शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 1, 2024 19:27 IST

सिंधुदुर्ग : उष्णतेची तीव्र लाट सध्या सुरू आहे. अशावेळी कामानिमित्त काही लोकांना घराबाहेर पडावे लागते. ते उन्हातून जेव्हा घरी ...

सिंधुदुर्ग : उष्णतेची तीव्र लाट सध्या सुरू आहे. अशावेळी कामानिमित्त काही लोकांना घराबाहेर पडावे लागते. ते उन्हातून जेव्हा घरी येतात तेव्हा सर्वात प्रथम फ्रीजमधील थंड पाणी पितात; परंतु असे केल्यामुळे आजारी पडण्याची शक्यता असते.उन्हाळ्यात थंड पाणी पिल्याने काही लोकांना उष्णतेपासून आराम मिळतो. उन्हाळ्यात लिक्विड ड्रिंक्सचे सेवन केले जाते. यामध्ये पाण्यासोबतच लस्सी, ज्यूस, नारळपाणी, लिंबू सरबत अशी विविध प्रकारची पेये येतात. उन्हाळ्यात किमान ८ ते १० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे; परंतु पाणी पिताना योग्य तापमान असणेही महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात लोक थंड पाणी पिण्यासाठी फ्रीजमधील पाणी पितात. तहान शमविण्यासाठी किंवा थकवा दूर करण्यासाठी थंड पाणी पिले जाते; परंतु त्यामुळे उष्णतेपासून काही काळ आराम मिळत असला, तरी त्यामुळे खूप नुकसानही होते.

उन्हाळा लागल्याची लक्षणे काय?उन्हाळा लागल्यास शरीरातील पाण्याचे आणि क्षारांचे प्रमाण कमी होऊन मूत्र आम्लस्वरूप घेते. यालाच आपण उन्हाळा लागणे असे म्हणतो. उन्हाळा लागल्यास मूत्रमार्गाची जळजळ होते; तसेच थकवा येतो. अंतर्गत दाह निर्माण होतो.

उन्हातून आल्यावर घ्या काळजीउन्हातून घरी आल्यावर लगेच एसी किवा कूलरमध्ये बसू नये. शरीराला वेगवेगळ्या तापमानाशी जुळवून घेण्यास वेळ लागतो. त्यामुळे एसी असल्यास त्याचे तापमान कमी ठेवा.

उन्हात बाहेर पडताना अशी घ्या काळजीउन्हात जाण्याअगोदर उपाशीपोटी बाहेर पडू नये. त्यामुळे घरून निघताना नाश्ता किंवा जेवण करूनच बाहेर पडले पाहिजे. आपल्यासोबत पाण्याची बाटली ठेवणे गरजेचे आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांत ३ ते ४ लिटरपर्यंत पाणी लागते. उन्हाळी लागण्याचा त्रास मुख्यत्वे पाणी कमी पिल्याने होतो. त्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. - डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक, सिंधुदुर्ग.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTemperatureतापमानHealthआरोग्य