शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अजिंक्यताऱ्याच्या राजसदरेने अनुभवला शाहूकाल

By admin | Updated: January 13, 2016 01:08 IST

स्वाभिमान दिवस साजरा : अटकेपार झेंडे लावणाऱ्या शाहूंच्या इतिहासाचे विस्मरण नको; शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा : ‘शिवराज्याभिषेकदिन उत्सव समिती व दुर्ग संमेलन संयोजन समितीच्या वतीने गेली तीन वर्षे अजिंक्यतारा किल्ल्यावर होत असलेला सातारा स्वाभिमान दिवसाला प्रतिवर्षी प्रतिसाद वाढतो, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. भविष्यात स्वाभिमान दिवस हा संपूर्ण साताऱ्याचा महोत्सव व्हावा,’ अशी अपेक्षा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्ती केली.शिवराज्याभिषक दिन उत्सव समिती व दुर्ग संमेलन संयोजन समितीच्या वतीने अजिंक्यताऱ्यावर आयोजित चौथ्या ‘सातारा स्वाभिमान दिवस’ या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक प्रा. संभाजीराव पाटणे, नगराध्यक्ष विजय बडेकर, नगरसेविका सुजाता राजेमहाडिक, डॉ. अविनाश पोळ, सागर राजेमहाडिक, सुहास राजेशिर्के, इतिहास अभ्यासक अजय जाधवराव, माजी अभिरक्षक भास्कर मेंहदळे, म् श्रीकांत आंबेकर, डॉ. संदीप काटे, डॉ. चंद्रशेखर घोरपडे, उदय गुजर, भाजपा शहराध्यक्ष सुनील काळेकर, रिपाइंचे किशोर गालफाडे, सूर्यकांत पडवळ, कन्हय्यालाल राजपुरोहित, संयोजक सुदाम गायकवाड उपस्थित होते.शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘अटकेपार स्वराज नेणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास नव्या पिढीला अजिबात माहीत नसणे, हे दुर्दैवी आहे. मात्र, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटाच्या माध्यमातून संजयलीला भन्साळी या दिग्दर्शकाने प्रथमच शाहू महाराजांना खऱ्या अर्थाने जगभर पोहोचविले; मात्र ही बाब सातारकरांपैकी कोणीतरी करावयास हवी होती, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. स्वाभिमान दिवसाच्या निमित्ताने शाहू महाराजांच्या इतिहासाला उजळणी मिळत आहे. ही चांगली घटना आहे. पुढील वर्षी स्वाभिमान दिवस यापेक्षाही मोठ्या प्रमाणात साजरा होईल आणि त्याला सातारकर निश्चितच साथ देतील,’ अशी आशा व्यक्त केली.प्रा. संभाजीराव पाटणे यांनी ‘राजसदर आणि शाहू महाराज’ या विषयावर बोलताना संपूर्ण मराठेशाहीचा पटच इतिहासप्रेमींसमोर उलघडला. अत्यंत ओघवत्या शैलीत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचा इतिहास सांगताना प्रा. पाटणे म्हणाले, ‘साताऱ्याच्या अजिंक्यतारा किल्ल्याचे भाग्य थोर असून, युगनिर्माते छत्रपती शिवाजी महाराज हे या किल्ल्यावर तब्बल ५६ दिवस वास्तव्यास होते. दरम्यान, १९४७ मध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आजोबा छत्रपती शाहू महाराज यांनी तख्ताचा वाड्यात छत्रपती शाहू महाराज थोरले यांचा संगमरवरी पुतळा बसवण्यात यावा, अशी इच्छा औंध संस्थानला लिहिलेल्या पत्राद्वारे व्यक्त केल्याची आठवण पाटणे यांनी सांगितली. स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज आणि स्वराज्यनिर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांची भेटही याच ठिकाणी झाल्याचे ते म्हणाले.गडवाटचे अजय जाधवराव यांनीही यावेळी शाहू महाराजांच्या गौरवशाली इतिहास कथन करताना जगभरात केवळ छत्रपती शाहू महाराज हे असे एकमेव राजे आहेत, त्यांनी आपला बालपणीचा काळ कैदेत घालवला तर त्यानंतरच्या काळात त्यांनी सुमारे ४२ वर्षे खंडप्राय अशा भारत देशावर राज्य केल्याचे नमूद केले. आज पुणे येथे शाहू महाराजांच्या कालखंडातील न वाचलेली तब्बल कोटी कागदपत्रे तशीच असून, त्याचे वाचन झाल्यास शाहू महाराजांचा आणि पर्यायाने मराठेशाहीचा नवा इतिहास जगासमोर येईल, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रास्ताविकात संयोजन समितीचे दीपक प्रभावळकर यांनी केले. प्रारंभी आ. शिवेंद्रसिंहराजे, प्रा. संभाजीराव पाटणे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी नागरिकांनीही अभिवादन केले. कार्र्यक्रमास अप्पा पोरे, विशाल गायकवाड, गणेश विभूते, रणजित काळे, अतुल साळुंखे, महेश पाटील, आकाश गायकवाड, रोहन घोरपडे, महेंद्र जाधव, विश्वास कोठावळे, स्मितल प्रभावळकर उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)नगर पालिका करणार सहकार्यशिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ‘स्वाभिमान दिवस दुर्ग संमेलन संयोजन समितीच साजरा करेल. या सर्व कार्यक्रमाला पालिकेचे संपूर्ण सहकार्य राहील. हा कार्यकम खऱ्या अर्थाने सर्व सातारकरांनी साजरा करावयास हवा, असा वेगळेपणा जपणारा कार्यक्रम भविष्यात मोठा व्हावा,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली...आणि जुनी घराणी भेटली या कार्यकमाला संयोजकांच्या वतीने मूळ सातारकर असलेल्या घराण्यातील व्यक्तींना खास आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये राजेमहाडिक, राजेशिर्के, घोरपडे, जाधवराव, कोठावळे, शिकलगार या शाहूकालीन घराण्याचे सध्याचे वंशज उपस्थित होते. साताऱ्यात राहूनही अनेक वर्षे एकमेकांना न भेटलेल्या या घराण्यातील व्यक्तींना एकमेकांची विचारपूस करत गळाभेट घेतल्याचे दुर्मीळ क्षण राजसदरेने अनुभवले.ड्रोन कॅमेरा ठरले आकर्षणया संपूर्ण कार्यकमाला ज्या उत्साहाने सातारकर उपस्थित होते, तो उत्साह निश्चितच कौतुकास्पद होता. विशेष म्हणजे, प्रथमच या आगळ्यावेगळ्या सोहळ्याचे चित्रीकरण करण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला. हेलिकॉप्टरचे फिलिंग देणारा हा ड्रोन कॅमेरा कधी आकाशात उंच तर कधी उपस्थितांच्या डोक्यावरून काही फूट अंतरावर या संपूर्ण सोहळ्याचे चित्रीकरण करत होते.राजसदरेचे पालटले रूप ज्या राजसदरेने एकेकाळी वैभवाचा काळ भोगला ती राजसदर सध्या दुर्लक्षित झाली होती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कित्येक वर्षांनंतर याठिकाणी सकाळी-सकाळी सनई चौघड्यांचे मंजूळ स्वर निनादात होते, तर संपूर्ण परिसराची यानिमित्ताने केलेली स्वच्छता नजरेत भरत होती. राजसदरेला फुलांच्या माळांनी सजवल्याने या कार्यक्रमाने एक वेगळी उंची गाठली. दरम्यान, संयोजकांनी केवळ राजसदरेलाच नव्हे, तर किल्ल्याच्या महाद्वाराला तोरण बांधले.