शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सिंधुदुर्गातील तपासणी नाके सरसकट बंद करणे चुकीचे : नितेश राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 12:47 IST

गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्ह्यातील तपासणी नाके सरसकट बंद करण्याचा घेतलेला निर्णय पूर्णतः चुकीचा आहे.

सावंतवाडी : गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्ह्यातील तपासणी नाके सरसकट बंद करण्याचा घेतलेला निर्णय पूर्णतः चुकीचा आहे. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हे नाके पुन्हा सुरू करण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते तथा काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी आज येथे केली.मनुष्यबळ नाही, असे कारण पुढे करून जिल्ह्याच्या सीमेवरचे तसेच समुद्राच्या काठी असलेले नाके बंद केले, असे पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांनी आपल्याला सांगितले. मात्र याबाबत गृहराज्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा विचार करावी, अशी मागणी आपण केली आहे, असेही राणे यांनी यावेळी सांगितले. सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी तालुकाध्यक्ष संजू परब अशोक सावंत आदी उपस्थित होते राणे पुढे म्हणाले, गेल्या महिन्यात जिल्ह्यातील नाकी अचानक बंद करण्याचा निर्णय गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतला होता. मात्र हा त्यांचा निर्णय चुकीचा आहे सद्यस्थितीत राज्यात दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे, अशा परिस्थितीत एखाद्या दहशतवादी या ठिकाणी आल्यास त्याला तपासणार कसे किंवा ओळखणार कसे, असा प्रश्न यावेळी राणे यांनी उपस्थित केला. आपण याबाबत पोलीस अधीक्षकांची चर्चा केली आहे. त्यामुळे आता गृहखात्याने योग्य ती दखल घेऊन निर्णय घ्यावा, असे राणे यांनी सांगितले.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे