शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

कणकवलीत पावसाची जोरदार हजेरी, महामार्ग चिखलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 15:42 IST

कणकवली शहरासह तालुक्यात गेला आठवडाभर जोरदार पाऊस बरसत आहे. रविवारी सकाळपासून पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सखल भागात व रस्त्यांवरील खड्ड्यांत ठिकठिकाणी पाणी साचले असून मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा चिखलमय झाला आहे. या चिखलापासून आपली कोणी सुटका करील का? असा प्रश्न कणकवलीतील नागरिकांकडून विचारला जात आहे.

ठळक मुद्दे कणकवलीत पावसाची जोरदार हजेरी, महामार्ग चिखलमय खड्ड्यांत साचले पाणी; वाहनचालकांना करावी लागतेय कसरत

कणकवली : कणकवली शहरासह तालुक्यात गेला आठवडाभर जोरदार पाऊस बरसत आहे. रविवारी सकाळपासून पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सखल भागात व रस्त्यांवरील खड्ड्यांत ठिकठिकाणी पाणी साचले असून मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा चिखलमय झाला आहे. या चिखलापासून आपली कोणी सुटका करील का? असा प्रश्न कणकवलीतील नागरिकांकडून विचारला जात आहे.रविवारी सकाळी पावसाने पुन्हा जोर धरला. काही काळ ढगाळ वातावरण होते. दिवसभर अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. रात्री उशिरापर्यंत हा पाऊस पडत होता. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.सध्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी मातीचा भराव करण्यात आला आहे. त्यातच महामार्गाच्या शेजारी गटारे बांधण्यात न आल्याने पावसाचे चिखलमिश्रित पाणी रस्त्यावर येत आहे.

पाऊस थांबल्यावर रस्त्यावर पसरलेला चिखल काहीसा सुकत आहे. मात्र, या चिखलामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणे कठीण होऊन बसले आहे. तर वाहनचालकांना रस्त्यावरून वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्डे व चिखलामुळे अनेक पादचारी पाय घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या त्रासापासून आपल्याला कोण सोडविल का? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणारा ठेकेदार या समस्येकडे लक्ष देत नाही. तर प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे त्रस्त नागरिकांना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, अशी प्रतिक्रिया अनेक नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत.नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर; तरुणाईने लुटला पर्यटनाचा आनंदमहामार्गाचे काम करीत असताना गटारे तयार करण्यात न आल्याने ठिकठिकाणी पाणी साचत आहे. काही विहिरींमध्ये हे पाणी जात असल्याने विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. तर ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी महामार्गावर पसरल्याने त्यातून चालत जात असल्याने पादचाऱ्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

वातावरणात गारवा पसरला असून तापाचे अनेक रुग्ण ठिकठिकाणी आढळून येत आहेत. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. रविवारी जोरदार पाऊस पडत असल्याने तरुणाईने धबधबे तसेच कासारटाका यासारख्या ठिकाणी जाऊन पर्यटनाचा आनंद लुटला. शहरातील चिकन सेंटरवर ग्राहकांची गर्दी सकाळपासूनच दिसून येत होती.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाsindhudurgसिंधुदुर्ग