शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

सायबर क्राईमची वाढती शृंखला; पोलीस हतबल

By admin | Updated: August 25, 2014 22:53 IST

ग्राहकांची उडाली झोप : पोलीस यंत्रणेला गुन्ह्याचे धागेदोरे मिळणे झाले अवघड

रत्नागिरी : सध्या सायबर गुन्हेगारीने अवघ्या जगाची झोप उडविली आहे. एटीएमचा पासवर्ड कळताच संबंधित ग्राहकाच्या खात्यावरून हजारो रूपये हातोहात लंपास करण्याचे प्रकार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. मात्र, याबाबत नागरिकांना सतर्क करून स्वत:ही तत्पर असण्याची अपेक्षा असलेले पोलीस या गुन्हेगारीने हतबल झालेले दिसत आहेत. त्यामुळे ग्राहकांना असे बनावट फोन आले आणि ते पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेले. ‘पैसे गेले नाहीत ना, पैसे गेले तरच लेखी तक्रार नोंदवायला या’ अशी भूमिका पोलिसांची असल्याने आता असे बनावट फोन आले तरी पोलिसांकडे जाच कशाला, अशी नागरिकांची मानसिकता होऊ लागली आहे.सध्या सर्वच बँकांच्या काही ग्राहकांना अनोळखी भ्रमणध्वनीवरून फोन येत आहेत. त्यावरून काही कारण सांगून त्या ग्राहकांच्या एटीएमचा पासवर्ड विचारण्याचा प्रयत्न केला जातो. काही ग्राहकांनी फोन करणाऱ्या या व्यक्तिला आपला पासवर्ड क्रमांक सांगूनही टाकला. त्यामुळे त्यांच्या खात्यावरील पैसे परस्पर काढले गेले आहेत. हे प्रकार वाढल्याने बँकांनी खबरदारी म्हणून बँकांमध्ये, परिसरात अशा फोनवर विश्वास न ठेवण्याचे फलक लावले आहेत.तरीही असे फोन येतच आहेत. काहींची फसवणूकही होत आहे. मात्र, ज्यांना फोन आले आणि काही ग्राहक त्यामुळे सावध झाले आणि इतरांनाही सावध करण्यासाठी त्या भ्रमणध्वनी क्रमांकाचा शोध घ्यावा, म्हणून पोलिसांकडे गेले तर तिथे वेगळाच अनुभव आला. रत्नागिरी येथील पोलीस ठाण्यात गेल्या दोन - तीन महिन्यांत अशा प्रकारच्या तक्रारी नोंदवण्यात आलेल्या आहेत. मात्र, ज्यांचे पैसे गेले आहेत, त्यांच्याच तक्रारी नोंदवून घेतल्या जातात. पण, ज्यांना फोन आले आणि त्यांनी सावध होऊन आपले पासवर्ड दिले नाहीत, त्यांचे खाते ‘सेफ’ राहिले. तरीही अशांनी हा नंबर पोलिसांना देण्यासाठी सहकार्य दाखविले. मात्र, त्याबाबत पोलिसांचच उदासीनता दिसून येते.हे नंबर सर्रास इतर राज्यातून आलेले आहेत. त्यामुळे पोलिसांना त्यांचा माग काढणे अतिशय अवघड आहे. मात्र, हे मोबाईल नंबर कुठचे आहेत, हे कळू शकते, तर पोलीस यंत्रणा पुढचा छडा लावण्याची तयारी का दाखवत नाहीत, असा सवाल उठत आहे. खरंतर काळानुरूप या यंत्रणेनेही ‘अपडेट’ असायला हवे. मुख्य म्हणजे किती पोलिसांना इंटरनेटची माहिती आहे, हा संशोधनाचा मुद्दा आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बँकांची एटीएम सेवा धोक्यात आहे. असे असताना एटीएम जास्त आणि सुरक्षारक्षक कमी तेही शस्त्रधारी न ठेवता दंडुकाधारी. त्यामुळे एटीएम यांची, पैसे हे कमावणार, मग त्यांच्यावर निगराणी मात्र आम्ही ठेवणार, असा पोलिसांचा रोष बँकांवर दिसून येत आहे. त्यामुळेही पोलिसांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. मात्र, सायबर क्राईमच्या या नव्या संकटाने सर्व बँकांच्या ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे, एवढे नक्की. (प्रतिनिधी)