शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
5
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
6
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
7
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
8
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
9
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
10
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
11
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
12
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
14
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
15
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
16
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
17
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
18
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
19
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
20
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?

निवजे येथे सिंधुदुर्गातील पहिल्या भात खरेदी केंद्राचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 20:58 IST

गेल्या दहा वर्षांत प्रथमच एवढ्या लवकर नोव्हेंबर महिन्यात भात खरेदीचा शुभारंभ होत आहे. चांदा ते बांदा योजना व कृषी यांत्रिकीकरण योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात आला असून शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाद्वारे श्री पद्धतीने मोठ्या प्रमाणात भात लागवड केली. त्यामुळे भाताचे उत्पादन वाढले आहे. भात खरेदी केंद्राचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले.

ठळक मुद्देनिवजे येथे सिंधुदुर्गातील पहिल्या भात खरेदी केंद्राचा शुभारंभ यावर्षी ६० हजार क्विंटल भात खरेदीचा संकल्प  : वैभव नाईक

कुडाळ : गेल्या दहा वर्षांत प्रथमच एवढ्या लवकर नोव्हेंबर महिन्यात भात खरेदीचा शुभारंभ होत आहे. चांदा ते बांदा योजना व कृषी यांत्रिकीकरण योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात आला असून शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाद्वारे श्री पद्धतीने मोठ्या प्रमाणात भात लागवड केली. त्यामुळे भाताचे उत्पादन वाढले आहे. भात खरेदी केंद्राचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले.पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीच्या नुकसानीची रक्कम राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा होईल. तसेच कृषीविषयक इतर योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यात येईल. त्याचप्रमाणे यावर्षी उच्चांकी भात खरेदी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. गतवर्षी शासनामार्फत ३६ हजार क्विंटल भात खरेदी करण्यात आली. मात्र, यावर्षी ६०हजार क्विंटल भात खरेदी करण्याचा संकल्प आहे, असेही आमदार नाईक यांनी सांगितले.महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई यांच्यावतीने बजाज सिंधुदुर्ग राईस मिल अंतर्गत कुडाळ तालुक्यातील निवजे येथे भात खरेदी केंद्राचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी नामदेव गवळी, जिल्हा परिषद सदस्य राजू कविटकर, कुडाळ पंचायत समिती उपसभापती जयभारत पालव, सदस्या श्रेया परब, उपतालुकाप्रमुख बाळू पालव, बजाज राईस मिलचे मॅनेजर संदीप चव्हाण, कृषी पर्यवेक्षक निलेश उगवेकर, प्रभाकर वारंग, निवजे सोसायटीचे चेअरमन सूर्यकांत सावंत, शाखाप्रमुख संतोष पिंगुळकर, शेतकरी महादेव पालव, दत्ता सावंत, सीताराम पालव, श्याम पिंगुळकर सुधीर राऊळ आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्ह्यातील निवजे या ग्रामीण भागातील सोसायटीमध्ये प्रथम भात खरेदीचा शुभारंभ केला त्याबद्दल नागेंद्र परब यांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले.हमीभावात वाढ केलीभात खरेदीसाठी जिल्ह्यात ४२ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. गतवर्षी शेतकऱ्यांना क्विंटलमागे १८१५ रुपये हमीभाव देण्यात आला होता. तसेच त्यावर ७०० रुपये बोनस मिळून २५१५ रुपये दर देण्यात आला होता. यावर्षी शासनाने हमीभावात ५३ रुपयांची वाढ केली असून १८६८ रुहमीभाव लागू करण्यात आला आहे, असे आमदार नाईक म्हणाले. 

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग