शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

चक्रीवादळात तीन कोटींची हानी?

By admin | Updated: April 28, 2015 23:44 IST

घरे कोसळली : संसार उघड्यावर; तिघे जखमी

राजापूर : मंगळवारी रात्री झालेल्या चक्रीवादळामध्ये तालुक्यातील सुमारे पन्नास ते साठ गावांतील सुमारे दीड हजारांच्या आसपास घरांचे पूर्णत: व अंशत: नुकसान झाले असून, सुमारे तीन कोटी रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. हसोळ मुसलमानवाडीतील अकबर मीर यांच्या घरावर वडाचे झाड पडल्याने त्यांची भावजय रुक्साना सुलेमान मीर (वय ४२) ही महिला जागीच ठार झाली, तर अन्य दोन गंभीर व एक जण किरकोळ जखमी झाले आहेत. यातील दोन गंभीर जखमींना रत्नागिरीत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.गेल्या पंधरा दिवसांत अवकाळी पावसाने राजापूर तालुक्याला दुसऱ्यांदा दणका दिला. मंगळवारी सायंकाळी अचानक आलेल्या चक्रीवादळाने तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांची चांगलीच दाणादाण उडवून दिली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातून आलेले हे चक्रीवादळ हसोळ मुसलमानवाडीतील मीर कुटुंबीयांसाठी काळरात्रच ठरले. जुन्या घराचे बांधकाम करण्यासाठी ते कोसळवण्यात आल्याने मीर कुटुंबीयांनी आपला संसार बाजूच्याच वडाच्या झाडाखाली झोपडी काढून थाटला होता. अचानक आलेल्या चक्रीवादळाने हे वडाचे झाड पडून आपला भाऊ अकबर मीर याच्या कुटुंबीयांसह राहणाऱ्या सुलेमान मीर यांची पत्नी रुक्साना ही जागीच ठार झाली, तर सुलेमान मीर यांची मुलगी शाबीरा ही किरकोळ जखमी झाली आहे. अकबर मीर यांची अजमीन (१३) व अलमास (१0) ही दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. मीर कुटुंबीयांचे घर डोंगरमाथ्यावर (पान ८ वर)चक्रीवादळासह आलेल्या अतिवृष्टीचा फटका घरांप्रमाणेच शाळांनाही बसला. केळवली केंद्र्रातील अकरापैकी आठ शाळांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी संगणकासह शालेय साहित्याला मोठा फटका बसला आहे.