शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
6
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
7
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
8
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
9
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
10
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
11
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
12
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
13
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
14
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
16
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
17
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
19
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
20
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

हत्तींचा प्रश्न कायमचा निकाली निघेल, उदय सामंत यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 10:51 IST

दोडामार्ग तालुक्यातील केर, भेकुर्ली, मोर्ले आणि घोडगेवाडी गावांमध्ये हत्तींचा प्रश्न मोठा आहे. या प्रश्नावर प्रभावी उपाययोजना होणे गरजेचे आहे. त्यामुळेच हा प्रश्न कायमचा निकाली निघेल, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी दोडामार्ग तालुक्यातील केर येथे केले.

ठळक मुद्दे हत्तींचा प्रश्न कायमचा निकाली निघेल, उदय सामंत यांची ग्वाहीदोडामार्गमधील केर, मोर्ले गावातील नुकसानीची पाहणी

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील केर, भेकुर्ली, मोर्ले आणि घोडगेवाडी गावांमध्ये हत्तींचा प्रश्न मोठा आहे. या प्रश्नावर प्रभावी उपाययोजना होणे गरजेचे आहे. त्यामुळेच हा प्रश्न कायमचा निकाली निघेल, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी दोडामार्ग तालुक्यातील केर येथे केले. हत्तींमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री सामंत यांनी केर, मोर्ले या गावांना भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी पालकमंत्री सामंत यांच्यासमवेत खासदार विनायक राऊत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, पे्रमानंद देसाई, केरच्या सरपंच मिनल देसाई, मोर्लेचे सरपंच महादेव गवस यांच्यासह कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. क्लेमेंट बेन, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, उपवनसंरक्षक समाधान चव्हाण, सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, दोडामार्गचे तहसीलदार संजय कर्पे आदी उपस्थित होते.पालकमंत्री सामंत पुढे म्हणाले, हत्तींच्या प्रश्नावर वनविभागाने हत्ती कॅम्पसाठी प्रस्ताव तयार केला आहे. हत्तींसाठी कॅम्प उभारून त्यात त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. या कॅम्पच्या उभारणीसाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा. त्यासाठी राज्य शासनाच्या स्तरावर लागणारे सर्व परवाने व मंजुरी तातडीने देण्यात येतील. केंद्र शासनाच्या स्तरावर खासदार विनायक राऊत स्वत: लक्ष घालतील व हा कॅम्प लवकरात लवकर सुरू होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.विनायक राऊत म्हणाले, हत्ती कॅरिडॉर तयार करावा. त्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा. प्रस्ताव तयार करण्याच्या कामाचे वेळापत्रक बनवून त्याप्रमाणे नियोजनबद्ध प्रस्ताव करावा. त्यास केंद्रस्तरावरून मंजुरी देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न मी लक्ष घालून करीन. हत्तींमुळे बाधित झालेल्या सर्व गावांना हत्तीमुक्त करणे हेच ध्येय आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.दौरा ग्रामस्थांना फायदेशीर व्हावायापूर्वी हत्तींच्या प्रश्नावर सुरू करण्यात आलेल्या उपाययोजना जसे सोलर फेन्सिंग, ग्रामस्थांना सोलर बॅटरी पुरविणे ही कामे तातडीने पूर्ण करून घ्यावीत. सोलर फेन्सिंगचे २ किलोमीटरचे काम तातडीने पूर्ण करावे.ग्रामपंचायतींनी दोन दोन लाखांची टेंडर काढून सोलर बॅटरी वाटपाचे काम पूर्ण करावे. गस्त घालण्यासाठी ग्रामस्थांना वनविभागाने सोबत घ्यावे. त्यांना तशा नेमणुका द्याव्यात.नुकसान भरपाईसाठी नव्याने तयार केलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा करावा. हत्ती प्रश्नावर काही नवीन सूचना असल्यास त्याचे स्वागत आहे. पण अशा सूचना परिपूर्ण असाव्यात, अशा सूचना सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.आता हत्तींचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी लवकरच उपाययोजना कराव्यात. माझा आजचा दौरा हा ग्रामस्थांना फायदेशीर व्हायला हवा, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतsindhudurgसिंधुदुर्ग