शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

बंदर निरीक्षकांना विचारला जाब, मनसे पदाधिकाऱ्यांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 15:41 IST

मालवण : गेले काही महिने मालवण बंदरात मोडून पडलेल्या हवामान विषयक माहिती देणाऱ्या बावटाकाठीच्या दुरुस्तीकडे बंदर विभागाने दुर्लक्ष केले आहे. ...

ठळक मुद्देबंदर निरीक्षकांना विचारला जाब, मनसे पदाधिकाऱ्यांची धडक हवामान विषयक माहिती देणारी बावटाकाठी नादुरुस्त

मालवण : गेले काही महिने मालवण बंदरात मोडून पडलेल्या हवामान विषयक माहिती देणाऱ्या बावटाकाठीच्या दुरुस्तीकडे बंदर विभागाने दुर्लक्ष केले आहे. याबाबत माहिती समजताच संतप्त बनलेल्या मनसेच्या पदाधिकाºयांनी मनसे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली मालवण बंदर विभागाचे निरीक्षक अमोल ताम्हणकर यांना जाब विचारत धारेवर धरले.दरम्यान, याबाबत राजन दाभोलकर यांनी सागरी अभियंता व मेरीटाईम बोर्ड मुंबईचे मुख्य सर्व्हेअर प्रकाश चव्हाण यांच्याशी फोनवर चर्चा करीत लक्ष वेधले असता मोडलेली बावटाकाठी आणि बोयांवरील लाईट हे  दोन्ही प्रश्न चार  दिवसांच्या आत सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.मालवण बंदरातील कलंडलेली बावटाकाठी व लाईट न पेटणारे नौकायन बोया या आणि बंदरातील विविध समस्या गेले अनेक महिने सोडविल्या न गेल्याबाबत मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांनी मालवण बंदर कार्यालयात बंदर निरीक्षकांना जाब विचारला.यावेळी त्यांच्यासमवेत मनसे  तालुकाध्यक्ष विनोद सांडव, मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, शैलेश अंधारी, विल्सन गिरकर, विनायक गावडे, गुरू तोडणकर, भारती वाघ, विशाल ओटवणेकर आदी उपस्थित होते.यावेळी राजन दाभोलकर यांनी मालवण बंदरात मच्छिमारांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत मालवण बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर यांच्याबरोबर विस्तृत चर्चा केली. मालवण बंदर क्षेत्रातील समुद्रात मच्छिमारांना दिशादर्शक ठरणारे ५ नौकायन बोया स्थापित केले होते. मात्र, सध्या एकाही बोया वरील लाईट सुरू नसल्याचे राजन दाभोलकर यांनी निदर्शनास आणुन दिले.तसेच मच्छिमारांना हवामान विषयक माहिती देणारी आणि वादळी स्थितीच्या धोक्याची माहिती देणारी मालवण बंदरातील मेढा राजकोट येथील  बावटाकाठीही सद्यस्थितीत एका बाजूला कलंडली गेली आहे, असेही दाभोलकर यांनी निदर्शनास आणून दिले.चार दिवसांच्या आत समस्या सोडविण्याचे आश्वासनगेले अनेक महिने ही बावटाकाठी कलंडलेल्या अवस्थेत असून समुद्रातील मच्छिमारांना या बावटाकाठीचा कोणताही उपयोग होत नाही, असे राजन दाभोलकर यांनी सांगत नवीन मत्स्य हंगाम जवळ येऊन ठेपला असताना अद्यापही या बावटाकाठीची दुरुस्ती का झाली नाही ? असा सवाल केला.बावटाकाठी व बोयाबाबत सद्यस्थितीची माहिती बंदर निरीक्षकांनी दिल्यानंतर दाभोलकर यांनी सागरी अभियंता व महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य सर्व्हेअर प्रकाश चव्हाण यांच्याशी फोनवर चर्चा केली. दाभोलकर यांनी बंदरातील समस्यांबाबत माहिती दिल्यावर चव्हाण यांनी चार दिवसांच्या आत दोन्ही समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. 

 

टॅग्स :MNSमनसेsindhudurgसिंधुदुर्ग