शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

समाजाला पुढे नेणारे नेते निर्माण करणे गरजेचे : भालचंद्र मुणगेकर

By admin | Updated: August 24, 2014 22:33 IST

कणकवलीतील ‘कास्ट्राईब’ महासंघाच्या मेळाव्यात प्रतिपादन

कणकवली : देशात भ्रष्टाचार फोफावला आहे. त्याचे परिणाम देशवासियांना भोगावे लागत आहेत. आपल्या राष्ट्राबद्दलचे प्रेम हे जाती व धर्मावर ठरविले जाते हे अत्यंत चुकीचे आहे. यापुढील काळात समाजाला पुढे नेणारे नेते निर्माण करण्याची आपणा सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी येथे केले.महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या सिंधुदुर्ग शाखेचा जिल्हा मेळावा येथील मातोश्री मंगल कार्यालयात रविवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार मुणगेकर बोलत होते. कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, कास्ट्राईब संघटनेचे राज्य महासचिव एस. टी. गायकवाड, गुंडू चव्हाण, डी. एम. चाटे, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संदीप कदम, भालचंद्र गोसावी, कार्याध्यक्ष रमाकांत जाधव, उदय सर्पे, नरेश कारिवडेकर, वसुंधरा चव्हाण, अच्युत वणवे, प्रदीप मांजरेकर, प्रदीप सर्पे, शिवाजी पवार, महेश गुरव, आर. बी. चव्हाण, संचिता कुडाळकर आदी उपस्थित होते.खासदार डॉ. मुणगेकर म्हणाले, समाजाला पुढे नेणाऱ्या नेत्यांची देशाला खरी गरज आहे. ही गरज पुरी करण्यासाठी सर्वांनी योगदान देणे गरजेचे आहे. जीवनात कोणतीही गोष्ट मागून मिळत नाही तर त्यासाठी संघर्ष करावा लागतो. कास्ट्राईब संघटनेने आपल्या कार्यपद्धतीत बदल करून समाजातील सर्व घटकांसाठी काम केले पाहिजे. देशातील आर्थिक व सामाजिक बदलांमध्ये गरीब व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवले पाहिजे.संदेश पारकर म्हणाले, शासकीय तसेच निमशासकीय कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कास्ट्राईब संघटना काम करीत आहे. या संघटनेने समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेऊन काम केले पाहिजे. महाराष्ट्र कामगार बोर्डाकडे या संघटनेने कामगारांची नोंदणी करावी, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.एस. टी. गायकवाड म्हणाले, कास्ट्राईब संघटनेचा मी एक पाईक आहे. संघटनेच्यावतीने विविध विभागातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न शासनाकडे पाठपुरावा करून दूर केले आहेत. कोणतेही वाईट काम करीत असताना अडथळे येत नाहीत. पण चांगले काम करताना अनेक अडथळे येतात. त्यामुळे संघटीतपणे आपण आपले प्रश्न सोडविले पाहिजेत.आर. बी. चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले. संघटनेच्यावतीने दहावी, बारावी, शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांबरोबरच समाजासाठी योगदान दिलेल्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. (वार्ताहर)