शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

मंत्री दीपक केसरकरांची ऑफर, सावंतवाडीचे शिवसेना तालुकाप्रमुख म्हणाले...

By अनंत खं.जाधव | Updated: August 16, 2022 17:47 IST

पर्यटन निधीतून उभारण्यात आलेल्या विविध प्रकल्पात मोठा आर्थिक अपहार

सावंतवाडी : मी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत नेहमीच एकनिष्ठ राहिलो असून भविष्यात ही राहणार आहे. काल   माझ्या गावातील नेमळे ग्रामसचिवालयाच्या उद्घाटनाला मंत्री दिपक केसरकर यांनी जो काही संभ्रम निर्माण केला त्यामुळे मला काही फरक पडणार नाही. कारण एकनिष्ठेची किंमत गद्दारांना काय कळणार त्यांना जळीस्थळी राजकारणच दिसणार अशी जोरदार टिका शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केली.काल, सोमवारी नेमळे येथील ग्रामसचिवालय उद्घाटन कार्यक्रमात मंत्री केसरकर यांनी शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांना उद्देशून जास्त उशीर करु नका लवकर आमच्याकडे या अशी ऑफर दिली होती. या पार्श्वभूमीवर राऊळ यांनी आज, मंगळवारी आपली भूमिका मांडत केसरकर यांनी जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे.राऊळ म्हणाले, आपण केसरकरांसोबत साडेसात वर्ष काम केले. त्याना मी जवळून ओळखतो. ते दगड एकीकडे मारतात पण निशाणा  दुसरीकडे असतो, नेमकं कालच्या त्याच्या वाक्यात निशाणा दुसरीकडे होता. तेथे असलेल्या अन्य भाजपच्या नेत्यांना उद्देशून त्यांनी ही गुगली टाकली आहे.

निमंत्रण असल्याने तिथे गेलोमात्र त्यांनी माझ्याबाबत केलेल्या वाक्याचा विपर्यास कोणीही करून घेऊ नये. कारण काल, आज, उद्या मी शिवसेनेसोबत आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच एकनिष्ठ आहे आणि राहणार. केवळ माझ्या गावच्या ग्रामसचिवालयाचे उद्घाटन असल्याने आणि निमंत्रण असल्याने आपण तिथे गेलो. त्यामागे अन्य काहीही कारण नाही असे त्यांनी सांगितले.पर्यटन निधीतून उभारण्यात आलेल्या विविध प्रकल्पात मोठा आर्थिक अपहारकेसरकर यांच्या मागच्या काळात झालेल्या चांदा ते बांदा या योजनेसह आंबोलीत पर्यटन निधीतून उभारण्यात आलेल्या विविध प्रकल्पात मोठा आर्थिक अपहार झाला आहे. तो आम्ही लवकरच पुराव्यानिशी उघड करू, असा इशारा ही राऊळ यांनी दिला. केसरकर यांना मतदारांचा त्यांना विसर पडला आहे. कालच्या दौर्‍यात त्यांनी मल्टीस्पेशालिटी तसेच अन्य प्रश्नावर भाष्य केले नाही, यातूनच जनते बद्दल असलेले प्रेम दिसून येते असेही राऊळ म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDipak Kesarkarदीपक केसरकरShiv Senaशिवसेना