शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
3
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
4
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
5
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
6
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
7
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
8
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
9
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
10
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
11
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
12
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
13
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
14
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
15
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
16
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
17
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
18
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
19
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
20
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल

पावसाच्या तोंडावर कामाची सुरुवात कशी? पालकमंत्र्यांनी कामाची चौकशी करावी, रूपेश राऊळ यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 09:02 IST

...त्यामुळे १५ मे नंतर खडीकरण व डांबरीकरणाची कामे करणाऱ्या ठेकेदारांची बिले थांबवा, अशी मागणी ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली. 

सावंतवाडी: पावसाळ्याच्या तोंडावर तालुक्यात अनेक विकास कामे केली जात आहेत. ती कामे निकृष्ट झाल्याचा संशय आहे. त्यामुळे १५ मे नंतर खडीकरण व डांबरीकरणाची कामे करणाऱ्या ठेकेदारांची बिले थांबवा, अशी मागणी ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बाळा गावडे, आबा सावंत, चंद्रकांत कासार, गुणाजी गावडे, आबा केरकर,रमाकांत राऊळ योगेश गावडे, अशोक परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.

राऊळ म्हणाले,सिंधुदुर्ग जिल्ह्यात निधी आला पाहिजे कामे ही व्हावीत पण 15 मे नंतर डांबरीकरण करायचे तर सर्व सामान्य माणसाला नियम दाखवतात मग आता कशी काय कामे सुरू आहेत या कडे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व कोट्यावधीचा निधी आणणाऱ्या लक्ष द्यावा,असा ही टोला मंत्री दीपक केसरकर यांचे नाव न घेता लगावला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून  सहा महिन्यापूर्वी कार्यारंभ आदेश मिळालेल्या कामांचा यात समावेश आहे. विशेष म्हणजे पावसाच्या तोंडावर ही कामे केली जात आहे. त्यामुळे कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. याकडे संबंधित प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे.धाकोरे येथे सुरू असलेल्या कामावर थंड हॉट मिक्स घालून रस्ता बनवण्यात आला. त्यामुळे त्या ठिकाणी काम रोखण्यात आले. चौकुळ मध्ये सुद्धा हाच प्रकार घडला. 

अशाप्रकारे ठेकेदारांकडून चोरी-लबाडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र याचा फटका रस्त्यांना बसणार आहे. जे रस्ते चार वर्ष टिकले पाहिजे ते चार महिने सुद्धा टिकताना दिसत नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अशा कामांची पालकमंत्र्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र म्हणून चौकशी करावी व त्यांची बिले रोखून धरावीत, आपण कोट्यावधीचा निधी आणला असे सांगून मंत्री केसरकर हे बाता मारत आहेत. परंतु निधी आणला पण तो जर मातीत जात असेल तर त्याचा उपयोग काय? असा सवाल केला. या ठिकाणी मोती तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. मात्र चार दिवस मशीन एका ठिकाणी उभी करून ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार म्हणजे नागरिकांच्या डोळ्यात धुळ फेकण्याचा प्रकार आहे, असे सांगून नाराजी व्यक्त केली. 

टॅग्स :SawantwadiसावंतवाडीShiv SenaशिवसेनाRainपाऊस