शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
4
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
5
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
6
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
7
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
8
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
9
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
10
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
11
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
12
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
13
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
14
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
15
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
16
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
17
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
18
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
19
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
20
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड

Deepak Kesarkar : "शिवसेना हिंदुत्वापासून दूर जात असल्यानेच आम्ही बंड केलं, यामागे मोठे कारण आहे पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 21:54 IST

Shivsena Deepak Kesarkar : भाजपा आणि शिवसेना यांच्यातील ऐक्य यापुढे कोकण विकासात अग्रेसर राहील असेही केसरकर यांनी सांगितले.

सावंतवाडी - शिवसेना हिंदुत्वापासून दूर जात असल्यानेच आम्ही बंड केले. यामागे मोठे कारण आहे पण आता महाराष्ट्रात जे नवीन सरकार स्थापन झाले ते कोकणचा विकास करून दाखवेल असा विश्वास राज्याचे कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. केसरकर यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर प्रथमच शनिवारी सावंतवाडीतील गांधी चौक येथे त्याचा माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप याच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी खेमसावंत भोसले, सत्कार समिती अध्यक्ष सुभाष पणदूरकर, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, दिलीप नार्वेकर, विकास सावंत, जगदीश मांजरेकर, राजन पोकळ, गणेशप्रसाद गवस अनारोजीन लोबो, शुभांगी सुकी, अशोक दळवी, बबन राणे, किर्ती बोद्रे, शर्वरी धारगळकर, पंढरी राऊळ, अन्नपूर्णा कोरगावकर, राजन नाईक, निता कविटकर, प्रेमानंद देसाई बाबू कुडतरकर उपस्थित होते.

केसरकर म्हणाले,आमच्या घरात राजकारणात कोणी नाही तरी ही मी राजकारणात आलो पण कधीही बंडखोरी केली नाही. असे सांगत आपला राजकीय इतिहास मांडला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात केलेल्या कामाचा गौरव केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही बाळासाहेबा एवढेच प्रेमळ आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला मंत्री केले नाही म्हणून मी शिवसेना सोडली असे कोणी म्हणू नका. एवढे मोठे बंड होण्यामागे काहीतरी कारण असते, मला मंत्री होण्याचा मोह नाही पण राहिलेला विकास आपणास करायचा आहे. भाजपा आणि शिवसेना यांच्यातील ऐक्य यापुढे कोकण विकासात अग्रेसर राहील असेही केसरकर यांनी सांगितले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्शवाद मिळाला. आजही आम्ही सिंधुदुर्ग जिल्हयावर अवलंबून आहोत. गोव्यापेक्षा सुंदर समुद्र किनारे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. गोव्यात जन्म झाला असला तरी माझे सिंधुदुर्गशी नाते आहे. मोपामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास होणार आहे. त्यामुळे पर्यटन विभाग तुम्हाला मिळाला तर जिल्ह्याचा झपाट्याने विकास होईल असा विश्वास खलप यांनी केसरकर यांच्याकडे व्यक्त केला. यावेळी खेमसावंत भोसले, विकास सावंत आदिचे भाषण झाले यावेळी त्यांनी केसरकर यांना शुभेच्छा दिल्या.तर प्रस्ताविक नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष सुभाष पणदूरकर यांनी केले.तर उपस्थितांचे स्वागत माजी नगराध्यक्षा अनारोजीन लोबो यांनी केले.

35 वर्षानंतर प्रथमच सावंतवाडीला मान

तब्बल 35 वर्षानंतर सावंतवाडीला महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री पद मिळाले यापूर्वी कै. भाईसाहेब सावंत हे कॅबिनेट मंत्री होते. त्यावेळी त्याचा नागरी सत्कार करण्यात आला होता.तसाच यावेळी आपल्या सर्वाच्या साक्षीने नागरी सत्कार करत असल्याचे दिलीप नार्वेकर यांनी सांगितले.

जिल्हाप्रशासनाच्या वतीने सावंतवाडीत स्वागत 

नव्याने कॅबिनेट मंत्री म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेले दिपक केसरकर यांचे स्वागत सिंधुदुर्ग च्या जिल्हाधिकारी के .मंजूलक्ष्मी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, प्रांताधिकार प्रशांत पानवेकर तहसीलदार श्रीधर पाटील सावंतवाडीचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी सावंतवाडीत केले. 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Shiv Senaशिवसेनाsindhudurgसिंधुदुर्ग