शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

किनळोस गावात कोळसुंद्यांची दहशत

By admin | Updated: September 17, 2014 22:26 IST

मेंढपाळांमध्ये भीती : पाच वर्षानंतर आगमन

कडावल : किनळोस गावात पाच वर्षांनंतर कोळसुंद्यांंचे पुन्हा आगमन झाले आहे. प्रसंगी बिबट्या किंवा वाघालाही मारण्याची क्षमता असणाऱ्या या हिंस्त्र प्राण्याच्या अस्तित्वामुळे येथील मेंढपाळांच्या उरात धडकी भरली आहे. तर शेतकरी मात्र काहीसा रिलॅक्स झाला आहे. पाच वर्षांनंतरच का.... हा प्रश्न कित्येक पिढ्यांनंतर आजही अनुत्तरीत असून, या प्रकाराविषयी जनमानसात कुतूहल निर्माण झाले आहे. किनळोस ब्राम्हणस्थळ व देवाची गाळी परिसरात कोळसुंद्यांचा कळप गुराख्यांच्या दृष्टीस पडला. कळपात पूर्ण वाढ झालेले सुमारे बारा कोळसुंदे आहेत. विशेष म्हणजे, या परिसरात दर पाच वर्षांनी कोळसुंंदे प्रकट होतात. गेल्या कित्येक पिढ्यांपासून हा प्रकार सुरू आहे. कोळसुंद्यांच्या आगमनाने येथील मेंढपाळ वर्गाची पाचावर धारण बसली आहे. त्यांना भीतीच्या छायेखाली काम करावे लागणार आहे.येथील ब्राम्हणस्थळ भागात रानडुकरे, वनगाई, गवे व इतर रानटी प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्याकडून शेतीचे नुकसानही मोठ्या प्रमाणात होत आहे. कोळसुंद्यांच्या आगमनामुळे इतर प्राणी भीतीपोटी दूर जाणार असल्याने भातशेतीचे होणारे नुकसान टळणार आहे. एकंदरीत कोळसुंद्यांच्या आगमनाने मेंढपाळ वर्ग दहशतीखाली असला, तरी शेतकरी वर्ग मात्र काहीसा ‘रिलॅक्स’ झाला आहे. या प्राण्यांमुळे आतापर्यंत गावातील मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कोळसुंद्यांची शिकारही तितक्याच विशिष्ट पद्धतीने केली जाते. शिकारी लोक सावजाच्या डोळ्यात मूत्र शिंपडून त्याला प्रथम दृष्टीहीन करतात आणि मग त्याची शिकार के ली जाते. याविषयी प्रश्न उपस्थित होत असून या प्रकाराविषयी आश्चर्यही व्यक्त होत आहे. (वार्ताहर)कोळसुंद्यांचा कळप दाखलपाच वर्षांनंतर किनळोस परिसरात कोळसुंद्यांचा कळप दाखल झाला आहे. या भागात दर पाच वर्षांनंतर कोळसुंद्यांचे अस्तित्व जाणवते. काही अपवाद वगळता, गेल्या कित्येक पिढ्यांपासून हा प्रकार सुरू आहे.