शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
3
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
4
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
5
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
6
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
7
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
8
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
9
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
10
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
11
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

शक्तिपीठ महामार्गावरून सावंतवाडीतील जनतेला धोका?, डॉ. जयेंद्र परुळेकर यांची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 14:41 IST

जनतेची दिशाभूल सुरू असल्याचा आरोप

सावंतवाडी : चष्मा कारखाना, सेटऑप बॉक्स, मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल यांसारख्या आश्वासनांप्रमाणे शक्तिपीठ महामार्ग मळगाव आणि तिलारीकडे विभागून नेणार, असे गाजर दाखवून सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर जनतेची पुन्हा एकदा दिशाभूल करत आहेत, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परूळेकर यांनी बुधवारी प्रसिद्धीपत्रकातून केला आहे.डाॅ. परुळेकर यांनी म्हटले की, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, युवा वर्गात वाढत चाललेली व्यसनाधीनता, आरोग्य व्यवस्थेची खराब स्थिती व परप्रांतीय लोकांच्या ताब्यात जाणाऱ्या जमिनी हे मतदारसंघामधील जनतेचे वेगळेच प्रश्न आहेत, मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यांनी पुढे सांगितले की आमदारांनी शक्तिपीठ महामार्गाचा मार्ग बदलून आंबोलीमार्गे मळगाव किंवा झिरो पॉइंट येथे आणि तिथून तिलारी व रेडी जेटीपर्यंत नेण्याची विनंती सरकारला केली आहे, परंतु ही एक निव्वळ भूलथाप आहे.ज्या सरकारच्या काळात राज्यातील कंत्राटदारांचे ९० हजार कोटी रुपये आणि जिल्ह्यातील कंत्राटदारांचे ५०० कोटी रुपये थकले आहेत, अशा परिस्थितीत ८६ हजार कोटी रुपयांच्या या महामार्गाची गरज कोणाला आहे? हा महामार्ग जनतेच्या किंवा पर्यटनाच्या फायद्यासाठी नाही, तर सत्ताधारी राज्यकर्त्यांचे उखळ पांढरे करण्यासाठी आहे का? असा शंका त्यांनी व्यक्त केली.डॉ. परुळेकर यांनी एक धक्कादायक बाबही समोर आणली आहे की, भविष्यात सावंतवाडी तालुक्यातून तब्बल सहा महामार्ग जाणार आहेत. यात मुंबई-गोवा महामार्ग, शक्तिपीठ महामार्ग, सागरी महामार्ग, संकेश्वर-बांदा महामार्ग, पनवेल-बांदा महामार्ग आणि सह्याद्री महामार्ग यांचा समावेश आहे.

आमदारांचे मतदारसंघाकडे दुर्लक्षवीजपुरवठा खंडित होणे, युवा वर्गात वाढती व्यसनाधीनता, आरोग्य व्यवस्थेची दुरवस्था आणि परप्रांतीय लोकांकडून मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी होत असल्याच्या गंभीर समस्या याकडे आमदारांचे लक्ष नाही, असं डॉ. परुळेकर यांनी म्हटले आहे।