शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मालवण तालुक्यातील नांदरूखमध्ये विकास निधीची लूट, ग्रामसेवकाची मनमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 16:50 IST

मालवण तालुक्यातील नांदरूख ग्रामपंचायतीवर जलस्वराज्य प्रकल्पाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा ठपका ठेवत ग्रामपंचायत बरखास्त करण्यात आली होती. त्यानंतर गावाचा गाडा प्रशासन हाकत आहे. मात्र गावात सुरू असलेल्या विकास निधीची अधिकाऱ्यांकडून लूट केली जात असल्याचा आरोप नांदरूख ग्रामस्थांनी केला.

ठळक मुद्देभ्रष्टाचाराची चौकशी होण्यासाठी ग्रामस्थ एकवटणारनांदरुख गावात ग्रामपंचायतीच्या फंडातून ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे कामदर्जाहीन काम बांधकाम अभियंत्यांच्या निदर्शनास, भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

मालवण : मालवण तालुक्यातील नांदरूख ग्रामपंचायतीवर जलस्वराज्य प्रकल्पाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा ठपका ठेवत ग्रामपंचायत बरखास्त करण्यात आली होती. त्यानंतर गावाचा गाडा प्रशासन हाकत आहे. मात्र गावात सुरू असलेल्या विकास निधीची अधिकाऱ्यांकडून लूट केली जात असल्याचा आरोप नांदरूख ग्रामस्थांनी केला.

ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकाची मनमानी सुरू असल्याने ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीसह विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. याची गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी सखोल चौकशी करून संबंधित ग्रामसेवकावर कारवाई करावी, अशी मागणी नांदरूख ग्रामस्थांनी गाव बैठकीत केली.

नांदरूख गावात पार पडलेल्या विशेष बैठकीत नूतन सरपंच दिनेश चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य सुहास राणे, सलोनी पाटकर, वृंदा चव्हाण, विकास चव्हाण, सुनील चव्हाण, नंदकिशोर चव्हाण, गजानन चव्हाण, चंद्रकांत चव्हाण यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी गाव बैठकीत करण्यात आलेल्या आरोपांची कायदेशीर चौकशी होण्यासाठी गटविकास अधिकारी, सभापती यांना लवकरच लेखी निवेदन देण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.

ग्रामपंचायत फंडाचा दर्जेदार कामे व योग्य विनियोग न करता शासनाच्या निधीचा गैरवापर करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी ग्रामस्थांनी एकवटण्याचा निर्धार केला आहे.

गोरगरिबांची दाखल्यांसाठी हेळसांडनांदरूख गावात कार्यरत असलेल्या ग्रामसेवकाकडे नांदरूख व चौके या दोन गावांचा चार्ज आहे. ग्रामसेवकाकडून नांदरूख गावातील ग्रामस्थांना दाखला दिला जात नाही.

विविध दाखल्यांसाठी हेळसांड होत असल्याने गोरगरिब ग्रामस्थांना दाखल्यासाठी चौकेतील ग्रामपंचायत कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. त्यामुळे मनमानी कारभार करणाऱ्या ग्रामसेवकाविरोधात ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना तत्काळ बदली करून नांदरूख गावासाठी कायमस्वरूपी ग्रामसेवक देण्यात यावा, अशीही मागणी करण्यात येणार आहे.

याबाबतही गटविकास अधिकारी, सभापती, तसेच जिल्हा परिषद सदस्यांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे दिनेश चव्हाण यांनी सांगितले.नांदरुख गावात ग्रामपंचायतीच्या फंडातून ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे काम सध्या सुरू आहे.यात इमारतीच्या प्लास्टर व प्लोरिंगसाठी वापरण्यात येणारी फरशी निकृष्ट दर्जाची आहे. अन्य साहित्य दर्जाहीन आहे. ही बाब बांधकाम अभियंत्यांच्या निदर्शनास आणल्यानंतर त्यांनी ती मान्य केली आहे. याबाबत ग्रामस्थांनी ग्रामसेवक यांचे लक्ष वेधले असता ग्रामस्थांनाच उद्धट उत्तरे दिली जातात.

ग्रामपंचायत बरखास्त असल्याने ग्रामसेवकाचा मनमानी कारभार सुरू आहे. या ग्रामसेवकाची बदली व्हावी, अशी चर्चा बैठकीत करण्यात आली. निधीचा गैरवापर होत असल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गgram panchayatग्राम पंचायत