शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

कोकणकन्या लोकसभेच्या सर्वोच्च स्थानी

By admin | Updated: June 7, 2014 00:44 IST

सुमित्रा महाजन

सुभाष कदम ल्ल चिपळूणचिपळुणात केवळ तिचा जन्म नव्हे तर अख्खं बालपण गेलं. आजही तिच्या बोलण्यात या मातीचा गंध येतं राहतो, त्याच चिपळूणच्या माहेरवाशिण असलेल्या सुमित्रा महाजन यांना लोकसभेच्या सर्वोच्च स्थानी विराजमान होण्याचा मान मिळालाय. चिपळूणच्या या सुकन्येने एवढंच केलं नाही, तर या लोकसभा निवडणुकीत विजय संपादन करून सलग आठवेळा निवडून येण्याचा विक्रमही रचलाय.चिपळूण तालुक्यातील शिरळसारख्या डोंगराळ, दुर्गम भागात १२ एप्रिल १९४३ रोजी जन्मलेल्या सुमित्रा महाजन या येथेच वाढल्या. चिपळूणचे प्रसिद्ध वकील आप्पासाहेब साठे यांच्या त्या कन्या. लहानपणापासूनच सुमन साठे अभ्यासात हुशार होत्या. त्यांचे वक्तृत्व उत्तम होते. उत्तम नृत्यशैली आणि नाटकाची आवड असल्याने त्या नाटकातही काम करीत असत. शालेय जीवनात बापटआळीतील कन्याशाळेत त्यांनी शिक्षणाचे धडे गिरवले. त्यानंतर युनायटेड इंग्लिश स्कूलमधून त्या मॅट्रिक (म्हणजेच त्यावेळच्या अकरावी) झाल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. केशव हेडगेवार यांनी त्यांचे वडील अ‍ॅड. आप्पासाहेब साठे यांना राष्ट्रीय स्वयंसेवी संघाच्या शाखेचे संघचालक केले. पुढे ते कोकण विभागाचे संघचालक झाले. महाजन यांचे भाऊ अरुण साठे हे आसाममध्ये संघाचे प्रमुख प्रचारक होते. त्यांचे मेहुणे व एकता मासिकाचे पहिले संपादक रामदास कळसकर यांनी १९६५ मध्ये येथील लोकसभेची निवडणूक लढविली होती. २९ जानेवारी १९६५ रोजी अ‍ॅड. महाजन यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. महाजन हे मूळचे दापोली तालुक्यातील केळशी गावचे रहिवासी. परंतु, उद्योग व्यवसायानिमित्त ते इंदोर येथे स्थायिक झाले होते. लग्नानंतर सुमित्रा महाजन इंदोरला गेल्या. तेथील विद्यापीठात वकिली करु लागल्या. लहानपणापासूनच संघाच्या प्रवाहात वाढल्याने पुढे त्या भारतीय जनता पक्षात सक्रीय झाल्या. १९८२ ते ८५ या कालावधीत नगरसेविका, तर १९८४-८५ मध्ये त्यांनी उपमहापौरपदही भूषविले. तीन वेळा विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना अपयश आले. मात्र, १९८९ पासून सलग ८ वेळा त्या लोकसभेत निवडून आल्या. बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या महाजन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये महिला व बालकल्याण खात्याच्या राज्यमंत्री होत्या. चिपळूणमध्ये त्यांचे अनेक मित्र-मैत्रिणी आहेत. सरोज नेने, भरत भागवत यांच्यासारख्या अनेक मित्रांचा ऊर आज भरुन आला आहे. इंदोरमध्ये स्थायिक होऊनही चिपळूणजवळचा त्यांचा ओलावा कायम राहिला. येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. चिपळूणच्या साहित्य संमेलनातही त्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता. त्यांचा ऋणानुबंध आज कायम असल्याने चिपळूणवासीयांचा सन्मान झाला आहे.