शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

दिलेली कमिटमेंट पूर्ण न झाल्यानेच मला मंत्री केले नाही; दीपक केसरकर यांचा आरोप  

By अनंत खं.जाधव | Updated: February 6, 2024 20:14 IST

दोन दिवसापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे दोन दिवसापूर्वीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते.

सावंतवाडी: माझ्यात कर्तृत्व असून सुध्दा मला उध्दव ठाकरे यांनी 2014 मध्ये  राज्यमंत्री केले पण नंतरच्या काळात सत्ता आल्यानंतर माझ्याकडून कमिटमेंट पूर्ण न झाल्यानेच मला मंत्री करण्यात आले नाही.याची खुद्द आदित्य ठाकरे यांनीच कबुली दिल्याचा दावा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. ते सावंतवाडीत बोलत होते.तसेच धनादेशाद्वारे मी शिवसेनेला एक कोटि रूपये दिल्याचा आपल्याकडे पुरावा असल्याचेही ते म्हणाले.

दोन दिवसापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे दोन दिवसापूर्वीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते. त्यावेळी त्यांनी सावंतवाडीतील जनसंवाद यात्रेतून मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टिका केली होती.त्या टिकेला मंत्री केसरकर यांनी सावंतवाडीत येऊन जोरदार प्रत्युत्तर दिले. माझ्या श्रध्देवर संशय घेणाऱ्या उध्दव ठाकरे यांनी मी शिर्डी हून आणलेली साईबाबांची शाल ठाकरे यांना घातल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले याची कबुली रश्मी ठाकरे यांनी दिली आहे.मग आता सावंतवाडीत येऊन खोटे कशाला बोलायचे असा सवाल मंत्री केसरकर यांनी केला आहे.मला गद्दार म्हणण्याचा अधिकार ठाकरे यांना नाही त्याचे कर्तृत्व काय मुख्यमंत्री असतना लोकांना सोडा आमदारांनाही भेटत नव्हते.

मी तब्बल दोन महिने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थाना च्या बाहेर वाट बघत होतो पण मला कधी भेट मिळत नव्हती मग यांच्याकडे लोक थांबणार कसे असा सवाल करत मी स्वतःहून शिवसेनेत गेलो नव्हतो मला भाजपकडून निमंत्रण असतना उध्दव ठाकरे यांनी सतत निमंत्रण दिले म्हणून शिवसेनेत गेलो असे मंत्री केसरकर यांनी सांगितले. पाणबुडी प्रकल्प मी मंजूर केला ठाकरेंनी नाहीसिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेल्या उध्दव ठाकरे यांनी आपण पाणबुडी मंजूर केली ती गुजरात ला नेण्यात आल्याचे सांगण्यात आले पण वस्तुस्थिती सर्वानी जाणून घ्यावी पाणबुडी मी स्वता मंजूर केली होती.पण नंतर च्या पर्यटन मंत्र्यांनी तो प्रकल्प पुढे सरकवला नाही त्यामुळेच तो रद्द झाला होता पण आताच्या पर्यटन मंत्र्यांनी तो प्रकल्प मंजूर करण्यात आल्याचे मंत्री केसरकर म्हणाले. मी शिवसेनेत आल्यानंतर शिवसेनेची मते वाढलीमी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असतना सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेची मत लाखांच्या आत मध्ये होती पण मी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर हीच मते लाखांच्या बाहेर गेली वैभव नाईक तसेच विनायक राऊत हे निवडून आल्याचा दावा ही मंत्री केसरकर यांनी केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना