शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

महामार्ग चिखलमय, पावशी येथे टेम्पो चिखलात अडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 10:42 IST

पावशी ग्रामपंचायतजवळील चिखलमय महामार्गावर आयशर टेम्पो रुतल्यामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प होती. पावशी येथील ग्रामस्थांनी सदरची ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र कंपनीचे कोणते अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले नव्हते.

ठळक मुद्देमहामार्ग चिखलमय, पावशी येथे टेम्पो चिखलात अडकला दोन तास वाहतूक ठप्प; कंपनीने ठोस उपाययोजना करणे आवश्यक

कुडाळ : पावशी ग्रामपंचायतजवळील चिखलमय महामार्गावर आयशर टेम्पो रुतल्यामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प होती. पावशी येथील ग्रामस्थांनी सदरची ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र कंपनीचे कोणते अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले नव्हते.

चिखलमय महामार्गामुळे वाहने रूतण्याच्या घटना वाढत असून महामार्ग सुस्थितीत करण्याकडे महामार्ग प्रशासन व दिलीप बिल्डकॉन कंपनी ठोस उपाययोजना करताना दिसत नाही.बुधवारी सकाळी कुडाळ येथील काळप नाका येथील बॉक्स वेलवर ही लक्झरी बस रुतली होती. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पावशी ग्रामपंचायत जवळील महामार्गावर गोव्याहून मुंबईकडे जाणारा टेम्पो चिखलमय रस्त्यात रुतून बसला. हा टेम्पो काही केल्या निघेना परिणामी काही क्षणातच दोन्ही बाजूंनी वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या.ही घटना पावशी येथील ग्रामस्थांना समजताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच टेम्पो बाहेर काढण्यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन लावला मात्र अधिकाऱ्यांनी फोन उचलला नाही. एका अधिकाऱ्यांने फोन उचलला मात्र त्याने आता येऊ शकत नाही, असे कारण दिल्याचे त्यांनी सांगितले. तर कुडाळ पोलीस ठाण्याला फोन लावून याबाबत माहिती दिली.

मग त्यांनीही याबाबत दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना कळवितो, असे सांगितले. मात्र काही वेळ झाला तरी कोणीच त्याठिकाणी आले नाही. त्यामुळे काही वेळातच महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या व महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला.दिलीप बिल्डकॉन कंपनीचे कोणीही सदरचा टेम्पो काढण्यासाठी येत नसल्याने शेवटी ग्रामस्थांनी वाहतूक सोडविण्यासाठी पुढाकार घेऊन वाहतूक सोडवण्यास सुरू केली

यावेळी नादुरुस्त असलेल्या व बंद ठेवण्यात आलेल्या मार्गावरून त्यांनी हळूहळू वाहतूक सोडविण्यास सुरू केली. व सुमारे दोन तासानंतर ही वाहतूक पूर्वपदावर आणली. त्यानंतर सकाळी साडेसात वाजण्याच्यानंतर ग्रामस्थांनी पुन्हा एकदा दिलीप बिल्डकॉन रवी कुमार यांना फोन लावला. यावेळी कंपनीने त्यांना जेसीबी पाठवतो, असे सांगितले व काही वेळेत तेथे जेसीबी आला व या जेसीबीच्या सहाय्याने सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हा टेम्पो बाहेर काढण्यात आला.या ठप्प झालेल्या वाहतुकीमुळे वाहनचालक, प्रवासी यांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागले. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाबाबत वाहन चालक, प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून काही ठिकाणी अपूर्ण राहिलेल्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात रस्ते चिखलमय झाले आहेत. त्यामुळे वारंवार गाड्या रूतण्याचे तसेच लहान-मोठे अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत.मात्र याकडे महामार्ग प्रशासन तसेच ठेकेदार कंपनी दिलीप बिल्डकॉन पूर्णपणे दुर्लक्ष करत असून सदरचे हे रस्ते सुधारून ते सुस्थितीत आणण्यासाठी कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाहीत. 

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग