शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

जलयुक्त शिवार अभियान..

By admin | Updated: September 20, 2015 23:42 IST

जिल्ह्यात केवळ ६ महिन्यात ५१५ कामे पूर्ण

राज्यातील सततच्या टंचाईसदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आले आहे. शासनाचे हे अभियान टंचाईमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने पडलेलं एक महत्वाचं आणि आश्वासक पाऊल आहे. राज्यभरात प्रशासनाने अभियानावर आपलं संपूर्ण लक्ष केंद्रीत केलं आहे. आजमितीस राज्याच्या ६ हजार गावांमध्ये एकूण ७० हजार जलसंधारणाची कामे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरू आहेत. अभियानाच्या अंमलबजावणीत रत्नागिरी जिल्हाही आघाडीवर असून, पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात पडणाऱ्या पावसाचे बहुतांश पाणी वाहून जाते. जलयुक्त शिवार अभियानामुळे हे पाणी गावात अडवले जाणार आहे. त्यामुळे काही अंशी पाणी प्रश्न सुटू शकणार आहे. त्याचबरोबर जमिनीत पाणी जिरल्यामुळे जिल्ह्याची सिंंचन क्षमता वाढून भात, फळपिके, कडधान्य यांच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ होऊ शकेल. यामुळेच भौगोलिक स्थिती व पीक पद्धती यांचा विचार करुन अभियानाची आखणी करण्यात आली. जिल्ह्यातील अभियानांतर्गत निवडलेल्या ४७ गावांचे सविस्तर आराखडे तयार करण्यात आले आहेत.जिल्ह्यात या अभियानाअंतर्गत एकूण ३२५८.६८ लाख इतक्या निधीपैकी १२९७.७४ लाख इतका अंमलबजावणी यंत्रणांना निधी प्राप्त झालेला आहे. यात डी. पी. डी. सी.मधून ४३७.२५ लाख, राज्य योजनेतून १४.१२ लाख, जलयुक्त शिवार अभियानातून २७८.११ लाख, एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमातून २४८.७१ लाख, महात्मा फुले जलभूमि अभियानातून १०३.८२ लाख, कोडवाहू अभियानामधून १५.७३ लाख आणि विविध संस्थांच्या सामाजिक दायित्व निधीतून २०० लाख रुपये इतका निधी प्राप्त झालेला आहे. जिल्ह्यात केवळ ६ महिन्यात ५१५ कामे पूर्णजिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत ९ तालुक्यात कृषी विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि लघुसिंंचन विभागाकडून एकूण १०९७ कामे घेण्यात आली आहेत. पैकी ५१५ कामे पूर्ण झाली आहेत. जलयुक्त शिवार अभियानात एकूण ४७ गावांपैकी रत्नागिरी तालुक्यातील ५ गावांमध्ये एकूण ६० कामांपैकी ३२ कामे पूर्ण झाली असून, २८ कामे सुरू आहेत. लांजा तालुक्यातील ५ गावांमध्ये एकूण ७८ कामांपैकी २५ पूर्ण आणि ५३ प्रगतीपथावर, राजापूर तालुक्यातील ५ गावांमध्ये १४५ कामांपैकी ४९ कामे पूर्ण आणि ९६ कामे प्रगतीपथावर, चिपळूण तालुक्यातील ५ गावांमध्ये ७७ कामांपैकी ६७ कामे पूर्ण व १० कामे प्रगतीपथावर, गुहागरमधील ५ गावांमध्ये १२४ कामांपैकी ९९ कामे पूर्ण आणि २५ कामे प्रगतीपथावर, संगमेश्वर तालुक्यातील ५ गावांमध्ये ७१ कामांपैकी ६३ कामे पूर्ण व ८ कामे प्रगतीपथावर, खेड तालुक्यातील ७ गावांमध्ये २४१ कामांपैकी ६८ कामे पूर्ण व १७३ कामे प्रगतीपथावर, दापोली तालुक्यातील ५ गावांमध्ये १२० कामांपैकी ५८ पूर्ण व ६२ प्रगतीपथावर आणि मंडणगड तालुक्यातील ५ गावांमध्ये ४४ कामांपैकी २८ कामे पूर्ण झाली असून, १६ कामे सुरू आहेत. तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या ८७ कामांपैकी ५८ कामे पूर्ण झाली आहेत तर लघु सिंंचन विभागाची दोन कामे प्रगतीपथावर आहेत. नरेगामधून एकूण ४८ कामांपैकी ३८ कामे पूर्ण व १० कामे प्रगतीपथावर आहेत.-विजय कोळीजिल्हा माहिती अधिकारी