शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

कणकवली बनली पुन्हा चिखलमय; नागरिक त्रस्त, अपघाताची शक्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 12:48 IST

कणकवली शहरासह परिसरात बुधवारी पहाटे पासून पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. पावसाच्या तुरळक सरी दिवसभर कोसळत असल्याने महामार्ग चौपदरीकरणांतर्गत कणकवली शहरात ठिकठिकाणी करण्यात आलेला मातीचा भराव वाहून महामार्गावर आला होता. त्यामुळे संपूर्ण महामार्गच चिखलमय बनल्याने वाहनचालक तसेच नागरिक त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देकणकवली बनली पुन्हा चिखलमय; नागरिक त्रस्तमातीचा भराव वाहून महामार्गावर, अपघात होण्याची शक्यता!

कणकवली : कणकवली शहरासह परिसरात बुधवारी पहाटे पासून पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. पावसाच्या तुरळक सरी दिवसभर कोसळत असल्याने महामार्ग चौपदरीकरणांतर्गत कणकवली शहरात ठिकठिकाणी करण्यात आलेला मातीचा भराव वाहून महामार्गावर आला होता. त्यामुळे संपूर्ण महामार्गच चिखलमय बनल्याने वाहनचालक तसेच नागरिक त्रस्त झाले आहेत.कणकवली शहरातील नागरिकांनी पावसापूर्वी महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत पाणी निचरा होण्याची सर्व कामे करावीत अशी मागणी केली होती. त्यानुसार लोकप्रतिनिधींनी महामार्ग प्राधिकरण तसेच ठेकेदार कंपनीला इशारा दिला होता. मात्र कशाचेच काहीही न वाटणाऱ्या दिलीप बिल्डकाँन या महामार्ग ठेकेदार कंपनीने आवश्यक अशी कोणतीही कामे केली नाहीत.

रामेश्वर प्लाझा नजीक असलेल्या नाल्याचे काम करण्यासाठी तेथील महामार्गच खोदण्यात आला आहे. तसेच याठिकाणी महामार्ग परिवर्तीत करण्यात आला आहे. हा महामार्ग कच्चा असल्याने तो पावसाच्या पाण्याने चिखलमय बनला आहे. त्यामुळे याठिकाणी वाहनचालकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पादचाऱ्यांना महामार्गावरून चालणे कठीण बनले आहे.पावसाच्या तुरळक सरी सध्या कोसळत असताना पाण्याचा फटका वाहन चालक आणि कणकवली परिसरातील सर्वसामान्यांना बसत आहे. जर मुसळधार पाऊस पडला तर नेमकी महामार्गाची काय स्थिती होईल ? या विचारानेच नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.महामार्ग ठेकेदार कंपनी दिलीप बिल्डकॉनचा बेजबादारपणा कणकवलीवासीयांना भोवत आहे. शहरातील मान्सूनपूर्व कामे करण्याचे आश्वासन देऊनही ते या कंपनीने पाळले नाही.त्याचा फटका आता कणकवली वासियाना बसत आहे.सर्व्हिस रोड लगत गटारे न बांधता केलेल्या कामामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून चालताना तसेच वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.महामार्ग ठेकेदाराने गटारे मोकळी न केल्याने महामार्गालगत अनेक ठिकाणी पाणी तुंबत आहे. तर दिलीप बिल्डकॉनच्या बेफिकीर वृत्तीमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

अपघात होण्याची शक्यता!पावसाच्या पाण्यामुळे महामार्गावर चिखल निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी सर्व्हिस रोड अरुंद आहे. त्यातच चिखलापासून वाचण्यासाठी पादचारी डांबरी रस्त्यावर येतात. याचवेळी अचानक एखादे वाहन आल्यास अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणने या समस्येकडे लक्ष देऊन तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

 कणकवली शहरातील महामार्ग बुधवारी पुन्हा एकदा चिखलमय झाला होता. त्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करीत प्रवास करावा लागत आहे.

टॅग्स :Rainपाऊसroad safetyरस्ते सुरक्षाsindhudurgसिंधुदुर्ग