शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

कोकणकन्या लोकसभेच्या सर्वोच्च स्थानी

By admin | Updated: June 7, 2014 00:44 IST

सुमित्रा महाजन

सुभाष कदम ल्ल चिपळूणचिपळुणात केवळ तिचा जन्म नव्हे तर अख्खं बालपण गेलं. आजही तिच्या बोलण्यात या मातीचा गंध येतं राहतो, त्याच चिपळूणच्या माहेरवाशिण असलेल्या सुमित्रा महाजन यांना लोकसभेच्या सर्वोच्च स्थानी विराजमान होण्याचा मान मिळालाय. चिपळूणच्या या सुकन्येने एवढंच केलं नाही, तर या लोकसभा निवडणुकीत विजय संपादन करून सलग आठवेळा निवडून येण्याचा विक्रमही रचलाय.चिपळूण तालुक्यातील शिरळसारख्या डोंगराळ, दुर्गम भागात १२ एप्रिल १९४३ रोजी जन्मलेल्या सुमित्रा महाजन या येथेच वाढल्या. चिपळूणचे प्रसिद्ध वकील आप्पासाहेब साठे यांच्या त्या कन्या. लहानपणापासूनच सुमन साठे अभ्यासात हुशार होत्या. त्यांचे वक्तृत्व उत्तम होते. उत्तम नृत्यशैली आणि नाटकाची आवड असल्याने त्या नाटकातही काम करीत असत. शालेय जीवनात बापटआळीतील कन्याशाळेत त्यांनी शिक्षणाचे धडे गिरवले. त्यानंतर युनायटेड इंग्लिश स्कूलमधून त्या मॅट्रिक (म्हणजेच त्यावेळच्या अकरावी) झाल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. केशव हेडगेवार यांनी त्यांचे वडील अ‍ॅड. आप्पासाहेब साठे यांना राष्ट्रीय स्वयंसेवी संघाच्या शाखेचे संघचालक केले. पुढे ते कोकण विभागाचे संघचालक झाले. महाजन यांचे भाऊ अरुण साठे हे आसाममध्ये संघाचे प्रमुख प्रचारक होते. त्यांचे मेहुणे व एकता मासिकाचे पहिले संपादक रामदास कळसकर यांनी १९६५ मध्ये येथील लोकसभेची निवडणूक लढविली होती. २९ जानेवारी १९६५ रोजी अ‍ॅड. महाजन यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. महाजन हे मूळचे दापोली तालुक्यातील केळशी गावचे रहिवासी. परंतु, उद्योग व्यवसायानिमित्त ते इंदोर येथे स्थायिक झाले होते. लग्नानंतर सुमित्रा महाजन इंदोरला गेल्या. तेथील विद्यापीठात वकिली करु लागल्या. लहानपणापासूनच संघाच्या प्रवाहात वाढल्याने पुढे त्या भारतीय जनता पक्षात सक्रीय झाल्या. १९८२ ते ८५ या कालावधीत नगरसेविका, तर १९८४-८५ मध्ये त्यांनी उपमहापौरपदही भूषविले. तीन वेळा विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना अपयश आले. मात्र, १९८९ पासून सलग ८ वेळा त्या लोकसभेत निवडून आल्या. बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या महाजन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये महिला व बालकल्याण खात्याच्या राज्यमंत्री होत्या. चिपळूणमध्ये त्यांचे अनेक मित्र-मैत्रिणी आहेत. सरोज नेने, भरत भागवत यांच्यासारख्या अनेक मित्रांचा ऊर आज भरुन आला आहे. इंदोरमध्ये स्थायिक होऊनही चिपळूणजवळचा त्यांचा ओलावा कायम राहिला. येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. चिपळूणच्या साहित्य संमेलनातही त्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता. त्यांचा ऋणानुबंध आज कायम असल्याने चिपळूणवासीयांचा सन्मान झाला आहे.