने त्याचे भाडे कमीच ठेवण्यात आले आहे.
  • निवडणूक विभागाने सायकल, रिक्षा, घोडागाडी, बैलगाडी यासाठी प्रतितास केवळ २ रूपये भाडे ठरविले आहे. ४०० रूपये दिवसाची मजुरी दिल्याशिवाय मजूर मिळत नाही. अशास्थितीत सायकल, सायकल रिक्षा, बैलगाडी केवळ दोन रूपये प्रतितास या दराने मिळणार काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मालवाहू वाहनासाठी पाच हजार रूपये

  • मालवाहू हलक्या वाहनाचे इंधनाचे भाडे ५ हजार २६० रूपये ठरविण्यात आले आहे. १० चाकी वाहन असल्यास १२ हजार ८०० रूपये, १२ ते १४ चाकी वाहन १३ हजार ६०० रूपये, १६ चाकी वाहनाचे भाडे २५ हजार ७०० रूपये ठरविले आहेत. त्यानुसार निवडणूक खर्च सादर करावा लागणार आहे.
  • कितीही रूपये दिले तरी निवडणूक विभागाकडे खर्च सादर करतेवेळी निवडणूक विभागाने ठरवून दिलेल्या दरानेच खर्च सादर करायचा असतो.

ऑटोरिक्षा एक हजार रूपये दिवसऑटोरिक्षाच्या माध्यमातूनही प्रचार केला जातो. निवडणूक विभागाने इंधनासह ऑटोरिक्षाचा दर प्रतिदिवस एक हजार रूपये, सायकल रिक्षा प्रतितास २ रूपये, दुचाकी प्रतितास २० रूपये, ट्रॉलीसोबत ट्रॅक्टर प्रतिदिवस ३ हजार रूपये दर ठरविला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग