शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

आदित्य ठाकरेंनी कोकणसाठी किती निधी दिला?, नितेश राणेंचा सवाल 

By सुधीर राणे | Updated: September 26, 2023 11:48 IST

कणकवली: सिंधुदुर्ग , रत्नागिरी, रायगडमध्ये येऊन पर्यटनाला चालना देण्यासाठी वेगळी ताकद लागते. मात्र, फुकटच्या बडबडण्याला कोकणची जनता महत्त्व देत ...

कणकवली: सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमध्ये येऊन पर्यटनाला चालना देण्यासाठी वेगळी ताकद लागते. मात्र, फुकटच्या बडबडण्याला कोकणची जनता महत्त्व देत नाही. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी सत्ता असताना कोकणसाठी किती निधी दिला ते प्रथम सांगावे? असा टोला भाजप आमदार नितेश राणे यांनी लगावला. कणकवली येथे आमदार नितेश राणे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आदित्य ठाकरे यांचे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी विधिमंडळामध्ये जाहीर केले होते की कोकणामध्ये जे नियमित कर्ज भरतात त्या प्रत्येकाला ५० हजार रुपयांचे कर्ज दिले जाईल. पण त्यांच्या अडीच वर्षांच्या कारकीर्दीमध्ये ते पन्नास हजार सोडाच पण एक दमडी पण भेटलेली नाही. सिंधुदुर्ग किल्ल्यावर असलेल्या शिव मंदिराला ५० लाख रुपये स्वतः पदरमोड करून देणार असेही उद्धव ठाकरे यांनी घोषित केले होते. मग आदित्य ठाकरेंनी त्यांच्या वडिलांनी जाहीर केलेल्या पैकी एक तरी काम पूर्ण केले आहे काय? याबाबत जनतेला सांगावे.शिंदे आणि फडणवीस सरकारने ठाकरेंनी जाहीर केलेले ५० हजार रुपये शेतकऱ्यांना दिले. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी वायफळ बडबड करण्यापेक्षा व पर्यटकांसारखे इथे येण्यापेक्षा त्यांचे वडिल अडीच वर्षांमध्ये सरकारमध्ये असताना तसेच ते स्वतः पर्यटन मंत्री असताना किती वेळा कोकणात आले ते सांगावे. गोव्यामध्ये येऊन फाईव्ह स्टारमध्ये नाईट लाईफ करणे सोपे आहे. पण सिंधुदुर्गसह कोकणात येऊन पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणे फार कठीण आहे. या कोकणात वादळ आले तेव्हा एक दमडी पण ठाकरे सरकारने दिली नाही. निसर्ग वादळाच्या वेळी ७५ लाख सिंधुदुर्गाला मिळणार होते. त्याचे काय झाले? एक रुपया देखील मिळालेला  नाही. त्यामुळे  पुढच्या वेळी आदित्य ठाकरे सिंधुदुर्गात आले तर त्यांनी  खुल्या व्यासपीठावर यावे. मी पण त्यावेळी येईन. आपण कोकणाच्या विकासावर चर्चा कर. कोकणच्या जनतेला सत्य काय आहे ते समजूदेत असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Aditya Thackreyआदित्य ठाकरे