शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियानात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
5
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
6
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
7
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
8
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
9
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
10
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
11
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
12
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
13
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
14
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
15
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
16
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
17
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
18
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
19
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
20
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई

विमानतळ विकासात महत्त्वाचा टप्पा

By admin | Updated: August 24, 2016 22:23 IST

विनायक राऊत : हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाचे उद्घाटन

रत्नागिरी : तटरक्षक दलाच्या ताब्यात असलेल्या रत्नागिरी विमानतळाचे विस्तारीरकरण होत असून, त्यावरून खासगी विमानसेवा सुरू केली जाणार आहे. रत्नागिरीकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे. रत्नागिरीच्या सर्वांगिण विकासातील हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केले. रत्नागिरी विमानतळावरील तात्पुरत्या स्वरुपातील हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाचे (एटीएस) उद्घाटन खासदार राऊत यांच्या हस्ते बुधवारी झाले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, तटरक्षक दलाचे कमांडंट एस. एम. सिंग, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, आमदार उदय सामंत, सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, शहर उपप्रमुख प्रशांत साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते. विमानतळाच्या विस्ताराचे काम सुरू झाले आहे. विमानतळावर धावपट्टीची लांबी वाढवली जाणार आहे. त्याचबरोबर प्रवासी वाहतूक करणारी किमान ५ विमाने उभी करता येतील, असा तळ उभारला जाणार आहे. वाहनतळ, उपयुक्त सेवाही दिल्या जाणार आहेत. शहरापासून हा विमानतळ जवळ आहे. तसेच रत्नागिरीत अनेक पर्यटनस्थळेही आहेत. त्यामुळे येथून खासगी विमान वाहतूक सुरू झाल्यानंतर पर्यटकही या सेवेचा लाभ घेतील, असे राऊत म्हणाले. हा विमानतळ खासगी विमानांसाठीही वापरला जाणार असल्याने रत्नागिरीच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे या विमानतळाचे विस्तारीकरण लवकरात लवकर पूर्ण व्हावे, असे आमदार उदय सामंत म्हणाले. (प्रतिनिधी)