शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर करडी नजर

By admin | Updated: September 20, 2014 00:27 IST

स्वतंत्र समिती ठेवणार लक्ष, मीडियावरील मजकुराचा खर्चात समावेश

रत्नागिरी : सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाचा किंवा उमेदवारांचा प्रचार करण्यास निवडणूक आयोगाने यावेळी चांगलाच चाप लावला आहे. त्याचबरोबर विरोधी उमेदवाराबाबतही काही आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर टाकल्यास त्यावरही आयोगाचा बडगा उगारला जाणार आहे. या निवडणुकीत प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडूनही स्वतंत्र पथक नेमण्यात आले असून त्याच्यामार्फत आता या सर्व सोशल साईटवर लक्ष ठेवले जाणार आहे.सध्या सर्वत्रच सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. लोकसभा निवडणुकीतही सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला होता. त्यामुळे प्रचाराला मोठ्या प्रमाणावर मदत झाली होती. या निवडणुकीतही व्हॉटस् अप, फेसबुक, द्वीटर, स्काईप आदी विविध सोशल साईटचा वापर होणार हे गृहीत धरून निवडणूक आयोगाने या निवडणुकीत सोशल साईटचा वापर करणाऱ्यांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी स्वतंत्र पथक स्थापन केले आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार इतर जिल्ह्यांप्रमाणेच जिल्ह्यात सोशल मीडियाचा वापर रोखण्यासाठीही स्वतंत्र पथक कार्यरत झाले आहे. आतापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराचा प्रयत्न झाल्यास तो पक्षाच्या खर्चात अंतर्भूत केला जाणार आहे. उमेदवाराने केलेली कामे तसेच काही आक्षेपार्ह मजकूर टाकला जात आहे का, यावरही नियंत्रण ठेवले जात आहे. यासाठी विविध मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क उपयोगात आणले जात असल्याने या कंपन्यांकडूनही जिल्ह्यातील ग्राहकांची यादी घेतली जाणार असल्याने आक्षेपार्ह मजकूर नेमका कोठून टाकण्यात आला आहे, हे निष्पन्न होईल आणि एकदा ही बाब स्पष्ट झाली की असा मजकूर टाकणाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे.एकंदरीत या निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर प्रचारासाठी तसेच विरोधकांना नामोहरम करण्याकरिता होऊ शकेल, अशी गाजरे राजकीय मंडळी खुशीत खात होती. मात्र, आता आयोगानेच यावर बडगा उगारल्याने आता आनंदावर विरजण पडले आहे. एकंदरीत आता सोशल मीडियावर प्रचाराबरोबरच आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्यांना, त्यांना ‘लाईक’ वा ‘शेअर’ करणाऱ्यांवरही ही समिती वचक ठेवणार असल्याने आता या निवडणुकीची आचारसंहिता संपेपर्यंत या सोशल मीडियाचा वापर साऱ्यांनाच जपून करावा लागणार आहे. त्याप्रमाणे असा आक्षेपार्ह मजकूर कुणाला आढळून आल्यास त्यांनी निवडणुक विभागाकडे याबाबत तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)