शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

अंगणवाडी आहार पुरवठादाराची चौकशी करा : दुर्वा खानविलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2020 3:59 PM

शासनाकडून अंगणवाडीतील बालकांसाठी दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा आहे, असा आरोप करीत पुरवठादाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी पंचायत समितीच्या उपसभापती दुर्वा खानविलकर यांनी मासिक सभेत केली.

ठळक मुद्देअंगणवाडी आहार पुरवठादाराची चौकशी करा : दुर्वा खानविलकरनिकृष्ट पोषण आहार पुरविल्याचा  आरोप; पंचायत समितीची झूम सभा यशस्वी

वैभववाडी : शासनाकडून अंगणवाडीतील बालकांसाठी दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा आहे, असा आरोप करीत पुरवठादाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी पंचायत समितीच्या उपसभापती दुर्वा खानविलकर यांनी मासिक सभेत केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समितीची सभा झूम अ‍ॅपवर झाली. या सभेला सभापती अक्षता डाफळे, उपसभापती दुर्वा खानविलकर, पंचायत समिती सदस्य अरविंद रावराणे, लक्ष्मण रावराणे, हर्षदा हरयाण, गटविकास अधिकारी विद्या गमरे, सहाय्यक गटविकास अधिकारी शुभदा पाटील यांची आॅनलाईन उपस्थिती होती.तालुक्यातील अंगणवाड्यांमार्फत लहान बालकांच्या पोषणासाठी आहार दिला जातो. यामध्ये विविध प्रकारची कडधान्ये, तेल आदींसह विविध वस्तूंचे कीट असते. परंतु सध्या दिला गेलेला आहार हा निकृष्ट आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून पुरवठादारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खानविलकर यांनी केली. यावेळी महिला बालविकास विभागाच्यावतीने चौकशी करण्यात येईल, असे सांगण्यात आले.कोरोनाच्या काळातील वीज बिले वाढीव आली आहेत. या बिलांमध्ये ग्राहकांना काही सवलत मिळणार आहे का? असा सवाल करीत वीज बिले भरायची की नाहीत? अशी विचारणा सदस्य रावराणे यांनी केली. त्यावेळी उपअभियंता जयकुमार कथले यांनी शासनाकडून यासंदर्भात अद्याप कुठल्याही प्रकारच्या सूचना प्राप्त नसल्याचे सांगितले.तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. यापैकी अनेक शेतकऱ्यांच्या भातशेतीचा विमा आहे. त्यांना भरपाई मिळणे आवश्यक आहे. कृषी विभागाने कोणती कार्यवाही केली? असे रावराणे यांची विचारले असता तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी विमा कंपनीकडे प्रस्ताव पाठविला असल्याचे स्पष्ट केले.ओरोस येथून अहवाल येण्यास विलंबकोविड सेंटर आणि विलगीकरण कक्षामध्ये नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. दोन्ही ठिकाणी अस्वच्छता आहे. वेळोवेळी सांगूनही त्यामध्ये कोणतीच सुधारणा झालेली नाही. याशिवाय तालुक्यातील कोरोना अहवाल उशिरा येत असल्याचा मुद्दा रावराणे यांनी उपस्थित केला. त्यावर ग्रामीण रूग्णालयाचे डॉ. नवनाथ कांबळे यांनी कोविड सेंटरमध्ये दररोज स्वच्छता केली जाते. कोरोना तपासणीसाठी घेतलेले स्वॅब इथून वेळेत ओरोसला जातात; परंतु तेथूनच अहवाल येण्यास विलंब होतो. ओरोस लॅबमध्ये रुग्ण आढळल्याने हा प्रकार घडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.ग्रामसेवकाला नोटीस द्यावी : रावराणेतालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ७० असून सक्रिय रुग्णांची संख्या ३९ आहे. ३१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश पाटील यांनी सभेत दिली. तिरवडेतर्फ सौंदळ सरपंचांना विलगीकरणावरून झालेल्या त्रासाला ग्रामसेवक जबाबदार आहेत. त्या ग्रामसेवकाला नोटीस द्यावी, अशी मागणी रावराणे यांनी केली.कुसूर येथील अतिक्रमण हटवाकुसूर बाजारवाडी येथून मुख्य रस्त्यापासून ग्रामपंचायतीकडे जाणारा मार्ग जिल्हा परिषदेच्या मालकीचा आहे. मात्र, त्या मार्गावर अतिक्रमण करण्यात आले असल्याने रहदारीस बंद झाला आहे. त्यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवून अतिक्रमण हटवावे, अशी मागणी अरविंद रावराणे यांनी सभेत केली.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीvaibhavwadiवैभववाडीsindhudurgसिंधुदुर्ग