शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

डच वखार मोजतेय अंतिम घटका

By admin | Updated: October 12, 2015 00:57 IST

सोळाव्या शतकातील वारसा : पुनरुज्जीवन केल्यास वेंगुर्ले शहराच्या लौकिकात भर

प्रथमेश गुरव- वेंगुर्ले 0वेंगुर्ले शहरातील डच व्यापाऱ्यांनी येथे उभारलेली डच वखार भग्नावस्थेत असून, ही वास्तू पुन्हा सुस्थितीत उभी राहिल्यास पुढील पिढीला ऐतिहासिक वास्तूचा वारसा लाभेलच; त्याचबरोबर शहराच्या लौकिकात भरही पडेल. शिवाय ही वास्तू पाहण्यासाठी पर्यटकही मोठ्या प्रमाणावर येतील व स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.वेंगुर्ले बंदर मार्गावर, पोलीस वसाहतीनजीक असलेल्या या पुरातन इमारतीच्या जागी नवीन वास्तू बांधण्यासाठी २०११ मध्ये हॉलंडमधील आर्किटेक्ट व राजकीय नेत्यांनी पाहणी केली. वखार पुन्हा उभारून ते पर्यटनस्थळ बनविण्याचा मानस व्यक्त केला होता. मात्र, चार वर्षे उलटूनही या डच वखारीचे पुनरुज्जीवन होण्यासाठी कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. या डच वखारीचे पुनरुज्जीवन झाल्यास देश-विदेशातील पर्यटक दरवर्षी ही डच वखार पाहण्यास येतील व पर्यायाने वेंगुर्लेचा पर्यटनातून विकास साधता येईल. भारतातील तत्कालीन अनेक राजकीय मुत्सद्दी वेंगुर्लेतील या डच वखारीत येऊन डचांशी राजकीय खलबते करीत असत, तर विजापूरचा आदिलशाही सरदार मुस्ताफा खान, बलुत खान, अफजल खान हे आपल्या सैन्यासह येथे या वखारीत येऊन गेले होते. १६ व्या शतकात डच व्यापाऱ्यांनी येथे विजापूरच्या आदिलशहाच्या परवानगीने तटबंदीयुक्त वखार बांधली. त्याकाळी वेंगुर्ले हे एक प्रसिद्ध व्यापारी बंदर होते. आज येथे ऐतिहासिक डच वखार आहे. तिथपर्यंत खाडीचा विस्तार होता. या वखारीच्या समोरच खाडीत मालाने भरलेली गलबते थांबायची. १६६० ते १६७० या दरम्यान या वखारींची सुरक्षिततेच्या दृष्टीने फार मोठी दुरुस्ती करण्यात आली. १६८०मध्ये या वखारींसमोर एक भला मोठा खंदक खोदण्यात आला. त्यावर एक पूल बांधण्यात आला. शत्रूने डच वखारीवर हल्ला केल्यास खंदकावरील हा पूल वर उचलला जात असे, अशी या पुलाची रचना करण्यात आली होती. त्याकाळी वेंगुर्ले बंदरातून पार्शिया, जपान देशापर्यंत व्यापार चाले. डच वखारीच्या उभारणीनंतर फार मोठ्या प्रमाणात व्यापार वाढून वेंगुर्ले शहराची प्रगती होत गेली. १६८२च्या हल्ल्यानंतर डचांच्या मुख्य ठाण्याच्या आदेशानुसार मालवण येथे छोेटी वखार बांधण्यात आली व डच वेंगुर्लेहून गेले. त्यांना कायमचे वेंगुर्ले सोडावे लागले. त्यानंतर ही डच वखार सावंतवाडी संस्थानाच्या ताब्यात गेली व नंतर ब्रिटिश आमदानीत ती ब्रिटिशांच्या ताब्यात गेली. इंग्रजांनी आपल्या राजवटीत या डच वखारीत महालकरी कार्यालय ठेवले होते. स्वातंत्र्योत्तर काळातही तेथे महालकरी कार्यालय व न्यायालय होते. १९६० मध्ये येथील सर्व सरकारी कचेऱ्या वेंगुर्ले येथे कॅम्प भागात नवीन इमारतीत हलविण्यात आल्या. १९४७मध्ये ही डच वखार भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात गेली. त्यानंतर पुरातत्व खात्याने या वास्तूकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. या इमारतीची पडझड रोखण्याचे काम कोणीच केले नाही. आता ही इमारत पूर्णपणे भग्नावस्थेत कशी तरी उभी आहे. या इमारतीचे पुनरुज्जीवन केंद्रातील भाजप सरकारने केल्यास, या डच वखारीमुळे पुन्हा एकदा वेंगुर्लेचा विकास होईल.