शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली : प्राध्यापकांचे आंदोलन अधिक तीव्र करणारः बुक्टू संघटनेचा सरकारला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 11:14 IST

संपूर्ण महाराष्ट्रात महाविद्यालयीन प्राध्यापकांचे बेमुदत काम बंद आंदोलन २५ सप्टेंबरपासून सुरू झाले आहे. गेल्या सहा दिवसात आंदोलनात सहभागी झालेल्या प्राध्यापकांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे हे

ठळक मुद्देकणकवली : प्राध्यापकांचे आंदोलन अधिक तीव्र करणारः बुक्टू संघटनेचा सरकारला इशाराप्राध्यापकांच्यात जाणिवपूर्वक गोंधळाचे वातावरण तयार करण्याच्या कुटील नीतीची नोंद घेतली

कणकवली :संपूर्ण महाराष्ट्रात महाविद्यालयीन प्राध्यापकांचे बेमुदत काम बंद आंदोलन २५ सप्टेंबरपासून सुरू झाले आहे. गेल्या सहा दिवसात आंदोलनात सहभागी झालेल्या प्राध्यापकांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे हे आंदोलन आता आणखिन तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा मुंबई विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षक संघटना (बुक्टू) च्यावतीने देण्यात आला आहे.

     याबाबत प्रसिध्दिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पहिल्याच दिवशी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज्य शिक्षक तक्रार निवारण समितीची बैठक मुंबई येथे घेतली. या बैठकीला प्राध्यापकांची एमफुक्टो ही संघटना चर्चा करण्यासाठी सहभागी झाली होती. त्यामध्ये सरकारने अतिशय ढोबळ व वरवरची, संदिग्ध चर्चा केली.     

राज्यातील महाविद्यालयात अधिव्याख्याता (प्राध्यापक) यांची अत्यावश्यक पदे मोठ्या संख्येने रिक्त आहेत.  ती १००% भरण्याबाबत सरकार काहीच ठोस आश्वासन देत नाही. सरकार युजीसीच्या शिक्षक विद्यार्थी यांच्या १:२० प्रमाणाबाबत चर्चा करत नाही.

     ७१ दिवसाच्या प्राध्यापकांच्या रोखलेल्या पगाराबाबत उच्च शिक्षण विभागाने गेल्या चार वर्षांत अनेकदा याबाबतची वस्तुस्थितीदर्शक माहिती महाविद्यालयाकडून मागवलेली असूनही या बैठकीमध्ये सरकारने पगार कधी दिला जाईल याचे कोणतेही ठोस उत्तर दिलेले नाही.

         उलट, रोखलेले वेतन त्वरित देण्याचे स्पष्ट मान्य न करता, वस्तुस्थितीदर्शक प्रस्ताव सादर करू असे संदिग्ध पोकळ आश्वासन देऊन गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.       

राज्य शासकीय कर्मचारी यांच्यासोबत सातवा वेतन आयोग प्राध्यापकांना लागू करण्याचे आश्वासन देताना, युजीसीच्या चौहान समितीच्या शिफारशीसह तो जसाच्या तसा लागू होईल असे आश्वासन देण्यास मात्र जाणिवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे. याचाच अर्थ, युजीसीच्या वेतन आयोगाच्या अहवालात अनेक मोडतोडी करून शिक्षकांचे नुकसान करणाऱ्या  अटी, तरतुदी त्यात घुसडण्याचा सरकारचा विचार दिसत आहे.

           तसेच सद्याची अन्यायकारक नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना सुरू करायला तर सरकार अजिबातच तयार नाही. विनाअनुदानित व कंत्राटी शिक्षकांच्या संपूर्ण वेतनाबाबत, समान काम समान वेतन धोरणाबाबत, सरकार काहीच बोलायला तयार नाही. त्यामुळे एकंदरीतच उच्च शिक्षणमंत्र्यांसोबतची ही चर्चा पूर्णपणे निष्फळ ठरली आहे.

       यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंदोलनकर्त्या प्राध्यापकांनी सरकारच्या या प्राध्यापक हितविरोधी व प्राध्यापकांच्यात जाणिवपूर्वक गोंधळाचे वातावरण तयार करण्याच्या कुटील नीतीची नोंद घेतली आहे.

 अनेक दशकांपासून प्राध्यापकांचे हित जोपासणाऱ्या  अनुभव संपन्न, निस्वार्थी, प्रामाणिक, महासंघ म्हणजेच एमफुक्टो च्या आदेशानुसार बेमुदत काम बंद आंदोलन असेच चालू ठेवावे व ते अजून तीव्र करावे  असे आवाहन बुक्टूचे अध्यक्ष डॉ गुलाब राजे, महासचिव डॉ मधू परांजपे व सदस्य डॉ शंकर वेल्हाळ व प्रा विनोदसिंह पाटील यांनी या प्रसिध्दि पत्रकाद्वारे केले आहे.

टॅग्स :StrikeसंपProfessorप्राध्यापकsindhudurgसिंधुदुर्ग