शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

जेटीसाठी आरोंद्यात कांदळवनाची तोड

By admin | Updated: December 2, 2014 00:29 IST

संघर्ष समितीचा आरोप : उध्दव ठाकरेंना निवेदन

आरोंदा : आरोंदा येथे प्रस्तावित हॉटेल प्रकल्पासाठी अकृषक परवाना नाकारला होता, असे असताना त्याच ठिकाणी जेटीचा प्रकल्प होत आहे. आणि या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात कांदळवनाची तोड झाली आहे. तसेच कांदळवन प्रकारात येणाऱ्या वनस्पतीचे अवशेषही तोडले गेले आहेत. उच्च न्यायालयाने कांदळवन तोडीस पूर्णपणे बंदी घातली आहे, असे असतानाही या परिसरात जेटीमुळे झालेल्या कांदळवनाच्या तोेडीची चौकशी करा, अशी मागणी निवेदनाद्वारे आरोंदा बचाव संघर्ष समितीच्यावतीने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.या निवेदनात आरोंदा बचाव समितीने अनेक मुद्यांवर प्रकाश टाकला असून यात में. व्हाईट आॅर्चिड इस्टेट प्रा. लि. चेंबूर ही कंपनी जेटी प्रकल्प उभारत असून या प्रकल्पामुळे परिसरातील शेती बागायती नष्ट होतील. किरणपाणी नदीचे अस्तित्वच संपुष्टात येईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.आरोंदा येथे जी जेटी बांधण्यात येत आहे. ती शेतजमिनीत बांधण्यात येत असून सीआरझेडचेही मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत आहे. काहीजण सत्ता व संपत्तीच्या जोरावर ही जेटी बांधत असून शासनाला खोटी माहितीही देण्यात आली आहे. पोर्तुगीज काळापासून जेटी होती हे असत्य असून पोर्तुगीजांचा अंमल हा गोव्यात होता. तो केव्हाच आमच्याकडील बाजूला नव्हता. पण काहीजण तो चुकीच्या पध्दतीने इतिहास रंगवून जेटी प्रकल्प आणू पाहत आहेत. सध्या जी जेटी करू पाहत आहेत. तेथे नदीच्या बंधाऱ्यापासून रक्षण व्हावे, म्हणून तसेच जमिनीची धूप होऊ नये, यासाठी बंधाऱ्याला लागून नदीत ५० ते ६० मीटर अंतरावर दगडाचे ढीग निर्माण केले होते. त्याला वरली असे म्हणत. आरोंद्यापासून तळवणेपर्यंत ही वरली आजही दिसत असून यामुळे अनेक सागरी वनस्पतीही वाढल्या आहेत. या वनस्पती वाढल्याने मत्स्य उत्पादनही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे संघर्ष समितीने पत्रकात म्हटले आहे. किरणपाणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन होत आहे. खाडीपात्राची खोलीही वाढली असून यामुळे खारबंधाऱ्याला धोका उद्भवू शकतो. नजीकच्या विहिरींनाही गोड्या ऐवजी खाऱ्या पाण्याचा निचरा होऊ शकतो. या क्षेत्रात जेटीमुळे कांदळवनाचीही मोठ्या प्रमाणात तोड झाली असून या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल होऊ शकतो, पण याचे कोणी भान राखत नाही, असा आरोपही या समितीने केला आहे. या कांदळवनाची पूर्वीची माहिती हवी असल्यास सरकारने नागपूर खनिकर्मचा पूर्वीचा नकाशा बघावा म्हणजे सर्व वस्तुस्थिती उजेडात येईल, असेही या पत्रकात म्हटले आहे. हे पत्रक निवेदनाद्वारे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना दिले आहे. ठाकरे यांनी या संपूर्ण प्रकरणात शिवसेना लक्ष घालून न्याय देईल, असे आश्वासन दिले आहे.या निवेदनावर आरोंदा बचाव संघर्ष समितीच्या अविनाश शिरोडकर, प्रशांत नाईक, मनोहर आरोंदेकर, विद्याधर नाईक, शेखर पोखरे, रूपेश मठकर, हनुमंत कुबल आदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत. (वार्ताहर)