शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

सिंधुदुर्गात ७ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित, शेतकऱ्यांसाठी टोल फ्री क्रमांक जारी 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 24, 2024 19:16 IST

९ भरारी पथके स्थापन : १८५ केंद्रांवर खरेदी करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

गिरीश परबसिंधुदुर्ग : कृषी विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत ७ कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित केले असून त्यांना बी बियाणे व खते विक्रीसाठी बंदी घालण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे सद्य:स्थितीत १८५ कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांनी आवश्यक ती खरेदी करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.पाऊस सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी भातपेरणीच्या कामाला सुरुवात केली आहे. यासाठी लागणारे बियाणे जिल्ह्यातील १९२ कृषी सेवा केंद्रांमध्ये खरेदी केले होते. राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये. यासाठी भरारी पथक स्थापन करून कृषी सेवा केंद्रांना अचानक भेटी देऊन तपासणी करत आहेत. अशाच एका तपासणीत देवगड, कुडाळ व सावंतवाडी तालुक्यातील ७ कृषी केंद्रे दोषी आढळल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कृषी केंद्रामध्ये दरपत्रक न लावणे, साठा फलक न लावणे असा ठपका ठेवून ही कारवाई करण्यात आली आहे. शासनाने शेतकऱ्यांसाठी टोल फ्री क्रमांकसुद्धा जारी केले आहेत.

शेतकऱ्यांसाठी टोल फ्री नंबर८८३०२९०८८७, ८८२२४४६६५५

९ भरारी पथके स्थापन..शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही यासाठी कृषी विभागाने ९ भरारी पथकांची स्थापना केली आहे. प्रत्येक तालुक्यात एक व जिल्ह्याच्या ठिकाणी एक अशी ९ पथके तैनात आहेत. एका पथकात ५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहेत. हे पथक ‘ऑन दि स्पॉट’ कोणत्याही कृषी केंद्रात जाऊन तेथील वस्तुस्थितीची तपासणी करू शकतात.

शेतकऱ्यांनी बी, खते खरेदी करतेवेळी पक्क्या पावत्या घाव्यात. काही शंका असल्यास कृषी विभागाकडे तक्रार करावी.. - अरुण नातू , कोरड वाहू क्षेत्र विकास अधिकारी

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र