शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
4
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
5
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
6
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
7
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
8
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
9
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
10
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
11
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
12
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
13
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
14
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
15
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
16
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
17
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
18
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
19
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
20
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार

फुकटचे श्रेय घेणे शिवसेनेच्या नेत्यांसाठी अशोभनीय-राजन तेली यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 16:40 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सत्ताधारी सर्व बाबींमध्ये राजकारण करण्यात दंग आहेत. तर प्रशासन सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. भाजपाने कोरोनाच्या संकट काळात स्वखर्चातून गरजूंपर्यंत मदत पोहचवली. मात्र, शासकीय खर्चातून केलेल्या मदतीची छायाचित्रे काढून प्रसिद्धी मिळवीत त्याचे फुकटचे श्रेय घेणे शिवसेनेच्या नेत्यांसाठी अशोभनीय आहे अशी टीका भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी येथे केली.

ठळक मुद्देफुकटचे श्रेय घेणे शिवसेनेच्या नेत्यांसाठी अशोभनीय !भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची टीका

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सत्ताधारी सर्व बाबींमध्ये राजकारण करण्यात दंग आहेत. तर प्रशासन सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. भाजपाने कोरोनाच्या संकट काळात स्वखर्चातून गरजूंपर्यंत मदत पोहचवली. मात्र, शासकीय खर्चातून केलेल्या मदतीची छायाचित्रे काढून प्रसिद्धी मिळवीत त्याचे फुकटचे श्रेय घेणे शिवसेनेच्या नेत्यांसाठी अशोभनीय आहे अशी टीका भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी येथे केली.कणकवली येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत, युवा मोर्चा जिल्हा संघटन सरचिटणीस संदीप मेस्त्री , कणकवली युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गणेश तळगावकर आदी उपस्थित होते.यावेळी राजन तेली म्हणाले, कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर केंद्र व राज्य नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली भाजपाने सिंधुदुर्गात अनेक सेवाभावी कामे केली. ५५ हजार लोकांपर्यंत विविध प्रकारची मदत पोचविली. तसेच जनता आत्मनिर्भर होण्यासाठी भाजपाने प्रयत्न सुरू केले आहेत.२० लाख होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप आमदार नितेश राणे, आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वतीने भाजपाने जिल्ह्यात केले. अलीकडेच झालेल्या जिल्हापरिषदेच्या सभेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शासनाच्या माध्यमातून होमिओपॅथी गोळ्या अजून खरेदी केल्या नसल्याचे स्पष्ट केले. मग सत्ताधाऱ्यांनी होमिओपॅथी गोळ्या वाटपाची जी छायाचित्रे काढून प्रसिद्धी माध्यमांद्वारे प्रसिद्ध केली त्या गोळ्या कोठून आल्या ? असा सवाल राजन तेली यांनी यावेळी उपस्थित केला.ते पुढे म्हणाले, आमदार नितेश राणे,आमदार रवींद्र चव्हाण व भाजपाच्या माध्यमातून १५ टन हळद बियाणे वाटप करण्यात आले. तर सत्ताधारी आमदार व नेते चांदा ते बांदा योजनेतून हळदवाटप करून पत्रकबाजी करीत आहेत . त्यांनी असे करण्यापेक्षा जिल्हावासीयांसाठी ठोस असे काही तरी काम करावे.सिंधुदुर्गचे सुपुत्र असलेले शिवसेनेचे आरोग्यमंत्री गेली पाच वर्ष पदभार सांभाळत होते. मात्र , तरीही सिंधुदुर्गात आरोग्य व्यवस्था ढेपाळलेलीच आहे. अनेक पदे रिक्त आहेत. निदान आता तरी त्यांनी आरोग्य व्यवस्था सुधारावी.जिल्हयात १६ हजार २८० टन खताची मागणी असताना फक्त ७ हजार टन खत उपलब्ध झाले आहे.

केंद्र सरकार खत द्यायला तयार आहे. मात्र सत्ताधारी आणि जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना खत उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे अनेक खरेदीविक्री संघाचे पदाधिकारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. तर शेतकऱ्यांनी खता अभावी काय करायचे ? असा प्रश्न आता उभा राहिला आहे. पालकमंत्र्यांनी आता तरी या समस्यांकडे लक्ष द्यावे.असेही राजन तेली यावेळी म्हणाले.मल्टिव्हिटॅमिन बी ज्युसचे वाटप !तातू सीताराम राणे ट्रस्टच्या माध्यमातून सिंधुदुर्गात ३५ हजार लोकांना आरोग्यवर्धक मल्टीव्हिटॅमिन बी ज्यूसचे वाटप करण्यात येणार आहे. कोरोना संसर्गाच्या काळात प्रतिकार शक्ती वाढवत आरोग्य जपणे आवश्यक आहे.

रूग्णालयात उपचार घेत असलेल्या तसेच संस्थात्मक क्वॉरंटाईन असलेल्या लोकांना या मल्टीव्हिटॅमिनची असलेली गरज ओळखून माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून हे मल्टीव्हिटॅमिन बी ज्यूस उपलब्ध करून दिले आहे.भाजपच्या वतीने त्याचे वाट केले जाणार आहे. भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून जिल्ह्यात जिल्हा परिषद मतदार संघ निहाय 'मल्टीव्हिटॅमिन बी' चे वाटप केले जाणार आहे.असे यावेळी राजन तेली यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गRajan Teliराजन तेली BJPभाजपा