शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

कणकवलीत पावसाची जोरदार हजेरी, महामार्ग चिखलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 15:42 IST

कणकवली शहरासह तालुक्यात गेला आठवडाभर जोरदार पाऊस बरसत आहे. रविवारी सकाळपासून पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सखल भागात व रस्त्यांवरील खड्ड्यांत ठिकठिकाणी पाणी साचले असून मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा चिखलमय झाला आहे. या चिखलापासून आपली कोणी सुटका करील का? असा प्रश्न कणकवलीतील नागरिकांकडून विचारला जात आहे.

ठळक मुद्दे कणकवलीत पावसाची जोरदार हजेरी, महामार्ग चिखलमय खड्ड्यांत साचले पाणी; वाहनचालकांना करावी लागतेय कसरत

कणकवली : कणकवली शहरासह तालुक्यात गेला आठवडाभर जोरदार पाऊस बरसत आहे. रविवारी सकाळपासून पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सखल भागात व रस्त्यांवरील खड्ड्यांत ठिकठिकाणी पाणी साचले असून मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा चिखलमय झाला आहे. या चिखलापासून आपली कोणी सुटका करील का? असा प्रश्न कणकवलीतील नागरिकांकडून विचारला जात आहे.रविवारी सकाळी पावसाने पुन्हा जोर धरला. काही काळ ढगाळ वातावरण होते. दिवसभर अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. रात्री उशिरापर्यंत हा पाऊस पडत होता. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.सध्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी मातीचा भराव करण्यात आला आहे. त्यातच महामार्गाच्या शेजारी गटारे बांधण्यात न आल्याने पावसाचे चिखलमिश्रित पाणी रस्त्यावर येत आहे.

पाऊस थांबल्यावर रस्त्यावर पसरलेला चिखल काहीसा सुकत आहे. मात्र, या चिखलामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणे कठीण होऊन बसले आहे. तर वाहनचालकांना रस्त्यावरून वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्डे व चिखलामुळे अनेक पादचारी पाय घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या त्रासापासून आपल्याला कोण सोडविल का? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणारा ठेकेदार या समस्येकडे लक्ष देत नाही. तर प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे त्रस्त नागरिकांना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, अशी प्रतिक्रिया अनेक नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत.नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर; तरुणाईने लुटला पर्यटनाचा आनंदमहामार्गाचे काम करीत असताना गटारे तयार करण्यात न आल्याने ठिकठिकाणी पाणी साचत आहे. काही विहिरींमध्ये हे पाणी जात असल्याने विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. तर ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी महामार्गावर पसरल्याने त्यातून चालत जात असल्याने पादचाऱ्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

वातावरणात गारवा पसरला असून तापाचे अनेक रुग्ण ठिकठिकाणी आढळून येत आहेत. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. रविवारी जोरदार पाऊस पडत असल्याने तरुणाईने धबधबे तसेच कासारटाका यासारख्या ठिकाणी जाऊन पर्यटनाचा आनंद लुटला. शहरातील चिकन सेंटरवर ग्राहकांची गर्दी सकाळपासूनच दिसून येत होती.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाsindhudurgसिंधुदुर्ग