शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नैसर्गिक हानीने गाठला उच्चांक

By admin | Updated: October 10, 2015 23:50 IST

जिल्ह्यात ९0 लाखांचे नुकसान : ५३६ घरे, ८२ गोठ्यांची पडझड, प्रशासनातर्फे पावणेपाच लाखांचे वाटप

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टी, पूरजन्य परिस्थिती उद्भवली नसली तरी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या हानीने उच्चांक गाठला असून जिल्हाभरातील फक्त घरे व गोठ्यांची पडझड होऊन ९0 लाखांचे नुकसान झाले आहे. यावेळी प्रशाासनाच्यावतीने ४ लाख, ७३ हजार रूपयांचे वाटप केले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील ५३६ घरांची तर ८२ गोठ्यांची पडझड झाली असल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन कक्षात झाली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे हानी झाल्याचा कालावधी हा १ जूनपासून धरला जातो. यावर्षीच्या पावसाठी हंगामात पावसाने ७ जूनलाच हजेरी लावली. वेळीच पावसाने हजेरी लावल्यामुळे यावर्षी समाधानकारक पाऊस पडेल अशी आशा होती, मात्र शेतकऱ्यांसह सर्वाचीच पावसाने घोर निराशा केली. अद्यापही शेकडो मि. मी. पाऊस हा गतवर्षीच्या सरासरी पासून दूर आहे. परतीच्या पावसाने जिल्ह्यात काही दिवस वादळी वाऱ्यासह बरसायला सुरूवात केल्याने नद्यांसह तलावाची देखील पाण्याची पातळी वाढली आहे. यावर्षी पावसापेक्षा चक्री वादळाचा अनुभव जिल्हावासीयांना घेता आला. वादळाने जिल्ह्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. शेकडो घरांवर झाडे पडून लाखोची हानी झाली. त्याचप्रमाणे गोठ्याचीही पडझड होऊन लाखोंची हानी झाली. प्रशासनाकडील प्राप्त आकडेवारीनुसार जिल्ह्यातील एकूण ५३६ घरांना वादाळाचा तडाखा बसला असून या घरांची पडझड झाली आहे. महसूल विभागाच्या पंचनाम्यानुसार यात ८० लाख ६२ हजार ६०६ रुपयांचे नुकसान झाले आहे, तर गोठ्यांचे ९ लाख २३ हजार ५६८ रुपयांचे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी) ५३६ घरांची पडझड : पात्र मात्र १७० घरे महसूल यंत्रणेच्या माध्यमातून पडझड झालेल्या घरांचा पंचनामा करून नुकसानीचा आकडा जाहीर केला जातो. त्याप्रमाणे आपल्याला नुकसान भरपाई मिळेल, अशी अपेक्षा संबंधीत लोकांची असते. मात्र, शासनाच्या धोरणानुसार ज्या ठिकाणी घरांची किंवा गोठ्यांची पडझड झालेली आहे त्या ठिकाणच्या गावात किमान ५६ मि.मी. पावसाची नोंद असणे आवश्यक असल्याची जाचक अट असल्यामुळे पैकीच्या पैकी नुकसानग्रस्तांना शासनाची मदत मिळत नाही. पावसाच्या या चार महिन्यात तब्बल ५३६ घरांची नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झाली असून त्यातील शासन निकषात बसणाऱ्या १७० घरांना नुकसानीची रक्कम मिळणार आहे, तर पडझड झालेल्या ८२ गोठ्यापैकी २७ प्रकरणे पात्र ठरली आहेत. नुकसानी ९० लाख वाटप मात्र पावणेपाच लाख घरांची व गोठ्यांची मिळून ८९ लाख ८७ हजार एवढी नुकसानी झाली आहे. मात्र, प्रत्यक्षात प्रशासनावरून ४ लाख ७३ हजार रुपयांच्या मदतीचे वाटप करण्यात आले आहे. घरांची ३६३ गोठ्यांची ५५ प्रकरणे अपात्र शासनाच्या निकषावर बोट ठेवत प्रशासनाने ५६३ पडझड झालेल्या घरांपैकी तब्बल ३६३ प्रकरणे अपात्र तर गोठ्यांची ८२ पैकी ५५ प्रकरणे अपात्र ठरवत यांना शासनाच्या कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. जाचक अट बदलावी ज्या ठिकाणी ५६ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला व तेथील खासगी मालमत्तेचे नुकसान झाले, तर त्याला शासनाकडून मदत दिली जाते, मात्र त्यापेक्षा कमी पाऊस झाला तर तो नुकसानग्रस्त मदतीपासून वंचीत राहतो. शासनाची जाचक अट सर्वांनाच मारक असून ही अट शिथल करावी अशी मागणी नुकसानग्रस्तांकडून होत आहे.