शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणी भाषा भवन उभारूया, मंत्री नितेश राणे यांचे आवाहन

By अनंत खं.जाधव | Updated: March 22, 2025 16:07 IST

साहित्यिकांनी संवाद करावा मार्ग निघेल, सावंतवाडीत कोमसापचे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन

सावंतवाडी : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी कोकणातील साहित्यिकाचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच आज मुंबईत मराठी भाषा भवन उभे राहात आहे. ही आनंदाची बाब असून आता कोकणातील साहित्यिकांनी पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणी भाषा भवन उभारूया आणि येथील साहित्याचा गौरव करूया. साहित्यिकांनो तुम्ही माझ्याशी संवाद साधा संवादातून मार्ग निघतो. युवा पिढीला मोबाईल देण्याऐवजी पुस्तक देऊया असे आवाहन राज्याचे मत्स्य बाब बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी केले.कोकण मराठी साहित्य परिषदेकडून आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन मंत्री राणे यांच्या हस्ते झाले यावेळी  साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ नाट्य लेखक गंगाराम गवाणकर, कोमसाप अध्यक्षा नमिता कीर, डॉ. प्रदीप ढवळ, मंगेश म्हस्के, उषा परब, मनीष दळवी, जिल्हाधिकारी अनिल पाटील, रवींद्र खेबुडकर, प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील, सावंतवाडी तालुकाध्यक्ष ॲड. संतोष सावंत, डॉ. मिलिंद कुलकर्णी, शेखर सामंत, वृंदा कांबळी, ॲड. नकुल पार्सेकर, रुजारिओ पिंटो अभिमन्यू लोंढे राजू तावडे उपस्थित होते.पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज साहित्य नगरी सावंतवाडीतील बॅरिस्टर नाथ पै  सभागृहाच्या विद्याधर भागवत व्यासपीठावर  कोकणातील ग्रंथालय व साहित्यिक चळवळीवर जोरदार चर्चा झाली.राणे म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद व कोकणाने फार मोठे योगदान दिले आहे. गंगाराम गव्हाणकर तसेच मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांनी आपली मालवणी मायबोली साता समुद्रा पार नेली. याच मालवणी भाषेचे सुद्धा जतन करणे हे आमचे कर्तव्य असून त्या दृष्टीने लवकरच कोकणात मालवणी भाषा भवन उभारण्याचा माझा मानस आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करूया संमेलनाच्या माध्यमातून आपलं कोकण व कोकणातील साहित्य सर्व दूर नेण्याचे काम केलं जातं. त्यादृष्टीने कोकणातील असलेल्या साहित्याचे जतन व्हावे तसेच नवनवीन साहित्यिक निर्माण व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

मी विचारांची लढाई लढतोय मी आज या देशात व राज्यात विचारांची लढाई लढत आहे. मी आमदार व मंत्री असलो तरीही मी प्रथम हिंदू आहे व ती माझी भूमिका स्पष्ट आहे. मात्र असे असले तरीही या जिल्ह्याचा पालकमंत्री अर्थात सरकारचा प्रतिनिधी म्हणून या जिल्ह्यातील साहित्य चळवळ वृद्धिंगत होण्यासाठी माझे जास्तीत जास्त प्रयत्न राहतील व पुढील वर्षी येणाऱ्या साहित्य संमेलनाच्या पूर्वी या जिल्ह्यातील साहित्यसंपदा असलेल्या ग्रंथालयांमध्ये निश्चितच आमुलाग्र बदल झालेले दिसतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. मधू मंगेश कर्णिक यांना महाराष्ट्र भूषण द्याकोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश म्हस्के यांनी कोमसापचे  संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात यावा असे आवाहन केले. तसेच कोकणातील साहित्य संस्कृतीचा ठेवा जतन करण्यासाठी देखील शासनाकडून सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे