शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
6
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
8
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
9
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
10
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
11
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
12
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
13
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
15
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
16
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
17
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
18
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
19
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
20
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!

आमदार एकवटले : कोकणातल्या डीएड्, बीएड्धारकांनी नागपुरात केले धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 3:52 PM

आगामी शिक्षक भरतीत स्थानिकांना प्राधान्य मिळालेच पाहिजे या मागणीसाठी रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर या जिल्ह्यांतील डीएड्, बीएड्धारकांनी नागपूर येथील विधिमंडळासमोर धरणे आंदोलन छेडले. या प्रश्नावर कोकणातील आमदार एकवटले आहेत.

ठळक मुद्देकोकणातल्या डीएड्, बीएड्धारकांनी नागपुरात केले धरणे आंदोलनआमदार एकवटले : शिक्षक भरतीत स्थानिकांनाच प्राधान्य द्या

सिंधुदुर्गनगरी : कोकणातील तरुणांवर शिक्षक भरतीत होणारा अन्याय आता खपवून घेणार नाही. परजिल्ह्यातील उमेदवारांना रुजू होऊ देणार नाही, असा इशारा देत आगामी शिक्षक भरतीत स्थानिकांना प्राधान्य मिळालेच पाहिजे या मागणीसाठी रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर या जिल्ह्यांतील डीएड्, बीएड्धारकांनी नागपूर येथील विधिमंडळासमोर धरणे आंदोलन छेडले. या प्रश्नावर कोकणातील आमदार एकवटले आहेत.कोकण डीएड्, बीएड्धारक असोसिएशनच्या नेतृत्वाखाली कोकणातील पाच जिल्ह्यांतील डीएड्, बीएड्धारक नागपूर येथे मंगळवारी एकवटले होते. स्थानिकांना न्याय मिळालाच पाहिजे, विदर्भ-मराठवाड्याचे पुनर्वसन कोकणात नको, जिल्हा बदल्यांची कोकणातील समस्या थांबलीच पाहिजे, न्याय द्या आम्हांला न्याय द्या, शाळा आमची, पोरे आमची शिक्षक बाह्यलो कित्याक अशा घोषणा देत नागपूर येथील यशवंत मैदान दणाणून सोडले.या आंदोलनाचे नेतृत्व संदीप गराटे, उपाध्यक्षा भाग्यश्री रेवडेकर, सचिव संदेश रावणंग, लखू खरवत, कृपाली शिंदे, सुरेश ताटे, दत्ता शिरंगे यांनी केले.धोरणात्मक बदल करून आगामी शिक्षक भरतीत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्थानिकांना ७० टक्के आरक्षण मिळावे. ७० टक्के स्थानिक व ३० टक्के इतर(राज्य) हा प्रवेश प्रक्रियेचा निकष राबविण्यात यावा, जिल्हा बदल्यांमुळे कोकणातील विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान थांबवण्यासाठी व येथील बेरोजगारी कमी करण्यासाठी स्थानिक डीएड् व बीएड्धारकांना शिक्षक भरतीत प्राधान्य मिळावे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे डोंगराळ व रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यांतील काही भाग आदिवासी क्षेत्रातील असून भरतीत संबंधित निकषातून आरक्षण मिळावे. सन २०१० सारखे विदर्भ-मराठवाड्यातील शिक्षकांचे पुनर्वसन कोकणात नको. स्थानिकांचा ७० टक्केचा कोटा रिकामा राहिल्यास त्या ठिकाणी टीईटी अपात्र उमेदवारांना नोकरीची संधी देण्यात यावी, या मागण्या निवेदनातून केल्या.कोकणातल्या जिल्ह्यांमध्ये हा लढा गेली १० वर्षे सुरू आहे. ही बाब विचारात घेऊन कोकणातील सर्वच आमदार या प्रश्नासाठी एकवटल्याचे यावेळी दिसून आले. आमदार राजन साळवी, आमदार सदानंद चव्हाण यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. कोकणातील हा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी बुधवारी अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे आमदार राजन साळवी आणि आमदार सदानंद चव्हाण यांनी सांगितले.ठरावांची दखल घेण्याची मागणीशिक्षक भरतीत स्थानिकांना प्राधान्य मिळण्याबाबतचा ठराव रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्हा परिषदांमध्ये घेण्यात आला आहे. विविध पंचायत समित्या, ग्रामपंचायती, शाळा व्यवस्थापन कमिट्या यांनीही स्थानिकांना प्राधान्य मिळण्यासाठी ठराव केले आहेत.लोकप्रतिनिधी, विद्यार्थ्यांचे पालक, ग्रामस्थ यांनीही स्थानिक शिक्षक आमच्या शाळांमध्ये द्या, अशी मागणी यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. कोकणातील आमदार, खासदार यांनीही या आंदोलनाला पाठिंबा असल्याची पत्रे दिली आहेत. स्थानिकांच्या या आंदोलनाची दखल राज्याच्या विधिमंडळात घेण्यात यावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. 

टॅग्स :Teachers Recruitmentशिक्षकभरतीsindhudurgसिंधुदुर्गNagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८