शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

सिंधुदुर्ग: माणगाव खोऱ्यातील वीस हून अधिक गावांचा संपर्क तुटला; जनजीवन विस्कळीत

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: September 11, 2022 21:57 IST

गेले दोन दिवस मुसळधार पावसाने हाहाकार माजविल्याने कर्ली नदीला पूर आला आहे.

सिंधुदुर्ग: गेले दोन दिवस मुसळधार पावसाने हाहाकार माजविल्याने कर्ली नदीला पूर आला आहे. त्यामुळे कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील आंबेरीच्या वरील २० हुन अधिक गावांचा संपर्क तुटला आहे.

 तर संबंधित गावांना जोडणारा एकच मार्ग असल्याने ग्रामस्थांचे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. दरम्यान सह्याद्रीच्या पायथ्याशी आणि दुकानवाड व आसपासाच्या परिसरात अतिवृष्टी झाल्याने माणगाव खोऱ्यातील सर्व नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरच ११ दिवसांचे गणपती विसर्जन करून माघारी परतणाऱ्या चाकरमान्यांची सुद्धा मोठी गैरसोय झाली आहे.

मळेकाठची भातशेती धोक्यात

 गेले दोन-तीन दिवस माणगाव खोऱ्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली. तर मोठा पाऊस पडल्याने गणपती विसर्जनाच्या वेळी गणेश भक्तांच्या आनंदावर विरजण पडले. दरम्यान अतिवृष्ठीमुळे येथील भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून येथील शेतकरी वर्ग चिंतेत आहे.

२० हून अधिक गावे संपर्कहीन

माणगाव खोऱ्यातील माणगाव बाजारपेठेतून पुढे शिवापूर कडे जाणाऱ्या मार्गावरील आंबेरी येथील ब्रीज पाण्याखाली गेल्याने आंजिवडे, उपवडे, वसोली आदी २० गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस