शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

किनळोस गावात कोळसुंद्यांची दहशत

By admin | Updated: September 17, 2014 22:26 IST

मेंढपाळांमध्ये भीती : पाच वर्षानंतर आगमन

कडावल : किनळोस गावात पाच वर्षांनंतर कोळसुंद्यांंचे पुन्हा आगमन झाले आहे. प्रसंगी बिबट्या किंवा वाघालाही मारण्याची क्षमता असणाऱ्या या हिंस्त्र प्राण्याच्या अस्तित्वामुळे येथील मेंढपाळांच्या उरात धडकी भरली आहे. तर शेतकरी मात्र काहीसा रिलॅक्स झाला आहे. पाच वर्षांनंतरच का.... हा प्रश्न कित्येक पिढ्यांनंतर आजही अनुत्तरीत असून, या प्रकाराविषयी जनमानसात कुतूहल निर्माण झाले आहे. किनळोस ब्राम्हणस्थळ व देवाची गाळी परिसरात कोळसुंद्यांचा कळप गुराख्यांच्या दृष्टीस पडला. कळपात पूर्ण वाढ झालेले सुमारे बारा कोळसुंदे आहेत. विशेष म्हणजे, या परिसरात दर पाच वर्षांनी कोळसुंंदे प्रकट होतात. गेल्या कित्येक पिढ्यांपासून हा प्रकार सुरू आहे. कोळसुंद्यांच्या आगमनाने येथील मेंढपाळ वर्गाची पाचावर धारण बसली आहे. त्यांना भीतीच्या छायेखाली काम करावे लागणार आहे.येथील ब्राम्हणस्थळ भागात रानडुकरे, वनगाई, गवे व इतर रानटी प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्याकडून शेतीचे नुकसानही मोठ्या प्रमाणात होत आहे. कोळसुंद्यांच्या आगमनामुळे इतर प्राणी भीतीपोटी दूर जाणार असल्याने भातशेतीचे होणारे नुकसान टळणार आहे. एकंदरीत कोळसुंद्यांच्या आगमनाने मेंढपाळ वर्ग दहशतीखाली असला, तरी शेतकरी वर्ग मात्र काहीसा ‘रिलॅक्स’ झाला आहे. या प्राण्यांमुळे आतापर्यंत गावातील मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कोळसुंद्यांची शिकारही तितक्याच विशिष्ट पद्धतीने केली जाते. शिकारी लोक सावजाच्या डोळ्यात मूत्र शिंपडून त्याला प्रथम दृष्टीहीन करतात आणि मग त्याची शिकार के ली जाते. याविषयी प्रश्न उपस्थित होत असून या प्रकाराविषयी आश्चर्यही व्यक्त होत आहे. (वार्ताहर)कोळसुंद्यांचा कळप दाखलपाच वर्षांनंतर किनळोस परिसरात कोळसुंद्यांचा कळप दाखल झाला आहे. या भागात दर पाच वर्षांनंतर कोळसुंद्यांचे अस्तित्व जाणवते. काही अपवाद वगळता, गेल्या कित्येक पिढ्यांपासून हा प्रकार सुरू आहे.