शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

केसरकरांनी आधी स्वत:ची पत तपासावी- संजू परब

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 15:33 IST

सावंतवाडी : गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी माजी मुख्यमंत्री राणे यांची उंची तपासण्यापेक्षा पहिल्यांदा स्वत:ची राजकारणातील उंची तपासावी आणि नंतर राणेंवर टीका करावी.

सावंतवाडी : गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी माजी मुख्यमंत्री राणे यांची उंची तपासण्यापेक्षा पहिल्यांदा स्वत:ची राजकारणातील उंची तपासावी आणि नंतर राणेंवर टीका करावी. स्वत:च्या मतदारसंघात स्थानिक निवडणुकांत जिंकून येत नाही आणि मातोश्रीच्या शाबासकीसाठी राणेंवर टीका करतात, असा टोला महाराष्ट्र स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी लगावला. सावंतवाडी तालुक्यातील खुनांचा तपास पहिला लावा आणि नंतर जिल्ह्यातील खुनांचे तपास लावा, असा सल्लाही परब यांनी यावेळी दिला.स्वाभिमान पक्षाच्या तालुका कार्यकारिणीची बैठक शनिवारी पार पडली. त्यानंतर तालुकाध्यक्ष संजू परब बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक गजानन गावडे, सभापती रवी मडगावकर, शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, उपसभापती निकिता सावंत, सत्यवान बांदेकर, लहू वारंग, दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.परब म्हणाले, मंत्री केसरकर यांनी शासकीय रुग्णालयात एक महिन्यात वैद्यकीय अधिकारी भरू असे सांगितले आहे. जर खरोखरच त्यांनी वैद्यकीय अधिका-याची नेमणूक केली तर आम्ही त्यांचे स्वागतच करून त्यांच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ देऊ, असे सांगितले. अन्यथा आतापर्यंत जनतेची फसवणूक केली तशी यापुढेही करू नये. मंत्री केसरकर यांना जिल्ह्याच्या विकासापेक्षा राणेंवर टीका महत्त्वाची वाटत आहे. ते टीका करून स्वत:कडे लक्ष वेधून घेत आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. अंकुश राणे, रमेश गोवेकर यांचा तपास लावणार असे केसरकर सांगत आहेत. मग त्यांना तीन वर्षे कोणी थांबवले होते, असा सवाल करीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत अनेक खून झाले आहेत. दोडामार्ग तालुक्यातील तिहेरी हत्याकांड, कारिवडेतील सुहानी माळकर, सावंतवाडीतील आनंद गुजराती प्रकरण अशी प्रकरणे तपासाविना आहेत. त्यांच्या कुटुंबांना तरी न्याय द्या. केसरकर हे स्वत:च्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नाही ते इतरांना न्याय काय देणार, असा सवाल उपस्थित केला आहे.नगरपालिका निवडणुकीत काठावर पासनगरपालिका निवडणुकीत केसरकर काठावर पास झाले. तर पंचायत समितीत पूर्णपणे धुळ चारली. जिल्हा परिषदेमध्येही हातावर मोजण्या एवढ्याही जागा येऊ शकल्या नाहीत. याचा अर्थ राजकारणात कोणाची पत कोठे आहे ते सर्वांना कळते. ज्यांना स्वत:चा मतदारसंघ सांभाळता येत नाही तेच राणेंची किंमत काढत आहेत. राणेंवर टीका केली, तर ह्यमातोश्रीह्ण आपणास शाबासकी देते, म्हणूनच ही टीका सुरू आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर