शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

सायबर क्राईमची वाढती शृंखला; पोलीस हतबल

By admin | Updated: August 25, 2014 22:53 IST

ग्राहकांची उडाली झोप : पोलीस यंत्रणेला गुन्ह्याचे धागेदोरे मिळणे झाले अवघड

रत्नागिरी : सध्या सायबर गुन्हेगारीने अवघ्या जगाची झोप उडविली आहे. एटीएमचा पासवर्ड कळताच संबंधित ग्राहकाच्या खात्यावरून हजारो रूपये हातोहात लंपास करण्याचे प्रकार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. मात्र, याबाबत नागरिकांना सतर्क करून स्वत:ही तत्पर असण्याची अपेक्षा असलेले पोलीस या गुन्हेगारीने हतबल झालेले दिसत आहेत. त्यामुळे ग्राहकांना असे बनावट फोन आले आणि ते पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेले. ‘पैसे गेले नाहीत ना, पैसे गेले तरच लेखी तक्रार नोंदवायला या’ अशी भूमिका पोलिसांची असल्याने आता असे बनावट फोन आले तरी पोलिसांकडे जाच कशाला, अशी नागरिकांची मानसिकता होऊ लागली आहे.सध्या सर्वच बँकांच्या काही ग्राहकांना अनोळखी भ्रमणध्वनीवरून फोन येत आहेत. त्यावरून काही कारण सांगून त्या ग्राहकांच्या एटीएमचा पासवर्ड विचारण्याचा प्रयत्न केला जातो. काही ग्राहकांनी फोन करणाऱ्या या व्यक्तिला आपला पासवर्ड क्रमांक सांगूनही टाकला. त्यामुळे त्यांच्या खात्यावरील पैसे परस्पर काढले गेले आहेत. हे प्रकार वाढल्याने बँकांनी खबरदारी म्हणून बँकांमध्ये, परिसरात अशा फोनवर विश्वास न ठेवण्याचे फलक लावले आहेत.तरीही असे फोन येतच आहेत. काहींची फसवणूकही होत आहे. मात्र, ज्यांना फोन आले आणि काही ग्राहक त्यामुळे सावध झाले आणि इतरांनाही सावध करण्यासाठी त्या भ्रमणध्वनी क्रमांकाचा शोध घ्यावा, म्हणून पोलिसांकडे गेले तर तिथे वेगळाच अनुभव आला. रत्नागिरी येथील पोलीस ठाण्यात गेल्या दोन - तीन महिन्यांत अशा प्रकारच्या तक्रारी नोंदवण्यात आलेल्या आहेत. मात्र, ज्यांचे पैसे गेले आहेत, त्यांच्याच तक्रारी नोंदवून घेतल्या जातात. पण, ज्यांना फोन आले आणि त्यांनी सावध होऊन आपले पासवर्ड दिले नाहीत, त्यांचे खाते ‘सेफ’ राहिले. तरीही अशांनी हा नंबर पोलिसांना देण्यासाठी सहकार्य दाखविले. मात्र, त्याबाबत पोलिसांचच उदासीनता दिसून येते.हे नंबर सर्रास इतर राज्यातून आलेले आहेत. त्यामुळे पोलिसांना त्यांचा माग काढणे अतिशय अवघड आहे. मात्र, हे मोबाईल नंबर कुठचे आहेत, हे कळू शकते, तर पोलीस यंत्रणा पुढचा छडा लावण्याची तयारी का दाखवत नाहीत, असा सवाल उठत आहे. खरंतर काळानुरूप या यंत्रणेनेही ‘अपडेट’ असायला हवे. मुख्य म्हणजे किती पोलिसांना इंटरनेटची माहिती आहे, हा संशोधनाचा मुद्दा आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बँकांची एटीएम सेवा धोक्यात आहे. असे असताना एटीएम जास्त आणि सुरक्षारक्षक कमी तेही शस्त्रधारी न ठेवता दंडुकाधारी. त्यामुळे एटीएम यांची, पैसे हे कमावणार, मग त्यांच्यावर निगराणी मात्र आम्ही ठेवणार, असा पोलिसांचा रोष बँकांवर दिसून येत आहे. त्यामुळेही पोलिसांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. मात्र, सायबर क्राईमच्या या नव्या संकटाने सर्व बँकांच्या ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे, एवढे नक्की. (प्रतिनिधी)