शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

कुडाळ पंचायत समिती सभेत शिक्षण विभागाला धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 16:09 IST

 कुडाळ तालुक्यातील अनेक शाळांच्या इमारती धोकादायक स्थितीत असून शिक्षण विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य अरविंद परब यांनी कुडाळ पंचायत समितीच्या मासिक सभेत केला. सर्वच पंचायत समिती सदस्यांनी या प्रश्नी शिक्षण विभागाला धारेवर धरले.

ठळक मुद्देकुडाळ तालुक्यातील शाळांच्या इमारती धोकादायक संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष शाळा दुरूस्तीच्या विलंबाबाबत जिल्हा प्रशासनाकडे बोट

कुडाळ  , दि. २६ : कुडाळ तालुक्यातील अनेक शाळांच्या इमारती धोकादायक स्थितीत असून शिक्षण विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य अरविंद परब यांनी कुडाळ पंचायत समितीच्या मासिक सभेत केला. सर्वच पंचायत समिती सदस्यांनी या प्रश्नी शिक्षण विभागाला धारेवर धरले.

शिक्षण विभागाने याबाबत शाळा दुरूस्तीच्या विलंबाबाबत जिल्हा प्रशासनाकडे बोट दाखविले. तसेच सभागृहात मांडलेल्या सूचनांचे पालन होत नसल्याबाबत पंचायत समिती सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.

कुडाळ पंचायत समितीची मासिक सभा बुधवारी सभापती राजन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती श्रेया परब, उपमुख्यकार्यकारी अधिकारी सुनील रेडकर, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी एस. बी. भोई, पंचायत समितीचे सदस्य व सर्व विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते. सभेच्या सुरूवातीलाच सदस्य जयभारत पालव यांनी हुमरमळा शाळेच्या धोकादायक इमारतीचा प्रश्न उपस्थित केला.

दरम्यान, या चर्चेत सदस्य अरविंद परब यांनी भाग घेऊन त्यांनी सांगितले की, तालुक्यात अशा कितीतरी शाळांच्या इमारती धोकादायक स्थितीत असून सुध्दा याकडे गांभीर्याने बघितले जात नाही.

काही शाळांच्या भिंती ह्या मातीच्या असून त्यांना तडे गेले आहेत. छप्पर मोडकळीस आले आहे. अशा या धोकादायक इमारतीखाली छोटी छोटी मुले शिक्षण घेत आहेत. याबाबत आम्ही सभागृहात सूचना मांडतो, प्रस्ताव देतो, मात्र त्याची अंमलबजावणी जर होत नसेल तर आम्ही सभागृहात प्रश्न का मांडायचे? असा सवाल त्यांनी केला.

प्राजक्ता प्रभू यांनी वालावल बांधकोंड शाळेचा प्रश्न २०१३ सालापासून प्रलंबित असल्याचे सांगितले. तर सदस्य सुबोध माधव यांनी पाट केंद्रशाळेच्या बाबतीत हाच प्रश्न उपस्थित करून दुरूस्तीचा प्रस्ताव देऊन पाच वर्षे उलटली आहेत. पण याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे सांगितले.

याबाबत शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी गोडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, धोकादायक शाळा दुरूस्तीच्या प्रस्तावांचा प्राधान्यक्रम हा वरिष्ठस्तरावरून बदलला जातो. त्यामुळे आम्ही करायचे काय? असा प्रश्न उपस्थित करून शाळा दुरूस्तीच्या विलंबाबाबत जिल्हा प्रशासनाकडे बोट दाखविले.

पिंगुळी ते पाट व माणगाव तिठा आदी ठिकाणच्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. तसेच रस्त्याच्या दुतर्फा झाडी वाढल्याने रस्ता वाहन चालविण्यास धोकादायक बनला आहे. याबाबत गेल्या सभेत सूचना मांडण्यात आल्या होत्या. पण याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे सदस्य सुबोध माधव आणि शरयू घाडी यांनी सांगितले. त्यावर बांधकाम विभागाच्या अनामिका जाधव यांनी आम्ही या रस्त्यांची पाहणी केली आहे. पण टेंडर मंजूर झाले नसल्याने काम झालेले नसल्याचे सांगितले.

तर प्रभू यांनी वाघोसेवाडी मार्गे जाणारी एसटी फेरी अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता का बंद करण्यात आली, याचा जाब एस.टी. प्रशासनाच्या अधिकाºयांना विचारला. तर नूतन आईर यांनी वेताळ बांबर्डे व सुप्रिया वालावलकर यांनी पणदूर येथील शाळेतील मुलांच्या गैरसोयीबाबत प्रश्न उपस्थित करून या मुलांना एस.टी. बस उभ्या केल्या जात नसल्याचे सांगितले.

मुलांच्या सोयीसाठी फेऱ्या मध्ये बदल करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. तर कृषी विभागाकडून शेती नुकसानीचे पंचनामे करण्याचे अधिकार आम्हाला नाहीत. जे अहवाल प्राप्त झाले ते आम्ही जिल्हा परिषदेकडे पाठवलेले आहेत, असे सांगितल्यावर सदस्यांनी कृषी विभागाला धारेवर धरले.जबाबदारी टाळू नका : विजय चव्हाणशिक्षण विभागाचे प्रतिनिधी म्हणून तालुक्याची जबाबदारी तुमची आहे. त्यामुळे ही जबाबदारी तुम्ही टाळू शकत नाही. तुम्ही हा विषय लावून धरला पाहिजे, पाठपुरावा झाला पाहिजे, तुमचे प्रयत्न ज्या ठिकाणी अपुरे पडतील त्यावेळी आम्हाला सांगा, मग आम्ही आमचे प्रयत्न सुरू करतो, असा सल्ला गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाºयांना दिला.

टॅग्स :konkanकोकणpanchayat samitiपंचायत समिती