शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वेच्या वेगावर मर्यादा!

By admin | Updated: June 6, 2017 21:23 IST

गणेशोत्सवासाठी जादा गाड्या : वेळापत्रक ठरले; मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांच्या वेळ बदलल्या

लोकमत न्यूज नेटवर्ककणकवली : कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांसाठी पावसाळी हंगामातील नवे वेळापत्रक येत्या १० जूनपासून लागू होत असून, सुरक्षिततेचा उपाय म्हणून रेल्वेच्या वेगावरही आता मर्याद येणार आहे. पावसाळ््यातील सुरक्षितेसाठी ही उपाययोजना व वेळापत्रक असेल.पावसाळी वेळापत्रकात मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. पावसाळी हंगामात रेल्वे मार्गावर दरडी कोसळून अपघात होऊ नये म्हणून खबरदारी चा उपय म्हणून गाड्यांचा वेग मंदावणार असून, सर्व ठिकाणी दक्षता घेण्यात येणार आहे.कोकण रेल्वेचे नवे वेळापत्रक १० जून ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत लागू राहणार आहे, तर मुंबईतून गोव्याच्या दिशेने सुटणाऱ्या गाड्यांच्या वेळेत कोणताही बदल केलेला नाही. मात्र, मुंबईहून येणाऱ्या गाड्या कोकण रेल्वे मार्गावर आल्यानंतर वेग मंदावल्याने पोहोचण्याच्या वेळा बदलणार आहेत. कोकण रेल्वेमार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे. काही स्थानकांचे सुशोभीकरण, आधुनिक सुविधा करण्यात आल्या असून, काही रेल्वे स्थानकांवर बायोटॉयलेटची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी ‘तेजस’ ही अत्याधुनिक रेल्वेगाडी प्रथमच कोकण रेल्वेमार्गावर सोडण्यात आली. या गाडीलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणाबाबतही प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, खबरदारीचा इशारा म्हणून कोकण रेल्वे मार्गावरील पावसाळी हंगामात दरवर्षीप्रमाणेच यंदाही ही दक्षता घेण्यात आली आहे.१० जूनपासून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांच्या वेळा ठरल्या असून, यामध्ये एर्नाकुलम ते निजामुद्दीन १२६१७ - मंगला एक्स्प्रेस ही गाडी मडगाव येथून मध्यरात्री १.४७ वाजता सुटून पहाटे ३.३२ वाजता कणकवलीत पोहोचणार आहे. डबलडेकर ११०८६ ही गाडी मडगाव येथून पहाटे ५.३० ला सुटून सकाळी ८ वाजता कणकवलीत पोहोचेल. मांडवी एक्स्प्रेस १०१०४ ही गाडी मडगाव येथून सकाळी ८.३० वाजता सुटून कणकवलीत सकाळी ११.०१ वाजता पोहोचेल. जनशताब्दी १२०५२ ही गाडी मडगाव येथून दुपारी १२ वाजता सुटून कणकवलीला दुपारी २.२० वाजता पोहोचेल. एर्नाकुलम-पुणे ०१२३४ ही गाडी मडगाव येथून दुपारी १.४० वाजता सुटून कणकवलीत दुपारी ३.१६ वाजता पोहोचेल. कोकणकन्या एक्स्प्रेस १०११२ ही गाडी मडगाव येथून सायंकाळी ४.४५ वाजता सुटून कणकवलीत सायंकाळी ७.१३ वाजता पोहोचेल.मेंगलोर-मुंबई एक्स्प्रेस १२१३४ ही गाडी मडगाव येथून रात्री ९.५० वाजता सुटून रात्री ११.५६ वाजता कणकवलीत पोहोचेल. तसेच सावंतवाडी-दिवा ५०१०६ ही गाडी सावंतवाडी येथून सकाळी ८.३० वा. सुटून कणकवलीतून सकाळी ९.२४ वाजता मुंबईकडे रवाना होईल. एर्नाकुलम ते ओखा १६३३८ ही गाडी मडगाव येथुन सकाळी ११.४० वाजता सुटून कणकवलीत दुपारी २ वाजता पोहोचेल. राज्यराणी १०१०४ -तुतारी एक्स्प्रेस ही सावंतवाडी येथून रोज सायंकाळी ५.३० वाजता सुटून सायंकाळी ६.२६ वाजता कणकवलीत पोहोचेल. त्यानंतर मुंबईकडे रवाना होणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठीच हे पाऊल उचलल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.गणेशोत्सवासाठी जादा गाड्यागणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेमार्गावर जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. यामध्ये गाडी क्रमांक ०११४४५ सीएसटी-करमळी ही गाडी १८ आॅगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत धावणार असून सीएसटी येथून मध्यरात्री १२.३० वाजता सुटून करमळीला दुपारी २.३० वाजता पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी, मडुरा आणि थिवीम येथे थांबे देण्यात आले आहेत. ही गाडी १७ डब्यांची असून, वातानुकूलित चार, स्लीपर पाच, जनरल सहा आणि दोन एसएलआर कोच असणार आहेत.दादर-सावंतवाडी ०१११३ आणि सावंतवाडी-दादर ०१११४ ही गाडी आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. दादर येथून १८ आॅगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत दर रविवार, मंगळवार आणि शुक्रवारी सकाळी ७.५० वाजता सुटून सावंतवाडीला सायंकाळी ६.५० वाजता पोचणार आहे. परतीसाठी सावंतवाडी येथून दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी पहाटे ४.५० ला सुटून दादरला सायंकाळी ४ वाजता पोचणार आहे. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप येथे थांबे देण्यात आले आहेत. एलटीटी ते सावंतवाडी या मार्गावर ०१०३७ ही गाडी २४ आॅगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत दर गुरुवारी रात्री ९.४५ वाजता सुटून सावंतवाडीला सकाळी ९ वाजता पोहोचणार आहे. परतीसाठी ०१०३८ ही गाडी सावंतवाडी येथून दर शुक्रवारी दुपारी २.५ वाजता सूटून एलटीटीला रात्री १२.२० वाजता पोचणार आहे. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप येथे थांबे देण्यात आले आहेत. तसेच पुणे-सावंतवाडी-पुणे या मार्गावर ०१४२३ ही गाडी पुणे येथून २४ आॅगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत दर गुरुवारी सायंकाळी ६.४५ वाजता सुटून सावंतवाडीला सायं. ७ वाजता पोचणार आहे.करमळी ते पुणे या मार्गावर ०१४४६ ही गाडी १८ आॅगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत धावणार असून, करमळी येथून दुपारी ३.२५ वाजता सुटून पुणे येथे पहाटे ५.५० ला पोहोचेल. या गाडीला थिवीम, मडुरा, सावंतवाडी, झाराप, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी, राजापूर, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर, आरवली, सावर्डे, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा, पनवेल आणि लोणावळा येथे थांबे देण्यात आले आहेत.