शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
2
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
3
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
4
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
5
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
6
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
7
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
8
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
9
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
10
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
11
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
12
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
13
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
14
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
15
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
16
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
17
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
18
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
19
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
20
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त

हुतात्मा स्मारक विकास प्रकल्प रखडला

By admin | Updated: April 7, 2015 01:27 IST

महाराष्ट्र-गोवा सीमेवरील प्रश्न : पर्यटनाच्यादृष्टीने विकास केल्यास बांदा शहराला फायदा--समस्या बांदा शहराच्या

नीलेश मोरजकर - बांदा --गोवा स्वातंत्र्य संग्रामातील सत्याग्रहींच्या स्मरणार्थ महाराष्ट्र- गोवा राज्यांच्या सीमेवर पत्रादेवी येथे उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्मारकाचा ‘पिकनीक पाँर्इंट’ अंतर्गत विकास करण्याचा प्रकल्प रखडला असून या स्मारकाचा पर्यटन दृष्टिकोनातून विकास केल्यास याचा फायदा बांदा शहराला होणार आहे.गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी या स्मारकाचा विकास करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, अद्यापर्यंत कामास सुरुवात न झाल्याने या स्मारकाच्या विकास प्रकल्पास केव्हा सुरुवात होणार असा सवाल उपस्थित होत आहे.पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारक हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे आहे. बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांना या स्मारकाचा इतिहास समजावा, या दृष्टिकोनातून या स्मारकाचा विकास प्रकल्प राबविण्याचा निर्णय गोवा शासनाने घेतला होता. विकास आराखड्यानुसार या स्मारकाच्या पिकनिक पाँर्इंटचे काम दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात शासकीय जागेचा विस्तार करुन त्यामध्ये ऐतिहासिक टप्पे निर्माण करण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात गोवा मुक्ती लढ्याचा इतिहास व ज्यांनी या लढ्यासाठी बलिदान दिले, त्यांची माहिती देण्यात येणार आहे.गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी बारा वर्षापूर्वी या स्थळाचा ऐतिहासिक दृष्टिकोनातून विकास करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, गोवा शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे हा प्रकल्प रखडला होता. हे स्मारक दुर्लक्षित राहिल्याने स्मारकाविषयी सीमावासियांच्या मनात असलेल्या भावना दुखावल्या गेल्यात.ऐेतिहासिक विभागातील पहिल्या स्पॉटवर नियकालिके, पुस्तिका यांच्या सहाय्याने स्वातंत्र चळवळीविषयी जनजागृती निर्माण करणे, खादीचा पुरस्कार, पोर्तुगीज सरकारच्या कार्यक्रमांवर बहिष्कार यांचा समावेश आहे. सत्याग्रह या दुसऱ्या स्पॉटवर सत्याग्रह, आंदोलने व राम मनोहर लोहियांसारख्या प्रमुख व्यक्तींना अटक, सभा, गोवा विमोचन समिती इत्यादी बाबी, तर स्पॉट क्रमांक तीनवर पत्रादेवी येथे स्वातंत्रसैनिकांचा मृत्यू व या ठिकाणी अनेकांना झालेली अटक याची माहिती देण्यात येणार आहे. स्पॉट क्रमांक चारवर निर्घृण हत्या व अत्याचार, अनेकांना झालेली अटक, त्यांचा छळ व तुरुंगात झालेला सत्याग्रहींचा मृत्यू, स्पॉट पाचवर त्यानंतरचे राजनैतिक प्रयत्न व विविध माध्यमांमुळे संग्रामाची आंतरराष्ट्रीय प्रसिध्दी व शेवटच्या स्पॉटवर गोवामुक्ती आणि विशेषत: 'आॅपरेशन विजय'चे सचित्र दर्शन होणार आहे. या ऐतिहासिक टप्प्याबरोबरच या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना वृक्षांच्या सानिध्यात आनंद लुटण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. भव्य पटांगण, ९०० घनमिटर जागा व्यापलेला प्रचंड तंबू मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात येणार आहे. याशिवाय पक्षी निरीक्षणासाठी साहित्य, अडथळा शर्यत, झुलता पूल, जगंलवाटा, जलक्रीडा, जंगल भ्रमंती यांचा आनंदही घेता येणार आहे. विविध कार्यक्रमांसाठी खुला रंगमंच, व्यवस्थापक कार्यालय, स्त्रिया व पुरुषांसाठी प्रसाधनगृहे, नौकानयनासाठी धक्का अशा अनेक सुविधांचा या पिकनिक पॉर्इंटमध्ये समावेश आहे.