शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

"मल्टीस्पेशालिटीचे राहू दे, आधी शवागृह तरी बांधा!",  राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2022 23:35 IST

आम्हाला मल्टीस्पेशालिटी नको निदान चांगले शवागृह बांधून मृतदेहांची हेळसांड तरी थांबवा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना केले आहे.

सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हृदयरोग तज्ज्ञ नाही रूग्णालयात अनेक समस्या आहेत. आम्हाला मल्टीस्पेशालिटी नको निदान चांगले शवागृह बांधून मृतदेहांची हेळसांड तरी थांबवा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना केले आहे. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी हिदायतुल्ला खान, शहर अध्यक्ष देवा टेमकर, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, सायली दुभाषी, संतोष जोईल, बाबल्या दुभाषी, नवल साटेलकर, इफ्तिकार राजगुरू आदी उपस्थित होते. दळवी म्हणाले, मुंबईचे पालकमंत्री पद देऊन दीपक केसरकर यांचे कोणीतरी प्रमोशन केले आहे, असा टोला लगावत यामागे नेमका सूत्रधार कोण? याचा केसरकरांनीच शोध घ्यावा, आणि त्यापेक्षाही जिल्हा सोडून अन्य जिल्ह्याची जबाबदारी दिली, कशी याचे आत्मचिंतन त्यांनी करावे, असा चिमटा राष्ट्रवादी दळवी यांनी काढला. 

येथील उपजिल्हा रुग्णालय वारंवार विविध समस्यांच्या गर्तेत आहे. रुग्णालयात उद्भवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी स्थानिक आमदार अपयशीच आहेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होते. तज्ञ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना बांबूळी किंवा खाजगी रुग्णालयाचा सल्ला दिला जातो. मात्र नातेवाईकांची परिस्थिती नसल्यास त्यांच्याकडून स्वतःच्या जबाबदारीवर रुग्णालयात रुग्ण ठेवत असल्याचे पत्र लिहून घेऊन, उपचार दिले जात आहेत. अशी नाराजी सुद्धा अनेकांनी आमच्याकडे व्यक्त केली. याकडे आता निदान पालकमंत्र्यांनी तरी आरोग्य यंत्रणेचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली. तर उपजिल्हा रुग्णालयातील शवागृह गेले अनेक महिने बंद आहे. रुग्णांवर उपचार नको, निदान त्यांच्या मृतदेहांची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी ते तरी दुरुस्त करावे, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले, केसरकर यांनी मागच्या काही दिवसात शहरातील गल्लोगल्लीत दौरा केला. त्यामुळे त्यांना अनेक समस्या निदर्शनास आल्याच असतील. त्या सोडविण्यासाठी त्यांनी आता तरी प्रयत्न करावे. येथील मोती तलावाच्या फुटपाथची अद्याप दुरुस्ती झाली नाही. त्याचा त्रास तलावा काठी फिरणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागतो. तर फुटपाथ खचलेल्या परिसरातून जाताना रस्त्यावरून चालावे लागते. एखाद्या भरधाव वाहनाची धडक बसून अपघात होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे, असे सांगत त्यांनी समस्यांचा पाढा वाचला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNCPराष्ट्रवादी काँग्रेस