शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

स्वाईन फ्लूबाबत सरपंचांना मदतीची साद

By admin | Updated: February 26, 2015 00:11 IST

जिल्हा परिषद : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पाठवले पत्र

रत्नागिरी : राज्यात स्वाईन फ्लूचे वाढते प्रमाण पाहता जिल्ह्यात आवश्यक ती खबरदारी घेण्यासाठी सहकार्य करावे, अशी साद जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम यांनी जिल्ह्यातील सरपंचांना घातली आहे.सध्या राज्यात ‘स्वाईन फ्लू’चे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. त्यांच्या मृत्यूच्या संख्येतही वाढ होत आहे. प्रामुख्याने मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या मोठ्या शहरात ‘स्वाईन फ्लू’ची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मौजे गवाणे (ता. लांजा) आणि भाटीमिऱ्या (ता. रत्नागिरी) येथे ‘स्वाईन फ्लू’चा प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ताप, घसादुखी, घशाला खवखव, खोकला, नाक गळणे, अंगदुखी व डोकेदुखी आदी ‘स्वाईन फ्लू’ची लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणीसाठी जावे, असेही सरपंचांना पाठवलेल्या पत्रात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी म्हटले आहे. आपल्या जिल्ह्यात प्रामुख्याने मुंबई व पुणे येथून येणाऱ्या चाकरमान्यांकडून कदाचित ‘स्वाईन फ्लू’ची लागण होण्याची शक्यता विचारात घेऊन आपल्या कार्यक्षेत्रातही सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे.आपल्या कार्यक्षेत्रात ‘स्वाईन फ्लू’ची लक्षणे आढळल्यास त्यास तातडीने शासकीय रुग्णालयात पाठवावे. ‘स्वाईन फ्लू’ प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सरपंचांना केली आहे. (शहर वार्ताहर)