शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक स्थळांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष

By admin | Updated: December 3, 2015 23:48 IST

वारसा लोप पावण्याची भीती : प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी; पर्यटनप्रेमींनीही जागृती करावी

नीलेश मोरजकर-- बांदाबांदा परिसरातील ऐतिहासिक संदर्भ लाभलेल्या कित्येक वास्तू या देखभाल दुरुस्तीअभावी लोप पावण्याच्या मार्गावर आहेत. बांदा-सटमटवाडी येथील मठ पर्वतावर जागृत असलेले शिवकालीन संतश्रेष्ठ श्री रामभट स्वामींचे समाधीस्थान देखील दुर्लक्षामुळे मोडकळीस आले आहे. रामभट स्वामींनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण योगदानही दिले आहे.हा इतिहास काळाच्या ओघात लुप्त होऊ नये, यासाठी सटमटवाडी येथील युवक दरवर्षी येथे श्रमदानाने साफसफाई मोहीम राबवितात. यातून इतिहासकालीन समाधी व त्याचा इतिहास जगासमोर आणण्याचा प्रयत्न युवक करत आहेत.या स्थळाचा पर्यटन दृष्टिकोनातून विकास व्हावा, अशी मागणी स्थानिकांतून होत आहे. ऐतिहासिक ठेव्याला पुनरुज्जीवन प्राप्त करून देण्यासाठी येथील युवकांनी दाखविलेली धडपड निश्चितच कौतुकास्पद आहे.या दुर्लक्षित पर्यटनस्थळाच्या विकासाची प्रतीक्षा असून या भागाचा पर्यटन दृष्टिकोनातून विकास झाल्यास या समाधी स्थळाचा इतिहास पुढील पिढीला समजण्यासाठी मदत होणार आहे.समाधीस्थळाविषयी...इतिहासकालीन समाधीस्थळ असलेला परिसर हा बांदा-सटमटवाडी येथील डोंगरमाथ्यावर सुमारे ४५0 फूट उंचीवर आहे. येथून बांदा शहर, झाराप-पत्रादेवी चौपदरी महामार्ग, डिंगणे गाव, वाफोली धरण व गोव्याचा बराचसा भाग दृष्टीस पडतो.शिवकालीन असलेल्या श्री रामभट स्वामींची समाधी या पर्वतावर आहे. याठिकाणी रामभट स्वामींचे मंदिर आहे. या ठिकाणी स्वामींनी जिवंत समाधी घेतल्याचे येथील जाणकार सांगतात. प्रवेशद्वारावर उजव्या बाजूस हनुमान व पाठीमागील बाजूस गणपती दगडामध्ये कोरण्यात आला आहे. या ठिकाणी स्वामींनी आपल्या दैवी शक्तीने गोड्या पाण्याचे तळे निर्माण केले आहे, अशी आख्यायिका आहे. या तळ्यातील पाणी सटमटवाडी येथील मठाकडे व गाळेल येथे गेले आहे. या तळ्याचे अवशेष आजही याठिकाणी सुस्थितीत आहेत. मंदिराच्या लगत समोरील बाजूस स्वामींची तप करण्यासाठी दगडांची बांधकाम असलेली जागा मात्र मोडकळीस आली आहे.स्वामींच्या सेवेसाठी असलेली त्यांची दासी ‘मनकरणी’ हिच्या दगडातील पादुका आजही येथे पहावयास मिळतात. तसेच पर्वताच्या खाली देखील त्यांच्या सेवेकऱ्यांची समाधी पहावयास मिळते. स्वामींचे बरेचसे शिष्य हे महाराष्ट्रात होते. हिंदवी स्वराज्य स्थापनेत रामभट स्वामींनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. शिवाजी महाराजांच्या कालावधीत तळकोकणातील राज्यकारभाराची माहिती सांडणीस्वारांमार्फत पारगडाकडून रायगडावर पाठवली जायची. त्यात स्वामींनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.शिवकालीन समाधीस्थळाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे या स्थळाची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. या स्थळाचा इतिहास जगासमोर यावा आणि या परिसराचा विकास व्हावा, याचा ध्यास घेऊन या ठिकाणी श्रमदानाने साफसफाई करण्याचा निर्णय येथील युवकांनी घेतला. युवकांनी सातत्याने श्रमदान करीत या स्थळाला नवी झळाळी प्राप्त करून दिली आहे. दरवर्षी पावसाळ्यानंतर याठिकाणी साफसफाई मोहीम राबविण्यात येते.यामध्ये महादेव वसकर, जीवबा वीर, प्रमोद कळंगुटकर, महेंद्र मांजरेकर, विवेक केळुस्कर, विठ्ठल तांबुळकर, सच्चिदानंद मांजरेकर, सूरज मांजरेकर, विठ्ठल केळुस्कर, संजय केळुस्कर, अजिंक्य कळंगुटकर, रामचंद्र तांबुळकर, समीर शिरोडकर, आदी युवकांसह सटमटवाडी ग्रामस्थांनी मेहनत घेतली.दरवर्षी याठिकाणी रामभट स्वामींची पुण्यतिथी व पूजा कार्यक्रम ग्रामस्थांच्या सहभागातून करण्यात येतात. मठ पर्वतावर जाऊन धार्मिक कार्यक्रम करणे शक्य नसल्याने पर्वताच्या खाली मठ बांधण्यात आला आहे. त्याठिकाणी नित्य नेमाने पूजा अर्चा करण्यात येते.पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास : मंदार कल्याणकरया स्थळाच्या विकासासाठी पर्यटन खात्याकडे प्रस्ताव सादर करणार असल्याचे सरपंच मंदार कल्याणकर यांनी सांगितले. या ठिकाणी शालेय विद्यार्थी एकदिवसीय सहलीसाठी येतात. मात्र, योग्य सुविधा नसल्याने या ठिकाणी येणारे पर्यटक नेहमीच नाराजी व्यक्त करतात. या स्थळाकडे जाण्यासाठी डोंगरात पायऱ्यांची निर्मिती करण्याचा ग्रामपंचायतीचा प्रयत्न आहे. या स्थळाच्या विकासासाठी माजी सरपंच शीतल राऊळ, सतीश येडवे हे देखील प्रयत्नशील आहेत.