शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

उन्हाळी हंगामासाठी एसटीच्या १२ जादा बसेस- प्रकाश रसाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 11:51 IST

पर्यटन हंगाम आणि शाळांना सुट्टी पडल्याने प्रवाशांच्या मागणीनुसार १५ एप्रिल ते १५ जून या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी १२ जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत.  तसेच मुंबई-सिंधुदुर्ग अशा ३ बसेस नियमितपणे सुरू असून एकुण १५ बसेस चाकरमान्यांच्या सेवेत

ठळक मुद्देआॅनलाईन बुकींगची प्रवाशांना संधी

कणकवली :पर्यटन हंगाम आणि शाळांना सुट्टी पडल्याने प्रवाशांच्या मागणीनुसार १५ एप्रिल ते १५ जून या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी १२ जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत.  तसेच मुंबई-सिंधुदुर्ग अशा ३ बसेस नियमितपणे सुरू असून एकुण १५ बसेस चाकरमान्यांच्या सेवेत असणार आहेत. महाराष्ट्र परिवहन विभागाच्या बसेसचे बुकींग आॅनलाईन करण्याची संधी प्रवाशांना आहे.  ग्रामीण भागातही वाढत्या भारमानानुसार जादा बसेस सोडण्यात येतील़ दररोजच्या मुख्य चार मार्गांवर जादा बसेस सोडण्यात आल्याची माहिती एसटीचे सिंधुदुर्ग  विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिली़

       कणकवली येथिल विभागीय कार्यालयात  प्रकाश रसाळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी अभिजित पाटील उपस्थित होते. प्रकाश रसाळ म्हणाले, उन्हाळी हंगाम हा चाकरमानी आणि पर्यटकांसाठी महत्वपुर्ण आहे.  त्या दृष्टीने एसटी प्रशासनाने पुढील दोन महिन्यांचे नियोजन केले आहे. विविध मार्गावर जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत़ त्यामध्ये कुडाळ-विजापूर २ बसेस, पणजी-निगडी, पणजी-अक्कलकोट, कणकवली-बोरिवली, देवगड-बोरिवली, कुडाळ-बोरिवली, मालवण - निगडी, कणकवली-बेळगाव तसेच रत्नागिरी, इचलकरंजी, गणपतीपुळे, कोल्हापूर या चार लांबपल्याच्या मार्गावर जादा बसेस भारामानानुसार  सोडण्यात आल्या आहेत. या बसेसमध्ये लोकसभा निवडणुकीकरता २४० गाड्या आरक्षित करण्यात आल्यामुळे २२ व २३ एप्रिल रोजी काही प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता असल्याचे प्रकाश रसाळ यांनी सांगितले़  .

       सध्या नियमित विजयदुर्ग-मुंबई, मालवण-मुंबई, देवगड-बोरिवली या तीन गाड्या सुरू आहेत़. तसेच नवीन १२ बसेसची सुरूवात करण्यात आली आहे.

          सिंधुदुर्गात सावंतवाडी-कणकवली, कणकवली-देवगड, मालवण-कुडाळ, कुडाळ-सावंतवाडी या मार्गावर वाढीव भारमानाची  आकडेवारी घेऊन सध्या जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. लग्न समारंभासाठी एप्रिलमध्ये १० गाड्या, मे मध्ये १३ गाड्या आणि जून मध्ये १५ गाड्या बुकींग करण्यात आल्या आहेत़ आतापर्यंत ३८ दिवसांचे बुकींग लग्न समारंभासाठी करण्यात आल्याचे अभिजित पाटील यांनी यावेळी सांगितले.तर एसटी च्या या सेवेचा लाभ जास्तीत जास्त प्रवाशानी घ्यावा असे आवाहन प्रकाश रसाळ यांनी केले आहे. 

टॅग्स :state transportएसटीkonkanकोकण