शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

कणकवली नगरपंचायत सभा : महामार्ग ठेकेदाराच्या कार्यपद्धतीवर नगरसेवकांची नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 20:11 IST

महामार्ग चौपदरीकरणा अंतर्गत कणकवली शहरातील उड्डाणपूल पूर्ण करण्याला ठेकेदाराने अधिक प्राधान्य दिले आहे. त्यांनी अनेक गटारे बंद केली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात अनेक घरांमध्ये पाणी घुसण्याचा धोका उदभवणार आहे. असे सांगत नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

ठळक मुद्देकणकवली नगरपंचायत सभा महामार्ग ठेकेदाराच्या कार्यपद्धतीवर नगरसेवकांची नाराजी

कणकवली : महामार्ग चौपदरीकरणा अंतर्गत कणकवली शहरातील उड्डाणपूल पूर्ण करण्याला ठेकेदाराने अधिक प्राधान्य दिले आहे. त्यांनी अनेक गटारे बंद केली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात अनेक घरांमध्ये पाणी घुसण्याचा धोका उदभवणार आहे. असे सांगत नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.दरम्यान , ही समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी, ठेकेदार प्रतिनिधी आणि नगरसेवकांची संयुक्त बैठक घेण्यात येईल . असे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले.कणकवली नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा मंगळवारी नगरपंचायतीच्या प. पू. भालचंद्र महाराज सभागृहात झाली. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड उपस्थित होते.या नगरपंचायत सभेत प्रामुख्याने महामार्गाच्या संदर्भातील समस्या नगरसेवकांनी मांडल्या. गेल्या वर्षी प्रांताधिकारी कार्यालयाकडील नाला तुंबल्याने शहरातील अनेक घरात पावसाचे पाणी घुसले होते. तर जानवली नदी लगतच्या सखल भागातील घरांमध्येही पाणी जाऊन मोठे नुकसान झाले होते . यावर्षी देखील तशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.महामार्गालगतची गटारे उंच झाली आहेत. तर सांडपाणी आणि पावसाचे पाणी वाहून नेणारी गटारे सखल भागात आहेत. ही गटारे सुस्थितीत ठेवण्याबाबत महामार्ग ठेकेदाराने कोणतीही काळजी घेतलेली नाही. उलट अनेक गटारे बंद करण्यात आली आहेत. तर काही गटारांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

याबाबत महामार्ग ठेकेदाराला जाब विचारून देखील कोणतीही कार्यवाही होत नाही. चौपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर ठेकेदार निघून जाईल. मात्र सांडपाणी निचरा न झाल्यास शहरवासीयांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागेल अशी भीती कन्हैया पारकर, सुशांत नाईक, बंडू हर्णे, अभिजित मुसळे आदी नगरसेवकांनी व्यक्त केली.शहरातील पटवर्धन चौकात सातत्याने पाणी तुंबून राहते. आचरा रस्त्यावरून येणारे हे पाणी महामार्गाच्या गटारांमध्ये आणण्याची कोणतीही व्यवस्था ठेकेदाराने केलेली नाही. त्यामुळे पटवर्धन चौक परिसर सातत्याने जलमय होणार असल्याचे सुशांत नाईक म्हणाले. तर गांगोमंदिर परिसरातील नाल्याचा मार्ग वळविण्यात आला आहे. यात मसुरकर किनई रोड भागातून येणारे पाणी महामार्गाच्या गटाराला न जोडल्यास गांगोमंदिर परिसरात पाण्याला जाण्याचा मार्गच उरणार नाही. त्यामुळे येथील घरे पाण्याखाली जातील अशी भीती शिशिर परुळेकर यांनी व्यक्त केली.शहरातील महावितरण कार्यालय, एस.टी.विभागीय कार्यशाळा रस्ता याठिकाणीही महामार्गाची गटारे उंच आहेत. तर तेथे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी गटारे नाहीत. त्यामुळे यंदा देखील येथील घरांमध्ये पावसाचे पाणी जाण्याचा धोका असल्याचे कन्हैया पारकर, अभिजित मुसळे, सुशांत नाईक म्हणाले.महामार्ग समस्यांच्या प्रश्‍नावर नगराध्यक्षांनी ठेकेदार प्रतिनिधीशी चर्चा करावी असा मुद्दा कन्हैया पारकर यांनी मांडला. तर यापूर्वी अनेक बैठकी झाल्या, पण ठेकेदार मंजूर कामाव्यतिरिक्त कुठलेच काम करत नाहीत. त्यामुळे नगरपंचायतीलाच यातून मार्ग काढावा लागेल असे नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणाले.यानंतर नगरसेवकांच्या विविध सूचना, तक्रारीनंतर पुढील आठवड्यात महामार्गाचे अधिकारी, ठेकेदार आणि सर्व नगरसेवक यांची संयुक्त बैठक घेण्याचे निश्‍चित करण्यात आले. तर पावसाळ्याच्या आधी शहराच्या कुठल्याही भागात पाणी साठून राहू नये यासाठी तात्पुरती गटारे उभारण्याचे निर्देश नगराध्यक्ष नलावडे यांनी अधिकार्‍यांना दिले.गटारे सफाई करताना त्यात कर्मचारी अपघातग्रस्त होऊन मृत्यू सारख्या घटना घडू नयेत यासाठी मुख्याधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायत कर्मचार्‍यांची समिती स्थापन करण्यास सभागृहाने यावेळी मान्यता दिली. धोकादायक ठिकाणच्या गटार सफाई काम करण्यापूर्वीच्या सुरक्षेच्या उपाययोजनाबाबत ही समिती लक्ष ठेवून असणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग