शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

सायबर क्राईमची वाढती शृंखला; पोलीस हतबल

By admin | Updated: August 25, 2014 22:53 IST

ग्राहकांची उडाली झोप : पोलीस यंत्रणेला गुन्ह्याचे धागेदोरे मिळणे झाले अवघड

रत्नागिरी : सध्या सायबर गुन्हेगारीने अवघ्या जगाची झोप उडविली आहे. एटीएमचा पासवर्ड कळताच संबंधित ग्राहकाच्या खात्यावरून हजारो रूपये हातोहात लंपास करण्याचे प्रकार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. मात्र, याबाबत नागरिकांना सतर्क करून स्वत:ही तत्पर असण्याची अपेक्षा असलेले पोलीस या गुन्हेगारीने हतबल झालेले दिसत आहेत. त्यामुळे ग्राहकांना असे बनावट फोन आले आणि ते पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेले. ‘पैसे गेले नाहीत ना, पैसे गेले तरच लेखी तक्रार नोंदवायला या’ अशी भूमिका पोलिसांची असल्याने आता असे बनावट फोन आले तरी पोलिसांकडे जाच कशाला, अशी नागरिकांची मानसिकता होऊ लागली आहे.सध्या सर्वच बँकांच्या काही ग्राहकांना अनोळखी भ्रमणध्वनीवरून फोन येत आहेत. त्यावरून काही कारण सांगून त्या ग्राहकांच्या एटीएमचा पासवर्ड विचारण्याचा प्रयत्न केला जातो. काही ग्राहकांनी फोन करणाऱ्या या व्यक्तिला आपला पासवर्ड क्रमांक सांगूनही टाकला. त्यामुळे त्यांच्या खात्यावरील पैसे परस्पर काढले गेले आहेत. हे प्रकार वाढल्याने बँकांनी खबरदारी म्हणून बँकांमध्ये, परिसरात अशा फोनवर विश्वास न ठेवण्याचे फलक लावले आहेत.तरीही असे फोन येतच आहेत. काहींची फसवणूकही होत आहे. मात्र, ज्यांना फोन आले आणि काही ग्राहक त्यामुळे सावध झाले आणि इतरांनाही सावध करण्यासाठी त्या भ्रमणध्वनी क्रमांकाचा शोध घ्यावा, म्हणून पोलिसांकडे गेले तर तिथे वेगळाच अनुभव आला. रत्नागिरी येथील पोलीस ठाण्यात गेल्या दोन - तीन महिन्यांत अशा प्रकारच्या तक्रारी नोंदवण्यात आलेल्या आहेत. मात्र, ज्यांचे पैसे गेले आहेत, त्यांच्याच तक्रारी नोंदवून घेतल्या जातात. पण, ज्यांना फोन आले आणि त्यांनी सावध होऊन आपले पासवर्ड दिले नाहीत, त्यांचे खाते ‘सेफ’ राहिले. तरीही अशांनी हा नंबर पोलिसांना देण्यासाठी सहकार्य दाखविले. मात्र, त्याबाबत पोलिसांचच उदासीनता दिसून येते.हे नंबर सर्रास इतर राज्यातून आलेले आहेत. त्यामुळे पोलिसांना त्यांचा माग काढणे अतिशय अवघड आहे. मात्र, हे मोबाईल नंबर कुठचे आहेत, हे कळू शकते, तर पोलीस यंत्रणा पुढचा छडा लावण्याची तयारी का दाखवत नाहीत, असा सवाल उठत आहे. खरंतर काळानुरूप या यंत्रणेनेही ‘अपडेट’ असायला हवे. मुख्य म्हणजे किती पोलिसांना इंटरनेटची माहिती आहे, हा संशोधनाचा मुद्दा आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बँकांची एटीएम सेवा धोक्यात आहे. असे असताना एटीएम जास्त आणि सुरक्षारक्षक कमी तेही शस्त्रधारी न ठेवता दंडुकाधारी. त्यामुळे एटीएम यांची, पैसे हे कमावणार, मग त्यांच्यावर निगराणी मात्र आम्ही ठेवणार, असा पोलिसांचा रोष बँकांवर दिसून येत आहे. त्यामुळेही पोलिसांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. मात्र, सायबर क्राईमच्या या नव्या संकटाने सर्व बँकांच्या ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे, एवढे नक्की. (प्रतिनिधी)