शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

त्या निर्णयाचा फेरविचार व्हावा : तलाठी महासंघाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 15:35 IST

तलाठी तसेच मंडळ अधिकारी स्तरावरुन ग्रामीण भागातील लोकांना देण्यात येणारे विविध दाखले न देण्याचा निर्णय तलाठी महासंघाने घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची गैरसोय होत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी याबाबत जिल्हाधिकारी पातळीवर निर्णय होण्याची गरज आहे. तसे झाले तरच सर्वसामान्यांची गैरसोय टळू शकेल.

ठळक मुद्देग्रामीण भागातील लोकांची दाखल्यांअभावी गैरसोयराज्यभर तलाठी महासंघाकडून दाखले न देण्याचा निर्णय

कणकवली , दि. २८ : तलाठी तसेच मंडळ अधिकारी स्तरावरुन ग्रामीण भागातील लोकांना देण्यात येणारे विविध दाखले न देण्याचा निर्णय तलाठी महासंघाने घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची गैरसोय होत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी याबाबत जिल्हाधिकारी पातळीवर निर्णय होण्याची गरज आहे. तसे झाले तरच सर्वसामान्यांची गैरसोय टळू शकेल.

तलाठी महासंघाने २ आॅक्टोबर पासून उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, वारस अहवाल असे विविध प्रकारचे दाखले न देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी तलाठयांकडून देण्यात येणाºया अशा प्रकारच्या दाखल्यांना काही खटल्यामध्ये न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यामुळे राज्यभर तलाठी महासंघाकडून दाखले न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयाचे पालन सिंधुदुर्गातील तलाठीही करीत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यांना तहसील कार्यालयात दाखल्यासाठी फेऱ्या माराव्या लागत आहेत. तलाठ्यांकडून कार्यवाही होत नसल्याने दाखल्यांची पुढील प्रक्रिया अडकून पडत आहे.

तलाठ्यांच्या दाखला बंद निर्णयामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी जालना येथील तहसीलदारानी अशा दाखल्यासाठी संबधित लाभार्थ्यांकडून स्वयंघोषणापत्र घेत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

त्यामुळे जालना येथे घेण्यात आलेल्या निर्णया प्रमाणे सिंधुदुर्गातही जिल्हाधिकाऱ्यानी या समस्येकडे लक्ष देऊन काही तरी निर्णय घ्यावा आणि सर्व सामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :talukaतालुकाkonkanकोकण