शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या तोंडावर कामाची सुरुवात कशी? पालकमंत्र्यांनी कामाची चौकशी करावी, रूपेश राऊळ यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 09:02 IST

...त्यामुळे १५ मे नंतर खडीकरण व डांबरीकरणाची कामे करणाऱ्या ठेकेदारांची बिले थांबवा, अशी मागणी ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली. 

सावंतवाडी: पावसाळ्याच्या तोंडावर तालुक्यात अनेक विकास कामे केली जात आहेत. ती कामे निकृष्ट झाल्याचा संशय आहे. त्यामुळे १५ मे नंतर खडीकरण व डांबरीकरणाची कामे करणाऱ्या ठेकेदारांची बिले थांबवा, अशी मागणी ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बाळा गावडे, आबा सावंत, चंद्रकांत कासार, गुणाजी गावडे, आबा केरकर,रमाकांत राऊळ योगेश गावडे, अशोक परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.

राऊळ म्हणाले,सिंधुदुर्ग जिल्ह्यात निधी आला पाहिजे कामे ही व्हावीत पण 15 मे नंतर डांबरीकरण करायचे तर सर्व सामान्य माणसाला नियम दाखवतात मग आता कशी काय कामे सुरू आहेत या कडे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व कोट्यावधीचा निधी आणणाऱ्या लक्ष द्यावा,असा ही टोला मंत्री दीपक केसरकर यांचे नाव न घेता लगावला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून  सहा महिन्यापूर्वी कार्यारंभ आदेश मिळालेल्या कामांचा यात समावेश आहे. विशेष म्हणजे पावसाच्या तोंडावर ही कामे केली जात आहे. त्यामुळे कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. याकडे संबंधित प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे.धाकोरे येथे सुरू असलेल्या कामावर थंड हॉट मिक्स घालून रस्ता बनवण्यात आला. त्यामुळे त्या ठिकाणी काम रोखण्यात आले. चौकुळ मध्ये सुद्धा हाच प्रकार घडला. 

अशाप्रकारे ठेकेदारांकडून चोरी-लबाडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र याचा फटका रस्त्यांना बसणार आहे. जे रस्ते चार वर्ष टिकले पाहिजे ते चार महिने सुद्धा टिकताना दिसत नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अशा कामांची पालकमंत्र्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र म्हणून चौकशी करावी व त्यांची बिले रोखून धरावीत, आपण कोट्यावधीचा निधी आणला असे सांगून मंत्री केसरकर हे बाता मारत आहेत. परंतु निधी आणला पण तो जर मातीत जात असेल तर त्याचा उपयोग काय? असा सवाल केला. या ठिकाणी मोती तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. मात्र चार दिवस मशीन एका ठिकाणी उभी करून ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार म्हणजे नागरिकांच्या डोळ्यात धुळ फेकण्याचा प्रकार आहे, असे सांगून नाराजी व्यक्त केली. 

टॅग्स :SawantwadiसावंतवाडीShiv SenaशिवसेनाRainपाऊस