शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

कोकण विभागासाठी रत्नागिरीमध्ये विद्यापीठ सुरू करा, खर्डेकर कॉलेजमधील विद्यार्थ्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 15:48 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण विभागासाठी रत्नागिरी येथे स्वतंत्र विद्यापीठ सुरु करण्याच्या मागणीचे निवेदन वेंगुर्ले बॅ बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी वेंगुर्ले तहसीलदार यांना दिले.

सिंधुदुर्ग - मुंबई विद्यापीठाचा गेल्या पंधरा वर्षात शैक्षणिक दर्जा घसरत असून अनागोंदी व बेजबाबदार कारभार सुरु आहे त्यात आता राजकारण व भ्रष्टाचार घुसल्याने कोकणी विद्यार्थ्यांचे जीवन उद्ध्वस्त  होत आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण विभागासाठी रत्नागिरी येथे स्वतंत्र विद्यापीठ सुरु करण्याच्या मागणीचे निवेदन वेंगुर्ले बॅ बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी वेंगुर्ले तहसीलदार यांना दिले. बॅ बाळासाहेब खर्डेकर महाविद्याल ते वेंगुर्ले तहसीलदार कार्यालय अशी विद्यार्थ्यानी रॅली काढून सदर निवेदन वेंगुर्ले तहसील कार्यालयात नायब तहसीलदार रश्मी मठकर यांना देण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार संतोष बांदेकर,प्रा महेंद्र नाटेकर, वेंगुर्ले माजी सभापती जयप्रकाश चमणकर,प्राचार्य विलास देऊलकर,प्रा. पी. डी .होडावडेकर,प्रा.देवीदास आरोलकर, प्रा. जे .वाय नाईक, प्रा. एम. बी चौगले, प्रा. सुनिल भिसे,प्रा. जी .पी .धुरी ,प्रा आनंद बांदेकर व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.      या दिलेल्या निवेदनात विदर्भ,मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र व सोलापूर मध्ये विद्यापीठ आहे मात्र कोकण विभागासाठी विद्यापीठ नसल्याने कोकणावर हा अन्याय आहे.मुंबई महसूल विभागात कोकण विद्यापीठात भारतातून विद्यार्थी प्रवेश घेत असल्याने ते भारतीय विद्यापीठ झाले आहे त्यामुळे विद्यार्थी पालक प्राध्यापक प्राचार्य व संस्था चालक यासर्वांवर अन्याय होतो. सुरुवातीस मुंबई विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा उत्तम होता मात्र  गेल्या पंधरा वर्षापासून तो ढासळत चालला आहे. यावर्षी विद्यापीठाने ऑनलाइन पेपर तपासण्याचा निर्णय घेवून त्वरित अंमलबजावणी  केल्याने पुरवनी तपासली तर उत्तरपत्रिका तपासली नसल्याने विद्यार्थ्यांचे गुण कमी झाले त्यामुळे ४० हजार विद्यार्थ्यानी फेरतपासनीसाठी अर्ज केले २८ हजार उत्तरपत्रिका ग़ायब असून ५८ उत्तरपत्रिका तपासण्याचे काम चालू  असल्याचे जाहिर केले आहे. पुढील शिक्षण घेण्याच्या दुर्ष्टीने ३१ मे पर्यंत निकाल जाहिर होणे आवश्यक असताना संपूर्ण निकाल अजूनही लागला नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांचे एक शैक्षणिक वर्ष वाया गेले. तसेच गेल्या तीन वर्षीत नापास विद्यार्थ्यानी फेर तपासणी केल्यास बहुसंख्य विद्यार्थी पास झाल्याने विद्यापीठाची विश्वासहर्त कमी होत आहे. कोकणी विद्यार्थी शिक्षण घेवून उपजीविकेचे साधन शोधतो मात्र मुंबई विद्यापीठाच्या या अनागोंदी कारभाराने कोकणी विद्यार्थ्यांचे जीवन उध्वस्त होत असल्याने स्वतंत्र कोकण विद्यापीठ ही कोकणची गरज आहे. रत्नागिरी येथे कोकण विद्यापीठ चालू करून विद्यापीठाचे एक उपकार्यालय सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ओरस येथे तर रायगड व ठाणे जिल्ह्यासाठी पनवेल येथे उभारल्यास कोकणातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यास  मेडिकल ,इंजीनियरिग, तंत्रशिक्षण कोकणातच मिळणार.सात लाख विद्यार्थी असलेले मुंबई विद्यापीठ सुव्यवस्थित चालविणे कठीण असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई विद्यापीठाचे विभाजन करून कोकण विभागासाठी रत्नागिरी येथे स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करावे नाहीतर आंदोलन करून सुव्यवस्था धोक्यात आल्यास त्यास शासन जवाबदार राहणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. 

 

टॅग्स :collegeमहाविद्यालयMumbai Universityमुंबई विद्यापीठ