शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सिंधुदुर्ग : गंधर्व फाऊंडेशनचे कार्य दखलपात्र : दिलीप पांढरपट्टे यांचे गौरवोद्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 12:30 IST

एखाद्या कलेचा प्रसार म्हणजे माणसातल्या माणूसपणाचा त्याच्या चांगुलपणाचा प्रसार करण्यासारखे आहे. गंधर्व फाऊंडेशन सारख्या ज्या संस्था संगीत क्षेत्रात कार्य करतात त्यांच्याबद्दल मला खरोखर आदर वाटतो. त्यांचे हे कार्य दखलपात्र असे असून त्यांचा आदर्श सर्वानी घेणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी येथे केले.

ठळक मुद्देगंधर्व फाऊंडेशनचे कार्य दखलपात्र : दिलीप पांढरपट्टे यांचे गौरवोद्गार गंधर्व शास्त्रीय संगीत सभेची द्वितीय वर्ष पूर्ती

कणकवली : एखाद्या कलेचा प्रसार म्हणजे माणसातल्या माणूसपणाचा त्याच्या चांगुलपणाचा प्रसार करण्यासारखे आहे. गंधर्व फाऊंडेशन सारख्या ज्या संस्था संगीत क्षेत्रात कार्य करतात त्यांच्याबद्दल मला खरोखर आदर वाटतो. त्यांचे हे कार्य दखलपात्र असे असून त्यांचा आदर्श सर्वानी घेणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी येथे केले.आशिये येथील श्री दत्त क्षेत्र येथे गंधर्व शास्त्रीय संगीत सभेच्या द्वितीय वर्ष पूर्ती निमित्त कणकवली येथील गंधर्व फाऊंडेशनच्यावतीने आयोजित कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते.दिलीप पांढरपट्टे पुढे म्हणाले, गंधर्व संगीत सभेसारख्या उपक्रमांना पाठबळ देणे हे आमचे कर्तव्यच आहे. त्यामुळेच या कार्यक्रमाला मी आवर्जून उपस्थित राहिलो आहे. या उपक्रमाला लाभलेला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद हा वाखाण्याजोगा आहे. संगीताच्या ओढीने जमलेल्या गर्दी आणि दर्दीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. वास्तविक पहाता कलेचा आनंद घेणे महत्वाचे असते. कला ही आनंद देण्यासाठी असते. जो कलाकार आहे किंवा जो रसिक आहे, तो माणूस दुष्ट, क्रूर , वाईट असूच शकत नाही. असेही पांढरपट्टे यावेळी म्हणाले.या कार्यक्रमात प्रसाद घाणेकर यांनी ओघवत्या शैलीत प्रास्ताविक केल्यानंतर ,गंधर्व फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय खडपकर यांनी संस्थेच्या वाटचालीचा लेखाजोखा मांडला. तसेच या उपक्रमातून कानसेन रसिक तयार होतीलच ,परंतु त्याही पुढे इथे उपस्थित अनेक नव्या कलावंतांना कलासाधनेची प्रेरणा या उपक्रमातुन मिळेल आणि त्यातूनच भविष्यातील कलाकार घडतील असा आशावाद व्यक्त केला.यानंतर शास्त्रोक्त संगीतात, संवादिनी वादन आणि संवादिनीचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या आणि स्वतःची कला जोपासत इतर अनेक नव्या कलावंतांना ऊर्जा देणाऱ्या आदित्य ओक यांना युवा गंधर्व सन्मान जिल्हाधिकारी तथा सुप्रसिद्ध गजलकार दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. शाल श्रीफळ, पाच हजार रुपयांचा धनादेश व स्मृतिचिन्ह असे या सन्मानाचे स्वरूप होते .दिलीप पांढरपट्टे यांचाही विलास खानोलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. २४ वी गंधर्व संगीत सभा व युवा गंधर्व सन्मानाचे प्रायोजक प्रतिथयश लेखापाल दामोदर खानोलकर यांनी उपस्थित पाहुण्यांचे व कलाकारांचे स्वागत केले व आभार मानले .यानंतर प्रसाद घाणेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत आदित्य ओक यांनी लक्षवेधी विधाने केली. कलावंताने आजच्या युगात तंत्रज्ञानाशी मैत्री केली पाहिजे. कारण ती जगाची भाषा आहे. कला आणि तंत्र या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे सांगत गंधर्व सभेच्या वेळ पाळण्याचे विशेष कौतुक करत, अनेक गमतीजमती सांगत, मुलाखतीला रंगत आणली .

'ज्याचे दफ्तर आणि मन व हृदय साफ आहे, अशा सृजनशील कलावंत आणि अधिकाऱ्याच्या हस्ते झालेला हा सत्कार माझ्या कायम मनात राहील अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. यानंतर झालेल्या आदित्य ओक यांच्या संवादिनी वादनात प्रथम त्यांनी शुद्ध मध्यमाचा मारवा सादर करीत ,पुढे एकामागे एक अशी नाट्यपदे व अभंग सादर केले व भैरवीने सांगता केली .दत्तक्षेत्र आशिये मठ येथील सभागृहात रंगलेली हि मैफल यशस्वी होण्यासाठी किशोर सोगम ,संतोष सुतार ,गिरीश सावंत, शाम सावंत, अभय खडपकर, राजू करंबेळकर, मनोज मेस्त्री ,बाबू गुरव, सागर महाडिक, मिलिंद करंबेळकर, विनोद दळवी, सुनील आजगावकर यांनी विशेष प्रयत्न केले .पुढील गंधर्व सभा 30 डिसेंबर रोजी!आशिये येथे ३० डिसेंबर रोजी मासिक गंधर्व संगीत सभे अंतर्गत जगत् विख्यात तबला वादक पं.रामदास पळसुले यांचे तबला वादन होणार आहे. असे यावेळी जाहिर करण्यात आले. 

टॅग्स :musicसंगीतsindhudurgसिंधुदुर्ग