शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

सर्वसमावेशक कायद्यासाठी सरकारला भाग पाडू!, पर्ससीनबाबत भूमिका घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 16:18 IST

fisherman Sindhudurg- पारंपरिक मच्छिमार व पर्ससीनधारक यांच्यात गैरसमज करून आपली राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या केंद्र व राज्य सरकारची भूमिका इंग्रजांपेक्षा घातक आहे. शासनाकडून पर्ससीनधारक मच्छिमारांना सावत्र मुलाची वागणूक दिली जात आहे. सरकारने यापुढे हलक्या कानाने निर्णय घेतल्यास आमच्याही बाजूने सर्वसमावेशक कायदा बनविण्यासाठी सरकारला भाग पाडू, असा रोखठोक इशारा सिंधुदुर्ग जिल्हा आधुनिक यांत्रिक रापणकार असोसिएशनच्या वतीने देण्यात आला आहे.

ठळक मुद्देसर्वसमावेशक कायद्यासाठी सरकारला भाग पाडू!पर्ससीनबाबत शासनाची भूमिका घातक असल्याचा आरोप

मालवण : पारंपरिक मच्छिमार व पर्ससीनधारक यांच्यात गैरसमज करून आपली राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या केंद्र व राज्य सरकारची भूमिका इंग्रजांपेक्षा घातक आहे. शासनाकडून पर्ससीनधारक मच्छिमारांना सावत्र मुलाची वागणूक दिली जात आहे. सरकारने यापुढे हलक्या कानाने निर्णय घेतल्यास आमच्याही बाजूने सर्वसमावेशक कायदा बनविण्यासाठी सरकारला भाग पाडू, असा रोखठोक इशारा सिंधुदुर्ग जिल्हा आधुनिक यांत्रिक रापणकार असोसिएशनच्या वतीने देण्यात आला आहे.मालवण-राजकोट येथील हॉटेल हायटाईड येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्ससीनधारकांची बैठक पार पडली. यावेळी अशोक सारंग, रुजारिओ पिंटो, सहदेव बापर्डेकर, जॉन नरोना, गोपीनाथ तांडेल, रेहान शेख यांनी भूमिका मांडताना शासनाच्या धोरणांवर टीकास्त्र सोडले.

आमदार, खासदारांनी व्होटबँकेचा स्वार्थी विचार न करता मासेमारीच्या कायद्याचा सखोल अभ्यास करून आपली मते मांडावीत. डॉ. सोमवंशी समितीने केवळ पर्ससीन मासेमारीचा अभ्यास केला. त्यामुळे मासेमारी करणार्‍या सर्व प्रकारच्या मच्छिमार प्रतिनिधींचा समावेश करून घेत केंद्र व राज्य शासनाने सर्वसमावेशक नवीन कायदा करून धोरणात्मक निर्णय घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली.मासेमारीच्या कायद्यात पर्ससीनची व्याख्या स्पष्ट नाही. शिवाय कायद्यात मासेमारीचे प्रकारही दिलेले नाहीत. त्यामुळे कायद्यातील व्याख्या स्पष्ट करून मग त्याची अंमलबजावणी करावी. क्यार वादळादरम्यान दाभोळ बंदरात आश्रयासाठी थांबलेल्या एलईडी चिनी नौकांवर शासनाने कोणतीही कारवाई केली नाही. उलट त्यांना सर्व सुविधा पुरवण्यात आल्या. मात्र, स्थानिक पर्ससीनधारकांच्या बाबतीत शासन कधीच सकारात्मक नसते. त्यामुळे ही लोकशाही की घराणेशाही? असा सवाल अशोक सारंग यांनी विचारला.मत्स्य विभाग, तहसीलदारांच्या कार्यपद्धतीवर बोटजिल्ह्यात पर्ससीनधारकांवर सातत्याने चुकीच्या पद्धतीने कारवाया केल्या जातात. मत्स्य विभागाकडून ह्यस्पॉटपंचनामाह्ण केला जात नाही. अज्ञानी तांडेलांकडून (खलाशी) कोऱ्या कागदावर सही घेऊन कागद रंगवतात, असा सारंग यांनी आरोप करत थेट तहसीलदारांच्याही कार्यपद्धतीवर बोट दाखविले. तहसीलदारांना कायद्याचा कोणताही अभ्यास नाही. त्यामुळे निर्णय देताना एकाच बाजूने कौल देतात, असाही जाहीर आरोप सारंग यांनी केला.

टॅग्स :fishermanमच्छीमारsindhudurgसिंधुदुर्ग