शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
4
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
5
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
6
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
8
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
9
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
10
घटस्फोटाच्या चर्चा, चतुर्थीला नववधूसारखी नटली ही अभिनेत्री, एकटीनेच केली बाप्पाची पूजा
11
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
12
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
13
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
14
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
15
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
16
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
17
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
18
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
19
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
20
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

समाजाला पुढे नेणारे नेते निर्माण करणे गरजेचे : भालचंद्र मुणगेकर

By admin | Updated: August 24, 2014 22:33 IST

कणकवलीतील ‘कास्ट्राईब’ महासंघाच्या मेळाव्यात प्रतिपादन

कणकवली : देशात भ्रष्टाचार फोफावला आहे. त्याचे परिणाम देशवासियांना भोगावे लागत आहेत. आपल्या राष्ट्राबद्दलचे प्रेम हे जाती व धर्मावर ठरविले जाते हे अत्यंत चुकीचे आहे. यापुढील काळात समाजाला पुढे नेणारे नेते निर्माण करण्याची आपणा सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी येथे केले.महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या सिंधुदुर्ग शाखेचा जिल्हा मेळावा येथील मातोश्री मंगल कार्यालयात रविवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार मुणगेकर बोलत होते. कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, कास्ट्राईब संघटनेचे राज्य महासचिव एस. टी. गायकवाड, गुंडू चव्हाण, डी. एम. चाटे, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संदीप कदम, भालचंद्र गोसावी, कार्याध्यक्ष रमाकांत जाधव, उदय सर्पे, नरेश कारिवडेकर, वसुंधरा चव्हाण, अच्युत वणवे, प्रदीप मांजरेकर, प्रदीप सर्पे, शिवाजी पवार, महेश गुरव, आर. बी. चव्हाण, संचिता कुडाळकर आदी उपस्थित होते.खासदार डॉ. मुणगेकर म्हणाले, समाजाला पुढे नेणाऱ्या नेत्यांची देशाला खरी गरज आहे. ही गरज पुरी करण्यासाठी सर्वांनी योगदान देणे गरजेचे आहे. जीवनात कोणतीही गोष्ट मागून मिळत नाही तर त्यासाठी संघर्ष करावा लागतो. कास्ट्राईब संघटनेने आपल्या कार्यपद्धतीत बदल करून समाजातील सर्व घटकांसाठी काम केले पाहिजे. देशातील आर्थिक व सामाजिक बदलांमध्ये गरीब व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवले पाहिजे.संदेश पारकर म्हणाले, शासकीय तसेच निमशासकीय कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कास्ट्राईब संघटना काम करीत आहे. या संघटनेने समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेऊन काम केले पाहिजे. महाराष्ट्र कामगार बोर्डाकडे या संघटनेने कामगारांची नोंदणी करावी, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.एस. टी. गायकवाड म्हणाले, कास्ट्राईब संघटनेचा मी एक पाईक आहे. संघटनेच्यावतीने विविध विभागातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न शासनाकडे पाठपुरावा करून दूर केले आहेत. कोणतेही वाईट काम करीत असताना अडथळे येत नाहीत. पण चांगले काम करताना अनेक अडथळे येतात. त्यामुळे संघटीतपणे आपण आपले प्रश्न सोडविले पाहिजेत.आर. बी. चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले. संघटनेच्यावतीने दहावी, बारावी, शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांबरोबरच समाजासाठी योगदान दिलेल्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. (वार्ताहर)