शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार अभियान..

By admin | Updated: September 20, 2015 23:42 IST

जिल्ह्यात केवळ ६ महिन्यात ५१५ कामे पूर्ण

राज्यातील सततच्या टंचाईसदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आले आहे. शासनाचे हे अभियान टंचाईमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने पडलेलं एक महत्वाचं आणि आश्वासक पाऊल आहे. राज्यभरात प्रशासनाने अभियानावर आपलं संपूर्ण लक्ष केंद्रीत केलं आहे. आजमितीस राज्याच्या ६ हजार गावांमध्ये एकूण ७० हजार जलसंधारणाची कामे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरू आहेत. अभियानाच्या अंमलबजावणीत रत्नागिरी जिल्हाही आघाडीवर असून, पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात पडणाऱ्या पावसाचे बहुतांश पाणी वाहून जाते. जलयुक्त शिवार अभियानामुळे हे पाणी गावात अडवले जाणार आहे. त्यामुळे काही अंशी पाणी प्रश्न सुटू शकणार आहे. त्याचबरोबर जमिनीत पाणी जिरल्यामुळे जिल्ह्याची सिंंचन क्षमता वाढून भात, फळपिके, कडधान्य यांच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ होऊ शकेल. यामुळेच भौगोलिक स्थिती व पीक पद्धती यांचा विचार करुन अभियानाची आखणी करण्यात आली. जिल्ह्यातील अभियानांतर्गत निवडलेल्या ४७ गावांचे सविस्तर आराखडे तयार करण्यात आले आहेत.जिल्ह्यात या अभियानाअंतर्गत एकूण ३२५८.६८ लाख इतक्या निधीपैकी १२९७.७४ लाख इतका अंमलबजावणी यंत्रणांना निधी प्राप्त झालेला आहे. यात डी. पी. डी. सी.मधून ४३७.२५ लाख, राज्य योजनेतून १४.१२ लाख, जलयुक्त शिवार अभियानातून २७८.११ लाख, एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमातून २४८.७१ लाख, महात्मा फुले जलभूमि अभियानातून १०३.८२ लाख, कोडवाहू अभियानामधून १५.७३ लाख आणि विविध संस्थांच्या सामाजिक दायित्व निधीतून २०० लाख रुपये इतका निधी प्राप्त झालेला आहे. जिल्ह्यात केवळ ६ महिन्यात ५१५ कामे पूर्णजिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत ९ तालुक्यात कृषी विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि लघुसिंंचन विभागाकडून एकूण १०९७ कामे घेण्यात आली आहेत. पैकी ५१५ कामे पूर्ण झाली आहेत. जलयुक्त शिवार अभियानात एकूण ४७ गावांपैकी रत्नागिरी तालुक्यातील ५ गावांमध्ये एकूण ६० कामांपैकी ३२ कामे पूर्ण झाली असून, २८ कामे सुरू आहेत. लांजा तालुक्यातील ५ गावांमध्ये एकूण ७८ कामांपैकी २५ पूर्ण आणि ५३ प्रगतीपथावर, राजापूर तालुक्यातील ५ गावांमध्ये १४५ कामांपैकी ४९ कामे पूर्ण आणि ९६ कामे प्रगतीपथावर, चिपळूण तालुक्यातील ५ गावांमध्ये ७७ कामांपैकी ६७ कामे पूर्ण व १० कामे प्रगतीपथावर, गुहागरमधील ५ गावांमध्ये १२४ कामांपैकी ९९ कामे पूर्ण आणि २५ कामे प्रगतीपथावर, संगमेश्वर तालुक्यातील ५ गावांमध्ये ७१ कामांपैकी ६३ कामे पूर्ण व ८ कामे प्रगतीपथावर, खेड तालुक्यातील ७ गावांमध्ये २४१ कामांपैकी ६८ कामे पूर्ण व १७३ कामे प्रगतीपथावर, दापोली तालुक्यातील ५ गावांमध्ये १२० कामांपैकी ५८ पूर्ण व ६२ प्रगतीपथावर आणि मंडणगड तालुक्यातील ५ गावांमध्ये ४४ कामांपैकी २८ कामे पूर्ण झाली असून, १६ कामे सुरू आहेत. तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या ८७ कामांपैकी ५८ कामे पूर्ण झाली आहेत तर लघु सिंंचन विभागाची दोन कामे प्रगतीपथावर आहेत. नरेगामधून एकूण ४८ कामांपैकी ३८ कामे पूर्ण व १० कामे प्रगतीपथावर आहेत.-विजय कोळीजिल्हा माहिती अधिकारी