शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कोकण किनारपट्टी खवळली, मासेमारी व पर्यटनाला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2018 18:41 IST

कोकण किनारपट्टीवर वाऱ्यांचा जोर अचानक वाढल्याने भारतीय हवामान खात्याने मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मालवण-  (जि. सिंधुदुर्ग): कोकण किनारपट्टीवर वाऱ्यांचा जोर अचानक वाढल्याने भारतीय हवामान खात्याने मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. शनिवारी (२१) व रविवारी (२२) या दोन दिवसात किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात लाटा उसळणार आहेत. खोल समुद्रात वाऱ्याचा प्रभाव कमी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, मच्छिमार, सागरी पर्यटन व्यावसायिक व किनारपट्टीवरील बांधवाना मत्स्यविभाग व बंदर विभागाचा सतर्कतेचा इशारा देताना समुद्रात जाऊ नये, अशा नोटीसा बजावल्या आहेत. भरतीच्या वेळी सावध राहावे. नौका एकमेकांपासून योग्य अंतर ठेवून नांगरून सुरक्षित स्थळी (बंदरात) ठेवाव्यात. स्कुबा डायव्हिंग, पॅरासेलिंग व अन्य जलक्रीडा प्रकार तसेच किल्ला प्रवासी होडी सेवा बंद ठेवावी. नौकांनी वादळी वेळेत बंदरातील येणे-जाणे टाळावे. तसेच मच्छीमारांनी आपल्या मासेमारी नौका सुरक्षित स्थळी ठेवाव्यात, असं म्हटलं आहे. 

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर वादळी वाऱ्याचा वेग वाढल्याने मासेमारी व्यवसायासह पर्यटनाला मोठा फटका बसला. उन्हाळी हंगामातील शनिवार व रविवारी या दोन दिवशी वाऱ्यांचा जोर कायम असल्याने पर्यटन व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. भारतीय हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर सिंधुदुर्ग किनारपट्टीवर सतर्कतेच्या सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.