शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सावंतवाडी तालुक्यात मंत्री केसरकरांना धक्का, फक्त दोन ग्रामपंचायतींवर वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 19:05 IST

सावंतवाडी तालुक्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली असून 52 पैकी 32 ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यात शिंदे गटाला मतदारांनी जोरदार धक्का दिला असून अवघ्या दोन ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले आहे.त्यामुळे हा मंत्री दीपक केसरकर यांना इशाराच मानला जात आहे.ज्या ग्रामपंचायतीवर शिंदे गटाला यश मिळविता आले ते निसटते यश मानले जात आहे.त्यामुळे सावंतवाडी तालुक्यात भाजपच किगमेकर ठरली आहे.

सावंतवाडी तालुक्यात भाजप ने जोरदार मुसंडी मारली असून 52 पैकी 32 ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. यातील बांदा ग्रामपंचायत वर भाजपने आपले वर्चस्व अबाधित ठेवले असून माजगाव तसेच केसरी ग्रामपंचायत वर भाजपने अनपेक्षित यश मिळवले आहे.पण मतदारांनी नेमळे ग्रामपंचायती त भाजप ला धक्का दिला आहे.ही ग्रामपंचायत अनेक वर्षे भाजप च्या ताब्यात होती पण यावेळी मतदारांनी अनपेक्षित कैल दिल्याने सर्वानाच धक्काच बसला आहे.या ग्रामपंचायतीत तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती तर केसरी ग्रामपंचायतीवर अनेक वर्षे मंत्री दीपक केसरकर यांचे समर्थक राघोजी सावंत यांची सत्ता होती.पण मंत्री रविंद्र चव्हाण यांचे या गावात घर असून त्याचे समर्थक संदिप गावडे यांनी या ग्रामपंचायत वर्चस्व प्रस्थापित करत मंत्री केसरकर यांना धक्का दिला आहे.

चराठे मध्ये शिवसेनेने सत्ता राखली असली तरी ओटवणे ग्रामपंचायतीवर गाव विकास पॅनेलने विजय मिळवत शिंदे गटाला जोरदार धक्का दिला आहे.कारिवडे कुणकेरी माडखोल आंबेगाव या ग्रामपंचायत वर भाजप ने वर्चस्व राखले असले तरी जिल्हा बँक संचालक महेश सारंग याचा करिष्मा या सर्वात कमी आला आहे.तर मडुरा ग्रामपंचायत राखत संजू परब यांनी अनेक वर्षाचा आपला गड शाबूत ठेवला आहे.

या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप बरोबरच ठाकरे गटाने ही यश मिळवले असले तरी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना मतदारांनी जोरदार धक्का दिला असून अवघ्या दोन ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचे वर्चस्व राहिले आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची सेमी फायनल म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीकडे बघितले जात असते मात्र यात केसरकरांचा करिष्मा दिसून आला नसून भाजप ने सर्वत्र वर्चस्व राखल्याने हा केसरकर यांच्यासाठी हा एकप्रकारे धक्काच मानला जातो 

टॅग्स :SawantwadiसावंतवाडीPoliticsराजकारणBJPभाजपा