गोवा मुक्ती लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ स्मारकाची उभारणी करण्यात आली आहे. आजही विविध भागातून पर्यटक याठिकाणी येतात. मात्र पर्यटकांना सेवा सुविधा मिळत नसल्याने पर्यटक याठिकाणी अधिक काळ थांबत नाहीत. रखडलेला ‘पिकनिक स्पॉट’ पूर्ण झाल्यानंतर याठिकाणी पर्यटकांत वाढ होवून ते एक विरंगुळ्याचे ठिकाण बनणार आहे. गोवा मुक्तीसाठी ज्या विरांनी हौतात्म्य पत्करले त्यांचा इतिहास आजच्या पिढीला समजावा यासाठी या प्रकल्पाचे काम हे लवकरात लवकर सुरु होणे हे गरजेचे आहे.....असा आहे पिकनिक पॉर्इंटहुतात्मा स्मारक परिसरात या प्रकल्पासाठी ८० हजार घनमिटर जागा गोवा शासनाने राखून ठेवली आहे. या ठिकाणी विविध ऐतिहासिक टप्पे निर्माण करण्यात येणार आहेत. पर्यटकांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था आहे. स्वातंत्रसंग्रामातील सहा प्रमुख ऐतिहासिक देखावे दाखविणारे सहा प्रमुख प्रसंग उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक ठिकाणी या प्रसंगाशी निगडीत दृश्ये, भित्तीचित्रे, लेणी दर्शविण्यात येणार आहेत.हुतात्मा स्मारकाविषयीसाडेचारशे वर्षे गोवा पोर्तुगीजांच्या मगरमिठीत होता. भारत स्वातंत्र झाल्यानंतरही तब्बल चौदा वर्षे गोवा प्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. भारताच्या स्वातंत्रप्राप्तीनंतरच खऱ्या अर्थाने गोवा मुक्ती उठावास सुरुवात झाली. गोवा स्वातंत्र होण्यासाठी कित्येक आंदोलने झालीत. त्यानंतर गोवा मुक्ती लढ्यात ३१ सत्याग्रही शहीद झालेत. त्यापूर्वी सामुदायिक सत्याग्रह १९५४ साली झाला. या लढ्यात महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, पंजाब, बंगाल, बिहार, तामिळनाडू, आसाम, आंध्रप्रदेश या राज्यांतील सत्याग्रही शहीद झालेत. गोव्याला पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी भारतातील विविध राज्यांतील तसेच शेजारील सिंधुदुर्गातील सत्याग्रही शेकडोंच्या संख्येने शहिद झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ गोवा शासनाने पत्रादेवी येथे भव्य असे हुतात्मा स्मारक उभारले आहे.पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकाचा पर्यटन दृष्टिकोनातून विकास झाल्यास याचा फायदा बांदा शहराला होणार आहे. यासाठी गोवा शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.सीमेवरील पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकाच्या पर्यटन विकासासाठी बांदा ग्रामपंंचायतीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील. गोवा मुक्ती लढयात बांदावासियांचा देखिल सहभाग मोठया प्रमाणात होता. या मु्क्ती लढ्यात सहभागी होणाऱ्यांना बांदावासिय मदत करत. यामुळे पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकाचा विकास झाल्यास याचा फायदा बांदा शहराला होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गोवा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना या स्मारकाच्या विकासासाठी निवेदन देण्यात येणार आहे.- मंदार कल्याणकर, सरपंच, बांदासीमेवरील पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकाच्या पर्यटन विकासासाठी बांदा ग्रामपंंचायतीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील. गोवा मुक्ती लढयात बांदावासियांचा देखिल सहभाग मोठया प्रमाणात होता. या मु्क्ती लढ्यात सहभागी होणाऱ्यांना बांदावासिय मदत करत. यामुळे पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकाचा विकास झाल्यास याचा फायदा बांदा शहराला होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गोवा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना या स्मारकाच्या विकासासाठी निवेदन देण्यात येणार आहे.- मंदार कल्याणकर, सरपंच, बांदा