शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

जलयुक्त शिवार अभियान..

By admin | Updated: September 20, 2015 23:42 IST

जिल्ह्यात केवळ ६ महिन्यात ५१५ कामे पूर्ण

राज्यातील सततच्या टंचाईसदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आले आहे. शासनाचे हे अभियान टंचाईमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने पडलेलं एक महत्वाचं आणि आश्वासक पाऊल आहे. राज्यभरात प्रशासनाने अभियानावर आपलं संपूर्ण लक्ष केंद्रीत केलं आहे. आजमितीस राज्याच्या ६ हजार गावांमध्ये एकूण ७० हजार जलसंधारणाची कामे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरू आहेत. अभियानाच्या अंमलबजावणीत रत्नागिरी जिल्हाही आघाडीवर असून, पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात पडणाऱ्या पावसाचे बहुतांश पाणी वाहून जाते. जलयुक्त शिवार अभियानामुळे हे पाणी गावात अडवले जाणार आहे. त्यामुळे काही अंशी पाणी प्रश्न सुटू शकणार आहे. त्याचबरोबर जमिनीत पाणी जिरल्यामुळे जिल्ह्याची सिंंचन क्षमता वाढून भात, फळपिके, कडधान्य यांच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ होऊ शकेल. यामुळेच भौगोलिक स्थिती व पीक पद्धती यांचा विचार करुन अभियानाची आखणी करण्यात आली. जिल्ह्यातील अभियानांतर्गत निवडलेल्या ४७ गावांचे सविस्तर आराखडे तयार करण्यात आले आहेत.जिल्ह्यात या अभियानाअंतर्गत एकूण ३२५८.६८ लाख इतक्या निधीपैकी १२९७.७४ लाख इतका अंमलबजावणी यंत्रणांना निधी प्राप्त झालेला आहे. यात डी. पी. डी. सी.मधून ४३७.२५ लाख, राज्य योजनेतून १४.१२ लाख, जलयुक्त शिवार अभियानातून २७८.११ लाख, एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमातून २४८.७१ लाख, महात्मा फुले जलभूमि अभियानातून १०३.८२ लाख, कोडवाहू अभियानामधून १५.७३ लाख आणि विविध संस्थांच्या सामाजिक दायित्व निधीतून २०० लाख रुपये इतका निधी प्राप्त झालेला आहे. जिल्ह्यात केवळ ६ महिन्यात ५१५ कामे पूर्णजिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत ९ तालुक्यात कृषी विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि लघुसिंंचन विभागाकडून एकूण १०९७ कामे घेण्यात आली आहेत. पैकी ५१५ कामे पूर्ण झाली आहेत. जलयुक्त शिवार अभियानात एकूण ४७ गावांपैकी रत्नागिरी तालुक्यातील ५ गावांमध्ये एकूण ६० कामांपैकी ३२ कामे पूर्ण झाली असून, २८ कामे सुरू आहेत. लांजा तालुक्यातील ५ गावांमध्ये एकूण ७८ कामांपैकी २५ पूर्ण आणि ५३ प्रगतीपथावर, राजापूर तालुक्यातील ५ गावांमध्ये १४५ कामांपैकी ४९ कामे पूर्ण आणि ९६ कामे प्रगतीपथावर, चिपळूण तालुक्यातील ५ गावांमध्ये ७७ कामांपैकी ६७ कामे पूर्ण व १० कामे प्रगतीपथावर, गुहागरमधील ५ गावांमध्ये १२४ कामांपैकी ९९ कामे पूर्ण आणि २५ कामे प्रगतीपथावर, संगमेश्वर तालुक्यातील ५ गावांमध्ये ७१ कामांपैकी ६३ कामे पूर्ण व ८ कामे प्रगतीपथावर, खेड तालुक्यातील ७ गावांमध्ये २४१ कामांपैकी ६८ कामे पूर्ण व १७३ कामे प्रगतीपथावर, दापोली तालुक्यातील ५ गावांमध्ये १२० कामांपैकी ५८ पूर्ण व ६२ प्रगतीपथावर आणि मंडणगड तालुक्यातील ५ गावांमध्ये ४४ कामांपैकी २८ कामे पूर्ण झाली असून, १६ कामे सुरू आहेत. तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या ८७ कामांपैकी ५८ कामे पूर्ण झाली आहेत तर लघु सिंंचन विभागाची दोन कामे प्रगतीपथावर आहेत. नरेगामधून एकूण ४८ कामांपैकी ३८ कामे पूर्ण व १० कामे प्रगतीपथावर आहेत.-विजय कोळीजिल्हा माहिती अधिकारी