शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

पावसाच्या तोंडावर कामाची सुरुवात कशी? पालकमंत्र्यांनी कामाची चौकशी करावी, रूपेश राऊळ यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 09:02 IST

...त्यामुळे १५ मे नंतर खडीकरण व डांबरीकरणाची कामे करणाऱ्या ठेकेदारांची बिले थांबवा, अशी मागणी ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली. 

सावंतवाडी: पावसाळ्याच्या तोंडावर तालुक्यात अनेक विकास कामे केली जात आहेत. ती कामे निकृष्ट झाल्याचा संशय आहे. त्यामुळे १५ मे नंतर खडीकरण व डांबरीकरणाची कामे करणाऱ्या ठेकेदारांची बिले थांबवा, अशी मागणी ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बाळा गावडे, आबा सावंत, चंद्रकांत कासार, गुणाजी गावडे, आबा केरकर,रमाकांत राऊळ योगेश गावडे, अशोक परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.

राऊळ म्हणाले,सिंधुदुर्ग जिल्ह्यात निधी आला पाहिजे कामे ही व्हावीत पण 15 मे नंतर डांबरीकरण करायचे तर सर्व सामान्य माणसाला नियम दाखवतात मग आता कशी काय कामे सुरू आहेत या कडे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व कोट्यावधीचा निधी आणणाऱ्या लक्ष द्यावा,असा ही टोला मंत्री दीपक केसरकर यांचे नाव न घेता लगावला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून  सहा महिन्यापूर्वी कार्यारंभ आदेश मिळालेल्या कामांचा यात समावेश आहे. विशेष म्हणजे पावसाच्या तोंडावर ही कामे केली जात आहे. त्यामुळे कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. याकडे संबंधित प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे.धाकोरे येथे सुरू असलेल्या कामावर थंड हॉट मिक्स घालून रस्ता बनवण्यात आला. त्यामुळे त्या ठिकाणी काम रोखण्यात आले. चौकुळ मध्ये सुद्धा हाच प्रकार घडला. 

अशाप्रकारे ठेकेदारांकडून चोरी-लबाडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र याचा फटका रस्त्यांना बसणार आहे. जे रस्ते चार वर्ष टिकले पाहिजे ते चार महिने सुद्धा टिकताना दिसत नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अशा कामांची पालकमंत्र्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र म्हणून चौकशी करावी व त्यांची बिले रोखून धरावीत, आपण कोट्यावधीचा निधी आणला असे सांगून मंत्री केसरकर हे बाता मारत आहेत. परंतु निधी आणला पण तो जर मातीत जात असेल तर त्याचा उपयोग काय? असा सवाल केला. या ठिकाणी मोती तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. मात्र चार दिवस मशीन एका ठिकाणी उभी करून ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार म्हणजे नागरिकांच्या डोळ्यात धुळ फेकण्याचा प्रकार आहे, असे सांगून नाराजी व्यक्त केली. 

टॅग्स :SawantwadiसावंतवाडीShiv SenaशिवसेनाRainपाऊस