शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!
4
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
5
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
6
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
7
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
8
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
9
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
10
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
11
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
12
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
13
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
14
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
15
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
16
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
17
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
18
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
19
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
20
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली बनली पुन्हा चिखलमय; नागरिक त्रस्त, अपघाताची शक्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 12:48 IST

कणकवली शहरासह परिसरात बुधवारी पहाटे पासून पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. पावसाच्या तुरळक सरी दिवसभर कोसळत असल्याने महामार्ग चौपदरीकरणांतर्गत कणकवली शहरात ठिकठिकाणी करण्यात आलेला मातीचा भराव वाहून महामार्गावर आला होता. त्यामुळे संपूर्ण महामार्गच चिखलमय बनल्याने वाहनचालक तसेच नागरिक त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देकणकवली बनली पुन्हा चिखलमय; नागरिक त्रस्तमातीचा भराव वाहून महामार्गावर, अपघात होण्याची शक्यता!

कणकवली : कणकवली शहरासह परिसरात बुधवारी पहाटे पासून पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. पावसाच्या तुरळक सरी दिवसभर कोसळत असल्याने महामार्ग चौपदरीकरणांतर्गत कणकवली शहरात ठिकठिकाणी करण्यात आलेला मातीचा भराव वाहून महामार्गावर आला होता. त्यामुळे संपूर्ण महामार्गच चिखलमय बनल्याने वाहनचालक तसेच नागरिक त्रस्त झाले आहेत.कणकवली शहरातील नागरिकांनी पावसापूर्वी महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत पाणी निचरा होण्याची सर्व कामे करावीत अशी मागणी केली होती. त्यानुसार लोकप्रतिनिधींनी महामार्ग प्राधिकरण तसेच ठेकेदार कंपनीला इशारा दिला होता. मात्र कशाचेच काहीही न वाटणाऱ्या दिलीप बिल्डकाँन या महामार्ग ठेकेदार कंपनीने आवश्यक अशी कोणतीही कामे केली नाहीत.

रामेश्वर प्लाझा नजीक असलेल्या नाल्याचे काम करण्यासाठी तेथील महामार्गच खोदण्यात आला आहे. तसेच याठिकाणी महामार्ग परिवर्तीत करण्यात आला आहे. हा महामार्ग कच्चा असल्याने तो पावसाच्या पाण्याने चिखलमय बनला आहे. त्यामुळे याठिकाणी वाहनचालकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पादचाऱ्यांना महामार्गावरून चालणे कठीण बनले आहे.पावसाच्या तुरळक सरी सध्या कोसळत असताना पाण्याचा फटका वाहन चालक आणि कणकवली परिसरातील सर्वसामान्यांना बसत आहे. जर मुसळधार पाऊस पडला तर नेमकी महामार्गाची काय स्थिती होईल ? या विचारानेच नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.महामार्ग ठेकेदार कंपनी दिलीप बिल्डकॉनचा बेजबादारपणा कणकवलीवासीयांना भोवत आहे. शहरातील मान्सूनपूर्व कामे करण्याचे आश्वासन देऊनही ते या कंपनीने पाळले नाही.त्याचा फटका आता कणकवली वासियाना बसत आहे.सर्व्हिस रोड लगत गटारे न बांधता केलेल्या कामामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून चालताना तसेच वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.महामार्ग ठेकेदाराने गटारे मोकळी न केल्याने महामार्गालगत अनेक ठिकाणी पाणी तुंबत आहे. तर दिलीप बिल्डकॉनच्या बेफिकीर वृत्तीमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

अपघात होण्याची शक्यता!पावसाच्या पाण्यामुळे महामार्गावर चिखल निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी सर्व्हिस रोड अरुंद आहे. त्यातच चिखलापासून वाचण्यासाठी पादचारी डांबरी रस्त्यावर येतात. याचवेळी अचानक एखादे वाहन आल्यास अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणने या समस्येकडे लक्ष देऊन तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

 कणकवली शहरातील महामार्ग बुधवारी पुन्हा एकदा चिखलमय झाला होता. त्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करीत प्रवास करावा लागत आहे.

टॅग्स :Rainपाऊसroad safetyरस्ते सुरक्षाsindhudurgसिंधुदुर्ग